शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maha Shivratri 2023: महादेव भांग पितात, म्हणून आपण पिणे कितपत योग्य? त्यांनी हलाहलही प्यायलं होतं, मग आपलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 12:11 IST

Maha Shivratri 2023: काही लोक उत्सवाच्या रंगाचा बेरंग करतात, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला उत्सवाचे मूळ स्वरूप माहित हवे, म्हणून हा लेखनप्रपंच!

महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र उत्सव आहे. मात्र, उत्सवाला गालबोट लागेल, असे कृत्य काही समाजकंटक करतात. त्यांच्या कृत्यावर आळा घालणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यांना विरोध करताना नकार देण्यासाठी आपल्याला योग्य कारण माहित असले पाहिजे. ते कारण काय, हे जाणून घेऊया.

महादेव चिलिम ओढत, मद्यपान करत, भांग पित, नशा करत असा अपप्रचार कोणी आणि कधी केला हे सांगू शकत नाही. परंतु, आपण आपल्या सद्सदविवेकबुद्धीने विचार केला, तर आपल्याला सत्य असत्य यातील भेद कळू शकेल. 

अनेक जण महाशिवरात्रीला शिवशंकराचा प्रसाद म्हणून अधिकृतपणे मद्यपान करतात, भांग पितात. परंतु, हा अत्यंत चुकीचा आणि किळसवाणा प्रकार आहे. यात महादेवाचे नाव पुढे करून आपली चैन करणे, एवढाच व्यसनी माणसाचा हेतू असू शकतो. 

मुळात भांग हा शब्द शिवशंकरांशी का आणि कसा जोडला गेला, ते पाहू. 

समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर निघाले, ते प्राशन करण्यासाठी शिवशंकर पुढे आले. त्यांनी तो विषप्याला रिचवला. त्यामुळे त्यांच्या सबंध देहाचा दाह झाला. त्यांना शांत करण्यासाठी नानाविध उपाय केले गेले. अंगाला विभूती लावली, सर्प गुंडाळले, मस्तकावर गंगा धारण केली, शितल चंद्रमा कपाळावर चढवला, रुद्राक्षाच्या माळा घातल्या, तरी गुण येईना. मग आयुर्वेदिक उपचार करून पाहिले. 

विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी विजया झाडाची पाने अर्थात भांगेची पाने, बेलपत्र, धोतऱ्याच्या फुलांचे दूध एकत्र करून शिवशंकराला पाजले होते. एवढे उपाय केल्यावर त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला पण पूर्ण शांत झाला नाही. शेवटी राम नाम घेतल्यावर ते पूर्णपणे शांत झाले.

याचाच अर्थ आजही भांग ही औषधी वनस्पती फक्त रुग्णावर उपचार म्हणून वापरली पाहिजे. नशा म्हणून त्याचे सेवन करणे योग्य नाही आणि शिवशंकराच्या नावावर, महाशिवरात्रीच्या निमित्ताने व्यसनाधीन होणे, तर पूर्णपणे अनैतिक आहे. 

आता काही जण सांगतील, की भांगेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. निश्चितपणे आहेत. परंतु औषधाची गरज रुग्णाला असते आणि औषधाची मात्रादेखील निश्चित असते. निरोगी माणसाला औषधाची गरज लागत नाही. तरीदेखील तो त्याचे सेवन करत असेल, तर त्याला व्यसनी म्हटले पाहिजे, शिवभक्त नाही!!!

अशा रीतीने शिवरात्रीच्या पवित्र सोहळ्याचे पावित्र्य जपूया आणि उत्सवाच्या नावावर नशा करणाऱ्यांना रोखूया. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री