शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीला अशा पद्धतीनं अर्पण करा बेलपत्र, जाणून घ्या बेल तोडण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:10 IST

Maha Shivratri 2022: महाशिवरात्री संपूर्ण देशभर शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवभक्तांमध्ये संपूर्ण वर्षभर महाशिवरात्रीची उत्सुकता लागून राहिलेली असते.

Maha Shivratri 2022: महाशिवरात्री संपूर्ण देशभर शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवभक्तांमध्ये संपूर्ण वर्षभर महाशिवरात्रीची उत्सुकता लागून राहिलेली असते. महाशिवरात्रीला भगवान शंकराची मोठ्या श्रद्धेनं पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्र मंगळवारी १ मार्च २०२२ रोजी साजरी होणार आहे. महाशिवरात्री दिवशी भगवान भोलेनाथांचा माता पार्वतीसोबत विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीचं व्रत करुन भगवान शंकराला प्रसन्न केलं जाण्याची परंपरा आणि श्रद्धा आहे. बेलपत्र भगवान शंकराला खूप प्रिय आहे. शास्त्रात फुलं किंवा कोणतीही पानं तोडण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. यातच भगवान शंकराला वाहण्यात येणारे बेलपत्र तोडण्याचे आणि ते अर्पण करण्याची एक विशिष्ट पद्धत सांगण्यात आली आहे. 

बेलपत्र तोडण्याचे नियम१. शास्त्रानुसार चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुदर्शी आणि अमावस्या तिथी, संक्रांतीच्या वेळी तसंच सोमवारी बेलपत्र कधीच तोडू नये. 

२. भगवान शंकराला बेल अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे वरील तिथी किंवा दिवशी बेलपत्र तोडू नये असं शास्त्रात नमूद आहे. 

३. बेलपत्राबाबत शास्त्रात नमूद असलेल्या माहितीनुसार जर नवं बेलपत्र मिळत नसेल तर दुसऱ्यानं वाहिलेलं बेलपत्र धुवून ते पूजेत भगवान शंकराला अर्पण केलं तरी चालतं. 

४. बेलपत्र नेहमी संध्याकाळ झाल्यानंतर तोडावे. 

५. बेलपत्र नेहमी फांदीपासून एक एक करुन तोडावं. एकत्र कधीच तोडू नये. संपूर्ण फांदीला नुकसान होईल अशापद्धतीनं बेल तोडू नये. 

६. बेलपत्र तोडण्यापूर्वी मनात भगवान शंकराला प्रणाम करावा. 

बेलपत्र कसं अर्पण करायचं?१. भगवान शंकराला बेलपत्र नेहमी उलट वाहायचं असतं. बेलाच्या पानाचा जो तुकतुकीत भाग आहे तो आतल्या बाजूस म्हणजेच शिवलिंगाच्या बाजूस असायला हवी. 

२. तुम्ही जे बेलपत्र अर्पण करत आहात त्यात वज्र आणि चक्र असता कामा नये. 

३. भगवान शंकराला अर्पण केले जाणारे बेलपत्र ३ ते ११ पानांचे असायला हवे. यात जितकी जास्त पानं अर्पण केली जातात तितकं अधिक लाभदायी ठरतं असं म्हटलं जातं. 

४. बेलपत्र न मिळाल्यास बेलाच्या वृक्षाला नमन करुनही भगवान शंकराला हात जोडून नमस्कार करावा. 

५. बेलपत्रावर भगवान शंकराचं नाव लिहून अर्पण केलं तर उत्तम. 

(वरील सर्व माहिती धार्मिक आस्था आणि समाजमान्यतांवर आधारित आहे. यात कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाही. सामान्य व्यक्तींची अभिरुची लक्षात घेऊन वरील माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.)

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री