शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

Maghi Ganeshotsav 2024: बाप्पाची मूर्ती सजीव वाटतेच, पण 'या' मूर्तीत चक्क ऐकू आले बाप्पाच्या हृदयाचे ठोके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 08:05 IST

Maghi Ganeshotsav 2024: अयोध्येतील रामललाची मूर्ति प्राणप्रतिष्ठेनंतर जशी सजीव वाटू लागली, तसाच अनुभव या वरद विनायकाच्या मूर्तीबाबत आला.

गणेश चतुर्थीला गणरायची मूर्ती घरी आणल्यावर तिची षोडशोपचारे पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्याचा प्रघात आहे. प्राण प्रतिष्ठा म्हणजे निर्जीव मूर्ती सजीव करणे. मंत्रोच्चारांनी त्या मूर्तीमध्ये सजीवत्त्वाचा अंश उतरवणे आणि केवळ मातीची मूर्तीची नाही तर खऱ्या खुऱ्या गणरायची आपण पूजा करत आहोत ही भावना या सोपस्कारामागे आहे. पण खरोखरच तसे केल्याने मूर्तीमध्ये सजीवत्त्व येते का? याबाबत पार्वती मातेने मातीच्या मूर्तीत आणि शालिवाहन राजाने मातीच्या पुतळ्यात आपल्या तपोबलाने प्राण फुंकून सजीवत्त्व दिल्याच्या कथा आहेत. अशीच एक कथा जाणून घेऊया तामिळनाडू येथील नाडी गणेशाची. त्याबद्दल माहिती दिली आहे युगा वर्तक यांनी!

तामिळनाडू मधील हे मंदिर "नाडी गणपती" म्हणून ओळखले जाते, त्याच्या नावामागच कारण ही तसच आहे. पूज्य आदरणीय श्री मौनस्वामी यांना सिद्धी विनायकाची मोठी मूर्ती स्थापित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, यासाठी त्यांना आवश्यक विधी आणि अभिषेक करावा लागणार होता..

पूज्य आदरणीय श्री मौनस्वामींनी प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया सुरू केली तेव्हा काही नास्तिकांनी दगडाच्या मूर्तीत जीव कसा आणता येईल असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. मग आदरणीय श्री मौनस्वामींनी त्यांना मूर्ती तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले.

सर आर्कबाल्ड एडवर्ड हे त्यावेळच्या प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नर व्हीआयपी अतिथी म्हणून कार्यक्रमाला आले होते आणि तेही हे सर्व ऐकत होते आणि पाहत होते.

नास्तिकांनी पुतळ्याची नाडी तपासण्यासाठी ब्रिटीश डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी मूर्तीची कोणतीही नाडी तपासली असता नाडी आढळली नाही. तेव्हा पूज्य आदरणीय श्री मौनस्वामी म्हणाले, आता मी प्राणप्रतिष्ठा करीन आणि मग तुम्ही पुन्हा तपासू शकता.

प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर आरतीच्या वेळी मूर्ती हलत असल्याचे आणि मूर्तीच्या हालचालीही दिसत असल्याचे भाविकांच्या लक्षात आले.. शिवाय, मूर्तीच्या नाडीसह हृदयाचे ठोके देखील मनुष्याप्रमाणेच स्पष्टपणे दिसले. ब्रिटीश वैद्यांनी आणि अगदी नास्तिकांनी देखील कसून तपासणी केली आणि त्यांच्या स्टेथोस्कोपद्वारे नाडीचे ठोके स्पष्टपणे आढळले. हे बघून उपस्थित असलेल्याना आश्चर्याचा धक्का बसला..

तिरुनेलवेली जिल्ह्यातील भूवैज्ञानिकांनी पुतळ्याचे परीक्षण केले आणि विचित्र घटनेची पुष्टी केली. ही नाडी काही तास चालू राहिली आणि नंतर पूज्य आणि आदरणीय श्री मौनस्वामींनी सांगितले की आता थांबेल आणि ती थांबली.

पुतळ्याचे परीक्षण करणारे वैद्य किंवा नास्तिक कोणीही त्याचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, ते विज्ञानाच्या पलीकडचे आहे हे त्यांनी मान्य केले..हीच बाब अलीकडे आपण अयोध्येतील रामललाच्या मूर्तीबाबतही अनुभवली. खुद्द मूर्तीकाराने देखील आपण बनवलेली मूर्ति प्राणप्रतिष्ठेनंतर कायापालट झाली असे म्हटले आहे. ही मंत्रांची, उपासनेची आणि अध्यात्माची ताकद आहे! उगाच नाही म्हंटले जात सत्य सनातन धर्म... माघी गणेश जन्माच्या सर्वांना शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया!

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपती