शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Lucky Signs: गालावर खळी पडणाऱ्या मुली असतात खूपच नशीबवान, समुद्र शास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:20 IST

Lucky Signs: आपली नैसर्गिक शारीरिक घडण दैवी देणगी असली, तरी त्यावरून विविध प्रकारचे भाकीत समुद्र शास्त्र वर्तवते, त्याचाच हा एक भाग!

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच समुद्रशास्त्र देखील माणसाचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती देते. ज्योतिष शास्त्र व्यक्तीच्या राशीच्या आधारावर भाकीत करते तर सामुद्रिक शास्त्र व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांचा आकार, रंग, शरीराच्या खुणा इत्यादींच्या आधारे भविष्य वर्तवते. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असते आणि त्यावर त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य अवलंबून असते.

'गालावर खळी डोळ्यात धुंदी, ओठावर फुले लाली गुलाबाची' हे स्वप्नील बांदोडकरचे गाणे ऐकले की डोळ्यासमोर उभ्या राहतात मऊ मऊ गालांवर खोलवर खळ्या पडणाऱ्या मुली! मुलांनाही खळ्या पडतात, पण मुलींच्या गालावर पडणाऱ्या खळ्या त्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्यांचे हास्य बहारदार बनवतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवतात. खळी पडणाऱ्या मुलींना पाहून इतर मुलींनाही आपल्याला खळी का पडत नाही याची खंत वाटते. पण हे नैसर्गिक वरदान म्हटले पाहिजे. समुद्र शास्त्र सांगते, की खळी पडणाऱ्या मुली भाग्यवान असतात. एवढंच नव्हे तर त्यांच्यावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा असते. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती!

>> समुद्रशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या मुलींच्या गालावर खळी पडते, त्यांची आर्थिक स्थिती इतर मुलींच्या तुलनेत चांगली असते. या मुलींना आयुष्यात खूप यश मिळते, आनंद मिळतो. त्या ऐषोआरामी जीवन जगतात. मुक्त हस्ते खर्च करतात. तसेच या मुलींचे आयुष्य लग्नानंतरही आनंदी राहते.

>>गालावर तीळ असणाऱ्या मुलींना खूप भाग्यवान समजले जाते. त्या हुशार असतात. जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवतात. याउलट पुरुषांच्या गालावर नाही तर मानेवर तीळ असणे भाग्यकारक समजले जाते. 

>>गोलाकार चेहरा, गोबरे गाल आणि त्यावर खळी असणारी मुलगी तर बाहुली सारखीच गोड दिसते. अशा मुली स्वभावाने पण निरागस असतात. त्यांच्या नाकावर राग असतो, पण त्या पटकन राग विसरून सगळ्यांमध्ये सहभागी होतात. 

>>याउलट ज्या मुलींचे गाल बसलेले असतात, चेहऱ्यावर राकट भाव असतात, चेहरा त्रासलेला असतो, अशा मुली सतत इतरांचा दुःस्वास करत राहतात. दुसऱ्यांशी तुलना करून स्वतःचा आणि कुटुंबाचा आनंद गमावतात. 

>>उभट आणि अंडाकृती चेहरा रेखीव दिसतो. परंतु अशा मुलींचा स्वभाव थोडा गूढ असतो. त्या बोलतात एक आणि वागतात भलतेच. त्यांच्या मनाचा ठाव घेणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही.