शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

प्रेम सप्ताह सुरू झाला, तुमचेही प्रेम दीर्घकाळ टिकावे वाटत असेल तर 'ही' महत्त्वाची अट मान्य करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 16:56 IST

प्रेम केवळ सप्ताहापुरते मर्यादित नको, ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवता आले पाहिजे!

भय नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे लोकांवर विनाअट प्रेम करा. तुमच्या मनात जर काही अटी असतील, तर तुम्ही कधीच प्रेम करू शकणार नाही. त्या अटीच तुमच्या मार्गातील अडथळे बनतील. प्रेम करण्याचा लाभ तुम्हाला स्वत:ला होत असतो. मग अटी कशासाठी हव्यात? प्रेम तुम्हाला इतका लाभ करून देते, इतक्या आशीर्वादाचा वर्षाव करते की त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला काहीच मागण्याची गरज उरत नाही. म्हणून विनाअट प्रेम करा. तुम्हाला लक्षात आले, की प्रेम करण्यानेच निर्भयता विकसित होऊ शकते, म्हणजे तुम्ही स्वाभाविकपणे प्रेम कराल. मग तुम्ही प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम कराल.

सर्वसामान्यपणे आपल्या अटी पुऱ्या झाल्या की लोक प्रेम करतात. लोक म्हणतात, तू असा वागलास तर मी तुझ्यावर प्रेम करेन. या अटींमध्ये प्रेम गुदमरून जाते. प्रेम म्हणजे अनंत आकाश आहे. त्याला तुम्ही अटींच्या सीमित, संकुचित अंगणात कसे उतरवू शकाल? तुम्ही घरात तजी हवा घेऊन या. मग घर कडेकोट बंद करून टाका. लवकरच ती हवा नासायला लागेल. प्रेम स्वतंत्र आहे, त्याला घराच्या भिंतीत कोंडून ठेवू नका.

तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा सारे काही सुंदर वाटते. कारण त्या घडीला तुमच्या मनात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते. कोणत्याही अटी नसतात. दोन माणसं काहीही अपेक्षेविना एकमेकांच्या जवळ आलेली असतात. पण एकदा ते एकत्र राहायला लागले, अनोळखीपण संपले की अटी थोपवायला सुरुवात होते. अशा वेळी तुम्ही प्रेमाचा सौदा करता. 

प्रेम करणे हेच प्रेमाचे साध्य असले पाहिजे. तिथे कसलीही अपेक्षा नसेल, तरच प्रेमाचा निर्भेळ आनंद घेताही येईल आणि देताही येईल.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप