शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

प्रेम 'अकारण' करता यायला हवे, जसे संत नामदेवांनी विठूमाऊलीवर केले...प्रेमभावो!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 17, 2021 10:24 IST

प्रेम करण्यासाठी कारण लागत नाही. कारण शोधून प्रेम करणे, हा व्यवहार झाला, प्रेम नाही. प्रेम अकारण करता यायला हवे. अन्यथा कारण संपले, की प्रेमही संपून जाते.

ज्योत्स्ना गाडगीळ

काही गाणी ऐकता क्षणी हृदयात घर करतात. संत नामदेवांचा हा अभंगदेखील त्यापैकीच एक! विठ्ठल भक्तीत ओथंबून निघालेला आणि गायक सुरेश वाडकर यांच्या भावपूर्ण स्वरात चिंब भिजलेला. मालकंस रागातील हा अभंग संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केला आहे. शांत बसून डोळे बंद करून या अभंगाचा आस्वाद घेतला, की शब्दांचा आणि शब्दांमधला अर्थ आपोआप उलगडत जातो.

विठ्ठल आवडी प्रेमभावो,विठ्ठल नामाचा रे टाहो।।

तुटला हा संदेहो, भव मूळ व्याधीचा।

म्हणा नरहरी उच्चार,कृष्ण हरी श्रीधर,हेचि नाम आम्हा सारसंसार तरावय।।

नेघो नामाविण काही,विठ्ठल कृष्ण लवलाही,नामा म्हणे तरलो पाही,विठ्ठल विठ्ठल म्हणाताचि।।

विठ्ठल आवडीचे कारण संत नामदेव एका शब्दात व्यक्त करतात...प्रेमभावो! प्रेम करण्यासाठी कारण लागत नाही. कारण शोधून प्रेम करणे, हा व्यवहार झाला, प्रेम नाही. प्रेम अकारण करता यायला हवे. अन्यथा कारण संपले, की प्रेमही संपून जाते. संत नामदेव म्हणतात, विठ्ठलावर प्रेम जडले आहे, तेही अकारण आहे. त्याच्याप्रती प्रेमभाव आहे म्हणून मला तो आवडतो. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी केवळ साद घालत नसून मी त्याच्या नावे टाहो फोडत आहे. केवढी ही आर्तता...!

विठ्ठलाचा लळा लागल्यावर भवतापाचा संदेह आपोआप तुटून जातो. सत्य उलगडले की जग मिथ्या वाटू लागते. त्यामुळे कशात मन अडकवायचे आणि कशातून अलिप्त राहायचे, हे आपसुख उमगत जाते. आपण जे काही पाहतो, ती मोह माया आहे. त्यात अडकल्यावर सहसा सुटका नाही. ते सकल व्याधींचे मूळ आहे. मात्र, एकदा का विठ्ठल नामाची गोडी लागली, की भवतापातील व्याधी जडत नाहीत.

आजारपणातून बरे व्हायचे असेल, तर डॉक्टरांचे ऐकावे लागते. त्यांनी सांगितलेले उपचार करावे लागतात. ते केले, तरच औषधाला गुण येतो आणि रोगी ठणठणीत बरा होतो. त्याप्रमाणे भवसागरातील व्याधींचे मूळ नष्ट व्हावेसे वाटत असेल, तर विठ्ठल नामाची मात्रा रोज घेतली पाहिजे. विठ्ठल भक्तीचे पथ्य पाळले पाहिजे. तरच जीवाशिवाची भेट होऊन हा संसार तरून जाता येईल. 

अमृताहूनी गोड असलेल्या विठ्ठलनामाची गोडी लागली, की अन्य गोष्टी त्यासमोर अगोड वाटू लागतील. नेघो म्हणजे न घेणे. अन्य कोणतेही नाम घ्यावेसे वाटणार नाही. कृष्ण भक्तीची आस लागून लवकरात लवकर त्याची भेट कधी होईल, ही ओढ निर्माण होईल़ या आर्ततेमुळे एक न एक दिवस त्या विठ्ठलाची गाठभेट होईल आणि हा भवसागर तरून विठ्ठलाच्या गावी जाता येईल, अशी खात्री संत नामदेव व्यक्त करत आहेत. 

आपणही त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवत राम कृष्ण हरी म्हणूया आणि आपले नियमित काम करून विठ्ठलभक्तीत रमूया.