शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

श्रीकृष्णार्जुन संवाद: सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता...

By देवेश फडके | Published: January 22, 2021 7:44 PM

परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

प्रत्येक माणूस हा जीवन जगताना काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. आपले आचार, विचार, व्यवहार याप्रमाणे आचरण करत असतो. आपल्या आराध्य देवतेची भक्ती करतानाही काहीतरी धारणा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. माणसागणिक त्या बदलत असतात. देवाचे नामस्मरण, पूजन, आराधना, उपासना करतानाही काही संकल्पना मनात बाळगूनच आचरण केले जात असते. कालातीत अमोघ ज्ञान देणाऱ्या भगवद्गीतेत भगवंताची भक्ती कशी करावी, याबाबत सखोल आणि विस्तृत विवेचन केलेले आढळून येते. भगवद्गीतेत छोट्या छोट्या गोष्टींवर अतिशय सविस्तर वर्णन केलेले आढळून येते. परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. सर्व पापांतून मुक्तता आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी ईश्वर कटिबद्ध आहे, असा अर्थ या श्लोकाचा सांगितला जातो. मात्र, धर्माचा त्याग करावा म्हणजे नेमके काय करायचे? धर्म नावाचे जे काही आहे, ते सर्व सोडून द्यायचे का? असे काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जातात. प्रत्येक जण आपापले विचार, मान्यता आणि कुवतीनुसार तसेच आपापल्यापरिने याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. 

धर्माचा खरा अर्थ काय आहे. धर्म हा शब्द धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे, असा होतो. धारयति इति धर्मः!, असे म्हटले जाते. जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा बरोबर असू शकतात, तशा त्या चुकीच्याही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात. धारणांमध्ये गल्लतही असू शकते, असे सांगितले जाते. 

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. 

कर्ताही मीच, क्रियाही मीच, क्रियापदही मीच आहे, हे एकदा लक्षात घेतले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे; तसेच यातून बाहेर काढणाराही मीच आहे. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे, असेही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक