शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

श्रीकृष्णार्जुन संवाद: सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता...

By देवेश फडके | Updated: January 22, 2021 19:47 IST

परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

प्रत्येक माणूस हा जीवन जगताना काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. आपले आचार, विचार, व्यवहार याप्रमाणे आचरण करत असतो. आपल्या आराध्य देवतेची भक्ती करतानाही काहीतरी धारणा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. माणसागणिक त्या बदलत असतात. देवाचे नामस्मरण, पूजन, आराधना, उपासना करतानाही काही संकल्पना मनात बाळगूनच आचरण केले जात असते. कालातीत अमोघ ज्ञान देणाऱ्या भगवद्गीतेत भगवंताची भक्ती कशी करावी, याबाबत सखोल आणि विस्तृत विवेचन केलेले आढळून येते. भगवद्गीतेत छोट्या छोट्या गोष्टींवर अतिशय सविस्तर वर्णन केलेले आढळून येते. परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. सर्व पापांतून मुक्तता आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी ईश्वर कटिबद्ध आहे, असा अर्थ या श्लोकाचा सांगितला जातो. मात्र, धर्माचा त्याग करावा म्हणजे नेमके काय करायचे? धर्म नावाचे जे काही आहे, ते सर्व सोडून द्यायचे का? असे काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जातात. प्रत्येक जण आपापले विचार, मान्यता आणि कुवतीनुसार तसेच आपापल्यापरिने याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. 

धर्माचा खरा अर्थ काय आहे. धर्म हा शब्द धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे, असा होतो. धारयति इति धर्मः!, असे म्हटले जाते. जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा बरोबर असू शकतात, तशा त्या चुकीच्याही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात. धारणांमध्ये गल्लतही असू शकते, असे सांगितले जाते. 

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. 

कर्ताही मीच, क्रियाही मीच, क्रियापदही मीच आहे, हे एकदा लक्षात घेतले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे; तसेच यातून बाहेर काढणाराही मीच आहे. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे, असेही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक