शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

श्रीकृष्णार्जुन संवाद: सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता...

By देवेश फडके | Updated: January 22, 2021 19:47 IST

परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

प्रत्येक माणूस हा जीवन जगताना काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. आपले आचार, विचार, व्यवहार याप्रमाणे आचरण करत असतो. आपल्या आराध्य देवतेची भक्ती करतानाही काहीतरी धारणा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. माणसागणिक त्या बदलत असतात. देवाचे नामस्मरण, पूजन, आराधना, उपासना करतानाही काही संकल्पना मनात बाळगूनच आचरण केले जात असते. कालातीत अमोघ ज्ञान देणाऱ्या भगवद्गीतेत भगवंताची भक्ती कशी करावी, याबाबत सखोल आणि विस्तृत विवेचन केलेले आढळून येते. भगवद्गीतेत छोट्या छोट्या गोष्टींवर अतिशय सविस्तर वर्णन केलेले आढळून येते. परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. सर्व पापांतून मुक्तता आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी ईश्वर कटिबद्ध आहे, असा अर्थ या श्लोकाचा सांगितला जातो. मात्र, धर्माचा त्याग करावा म्हणजे नेमके काय करायचे? धर्म नावाचे जे काही आहे, ते सर्व सोडून द्यायचे का? असे काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जातात. प्रत्येक जण आपापले विचार, मान्यता आणि कुवतीनुसार तसेच आपापल्यापरिने याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. 

धर्माचा खरा अर्थ काय आहे. धर्म हा शब्द धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे, असा होतो. धारयति इति धर्मः!, असे म्हटले जाते. जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा बरोबर असू शकतात, तशा त्या चुकीच्याही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात. धारणांमध्ये गल्लतही असू शकते, असे सांगितले जाते. 

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. 

कर्ताही मीच, क्रियाही मीच, क्रियापदही मीच आहे, हे एकदा लक्षात घेतले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे; तसेच यातून बाहेर काढणाराही मीच आहे. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे, असेही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक