शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्णार्जुन संवाद: सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता...

By देवेश फडके | Updated: January 22, 2021 19:47 IST

परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

प्रत्येक माणूस हा जीवन जगताना काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. आपले आचार, विचार, व्यवहार याप्रमाणे आचरण करत असतो. आपल्या आराध्य देवतेची भक्ती करतानाही काहीतरी धारणा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. माणसागणिक त्या बदलत असतात. देवाचे नामस्मरण, पूजन, आराधना, उपासना करतानाही काही संकल्पना मनात बाळगूनच आचरण केले जात असते. कालातीत अमोघ ज्ञान देणाऱ्या भगवद्गीतेत भगवंताची भक्ती कशी करावी, याबाबत सखोल आणि विस्तृत विवेचन केलेले आढळून येते. भगवद्गीतेत छोट्या छोट्या गोष्टींवर अतिशय सविस्तर वर्णन केलेले आढळून येते. परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. सर्व पापांतून मुक्तता आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी ईश्वर कटिबद्ध आहे, असा अर्थ या श्लोकाचा सांगितला जातो. मात्र, धर्माचा त्याग करावा म्हणजे नेमके काय करायचे? धर्म नावाचे जे काही आहे, ते सर्व सोडून द्यायचे का? असे काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जातात. प्रत्येक जण आपापले विचार, मान्यता आणि कुवतीनुसार तसेच आपापल्यापरिने याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. 

धर्माचा खरा अर्थ काय आहे. धर्म हा शब्द धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे, असा होतो. धारयति इति धर्मः!, असे म्हटले जाते. जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा बरोबर असू शकतात, तशा त्या चुकीच्याही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात. धारणांमध्ये गल्लतही असू शकते, असे सांगितले जाते. 

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. 

कर्ताही मीच, क्रियाही मीच, क्रियापदही मीच आहे, हे एकदा लक्षात घेतले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे; तसेच यातून बाहेर काढणाराही मीच आहे. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे, असेही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक