शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हिरवा रंग बघा आणि दृष्टिदोष घालवा; काय आहे हा उपचार? वाचा ही बोधकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 2, 2021 17:24 IST

विचार योग्य दिशेने करण्याची सवय लावली, तर कठीण काहीच उरणार नाही.

'तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी' अशी आपली नेहमीच अवस्था होते. साधे साधे प्रश्न असतात, परंतु ते सोडवायचे सोडून आपण अधिक गुंतवून ठेवतो. प्रश्नांची उकल शोधण्यासाठी जग फिरतो, पण त्यावर आपण थोडा विचार करत नाही. विचार योग्य दिशेने करण्याची सवय लावली, तर कठीण काहीच उरणार नाही. आता हीच गोष्ट पहा ना... 

एक शेठजी होते. पैशांचा त्यांना प्रचंड माज होता. आपल्या अहंकारापुढे ते कोणालाही नीट वागवत नसत. त्यामुळे लोकांमध्ये मिसळणे दूरच, त्यांचे कोणाशी फार बोलणे चालणेही नव्हते. 

शेठजींना वाचनाचा मोठा व्यासंग होता. नव्या ठिकाणी, नव्या देशी गेल्यावर तिथल्या संस्कृतीचे, साहित्याचे पुस्तक विकत घेत असत. घरी आल्यावर वाळवीच्या वेगाने पुस्तकांचा फडशा पाडत असत. 

वयोमानानुसार त्यांची दृष्टी हळू हळू कमकुवत होत होती. त्यांनी डॉक्टरांना समस्या सांगितली. शेठजींची श्रीमंती पाहून डॉक्टर वाट्टेल तो उपाय सुचवू लागले आणि शेठजी डोळे बंद करून विश्वास ठेवू लागले. अनेक डॉक्टर झाले, अनेक औषधोपचार झाले, पण गुण येईना. शेठजी निराश झाले. त्यांना आणखी एका डॉक्टरांचा पत्ता मिळाला. आणखी एक प्रयत्न म्हणत शेठजींनी त्या डॉक्टरांनाही गाठले. 

अति वाचनामुळे दृष्टीवर ताण आला असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी शेठजींना साहित्यिक भाषेत उपाय सांगितला, ' शेठजी, पुढील काही दिवस तुम्ही फक्त हिरवा रंग पहायचा.' 

पुढचे काही ऐकण्याआधी शेठजी उपचार शुल्क देऊन रवाना झाले. त्यांनी ठरवले आणि घरात जिथे नजर जाईल तिथे हिरवळ दिसेल अशी व्यवस्था करवून घेतली. अंगणापेक्षा घरातच फुलझाडांनी गर्दी केली. परंतु फारसा फरक पडला नाही. मग शेठजींनी घराच्या भिंती हिरव्या रंगाच्या करायचे ठरवून घेतले. रंगारी बोलावले आणि हिरवा रंग मारायला सांगितला. सगळ्या घराला एकसारखा रंग, या विचाराने रंगारी गोंधळला. त्याने भीतभीत शेठजींना कारण विचारलं. त्यावर शेठजी म्हणाले, मला दृष्टिशोध दूर करण्यासाठी डॉक्टरांनी हिरवा रंग बघायला सांगितलं आहे. 

त्यावर रंगारी हसून म्हणाला, अहो शेठजी हिरवा रंग दिसला पाहिजे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त निसर्गाच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. तुम्ही केलेले खटाटोप व्यर्थ आहेत. एवढी रंग रंगोटी करण्यापेक्षा हिरवा गॉगल लावला असता, तर सगळं जग आपोआप हिरवे दिसले असते. रंगारीच्या बोलण्याचा मतितार्थ कळला आणि शेठजींना स्वतःचेच हसू आले. 

म्हणून प्रश्नांचा विचार करू नका. उत्तर शोधण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करा. प्रश्न आपोआप सुटतील.