शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:55 IST

सुंदर शरीर, नूतन पत्नी, मेरूपर्वताएवढे धन, दिंगत किर्ती ह्या गोष्टी प्राप्त असूनही जर आपले मन प्रभुपदी नसेल तर, त्याचा काहीच उपयोग नाही.

जीवनात सांसारीक वासना वाढत गेल्या की, संसाराचा मोह सुटत नाही. प्रत्येक जण आपल्या शरीराची, कपड्यांची खूप काळजी घेतात. परंतु मृत्यूनंतरही जे आपल्या सोबत येते त्या मनाच्या काळजीकडे दूर्लक्ष करतात. मरणोत्तर जे सोबत येते त्याची किंमत करायला हवी. शरीर, धनाची चिंता करू नका. मरणानंतर लोक तुमच्या हातातील अंगठीही काढून घेतात. ह्या वास्तवाची जाणीव भारतीय संस्कृतीच्या सर्वधर्म ग्रंथातून... संत जणांच्या प्रबोधनातून व्यक्त करून देण्यात आली आहे. सदाचाराशिवाय मनाची शुध्दी नाही. दूर्लभ मानवी जीवनाचे सार्थक कशात आहे? हे समजून घ्यायला हवे. नाहीतर -‘देह जाईल जाईल । काळ यासी  बा खाईल।ज्यादिवशी जन्म झाला। त्याचदिवशी मृत्यूचा दिनांक सुध्दा निश्चीत झाला आहे. आपण या जगात आलो. जग याचा अर्थच असा आहे की, ज-जन्मास येणे आणि ‘ग’ म्हणजे गमन करणे. सोडलेला श्वास पुन्हा घेता येणे म्हणजे जीवन असून, सोडलेला श्वास पुन्हा घेता न येणे म्हणजे मृत्यू आहे. म्हणूनच तुकोबासारखे संत सांगतात- मृत्यू सातत्याने प्रतिक्षा करीत असतो-‘अजुनी किती आहे अवकाश?देह जै पासुनी झाला। तै पासुनी मृत्यू लागला।जेवी सापें बेडुक धरीला। गिळू लागला लवनिमीषे।। (नाथ भागवत)म्हणून जोपर्यंत ह्या देहात चैतन्य आत्मा आहे तो पर्यतच जीवनाचे सुवर्ण  करण्यासाठी परमार्थ विचाराची उपासना झाली पाहीजे. परमार्थ म्हणजे परम+अर्थ. परम=श्रेष्ठ आणि शरीरं सुरूपं नवीन कलंत्र, धनं मेरूतुल्यम्, यश श्चारू चित्रम।हरेंरंघ्रिपदमें मनश्चेम लग्नं, तत: किम् तत: किम किंतत: किंम।।सुंदर शरीर, नूतन पत्नी, मेरूपर्वताएवढे धन, दिंगत किर्ती ह्या गोष्टी प्राप्त असूनही जर आपले मन प्रभुपदी नसेल तर, त्याचा काहीच उपयोग नाही. कारण अंतकाळी ह्यापैकी कुणीही सोबत येत नाही. श्रीरामकृष्ण शिष्यांना नेहमी म्हणत की, संसार एक समुद्र आहे. जी विद्या भवसागर तरून जाण्यासाठी उपयुक्त आहे ती आध्यात्म विद्याच आहे. विचारवंत म्हणतात. ‘तुझा आणि माझा नाही भरवसा। गर्व कशाला रे भल्या माणसा।मैनावती देवीने पुत्र गोपीचंद्राला, ध्रुवमातेने ध्रुवाला, मदालसेने पुत्राला या दृष्टीने जागृत केले. मदालसा मुलाला म्हणते -‘या देहाचा भरवसा, पुत्रा न धरावा ऐसामाझे माझे म्हणोनिया, बहू दु:खाचा वळसाबहुत ठकविले, मृग जळीच्या आशातृष्णा सोडोनिया, योगी गेले रे वनवासास्मरे त्या हरीहरा, शरण जाई गोविंदा।’प्रबोधनांचा हा विचार ध्यानी घेवूनच जीवनाची वाटचाल चालू द्यावी. जो श्वास घेतला तोच आपला। अधिकार नाही पुढच्यावरती।दिले नियतीने श्वास मोजुनी । एकही न मिळे त्याच्यावरती।।’

- ह.भ.प. डाॅ.ज्ञानेश्वर मिरगे,शेगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक