शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
2
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
3
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सरसह सेट केला महारेकॉर्ड
4
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी
5
वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी
6
भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
7
"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video
8
केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम
9
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
10
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
11
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
12
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
13
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी
14
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
15
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
16
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
17
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
18
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
19
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
20
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा

मन शांत नसते तेव्हा काय केले पाहिजे, हे जाणून घेऊया भगवान बुद्धांच्या प्रेरक कथेतून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 09:00 IST

मन अशांत असताना मेंदू काम करत नाही आणि त्यावेळेस घेतलेले निर्णय हमखास चुकतात. म्हणून मनाचा तलाव शांत होऊ द्यावा नंतरच विचारांची तहान भागवावी.

एकदा भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांसमवेत एका गावातून दुसऱ्या गावी प्रवास करत होते. बराच वेळ प्रवास झाल्यावर एका वटवृक्षाच्या छायेत भगवान आपल्या शिष्यांसमवेत बसले आणि एका शिष्याला म्हणाले, `या गावात एक तलाव आहे, तिथून घडाभर पाणी सर्वांसाठी घेऊन ये. खूप तहान लागली आहे.'

शिष्य नम्रपणे उठला. घडा घेऊन तलावाजवळ गेला. तिथे पाहिले, तर गावकरी त्या तलावाचा पुरेपुर वापर करत होते. कोणी तिथे म्हशी धुवत होते, तर बायका कपडे धुवत होत्या. लहान मुले पाण्यात डुंबत होती. इतके अस्वच्छ पाणी भगवान बुद्धांना कसे बरे द्यावे, या विचाराने शिष्य रिकामा घडा घेऊन भगवान बुद्धांजवळ आला आणि झुकलेल्या नजरेने म्हणाला, `भगवान, ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही.'भगवान म्हणाले, `हरकत नाही. तुही दमला असशील. आमच्याबरोबर तुही थोडी विश्रांती कर. मग बघू.' शिष्य पहुडला.

काही वेळाने भगवान बुद्धांना जाग आली. त्यांनी त्या शिष्याला पुन्हा हाक मारली आणि पाणी घेऊन ये म्हणाले.शिष्याला सकाळचेच दृष्य आठवले. परंतु आज्ञेचा भंग कसा करणार, म्हणून तो निमुटपणे घडा घेऊन तलावाजवळ गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय, तलावातले पाणी शुद्ध दिसत होते. सगळा कचरा, गाळ तळाशी जमा झाला होता. ते पाहून शिष्य आश्चर्यचकित झाला. त्याने अलवारपणे घडा पाण्यात बुडवला आणि वरवरचे शुद्ध पाणी भरून तो घेऊन आला.

त्याची कुतुहलमिश्रीत मुद्रा पाहून भगवान हसले व म्हणाले, `मगाशी अनेक लोकांमुळे सगळा कचरा ढवळला जात होता, म्हणून पाणी दुषित दिसत होते. आता तिथे कोणीच नसल्यामुळे पाणी स्थिर झाले असेल आणि गाळ खाली बसला असेल. यावरून मला हेच सुचवायचे होते, जेव्हा आपल्या मनात अनेक विचारांचा कचरा ढवळून निघतो, डोक्यात अनेक शंकांचे काहूर माजते, असंख्य प्रश्न डोके वर काढतात, अशा वेळेस काही काळ शांत राहावे. सगळ्या विचारांचा निचरा झाला, की मन शांत होते आणि योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त होते. मन अशांत असताना मेंदू काम करत नाही आणि त्यावेळेस घेतलेले निर्णय हमखास चुकतात. म्हणून मनाचा तलाव शांत होऊ द्यावा नंतरच विचारांची तहान भागवावी.