शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

देव्हाऱ्यात देवाला राहू द्या, माणसांना नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 18:53 IST

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, असे म्हणतात. आपल्याला दिसते, ती केवळ प्रसिद्धी, पैसा, यश. परंतु, तो एक काटेरी मुकुट असतो. तो मुकुट घालणाऱ्यालाच त्याची व्यथा माहित असते.

एखाद्याचे मोठेपण लक्षात येताच, लोक त्याचे अनुकरण करायचे सोडून त्याला देव्हाऱ्यात नेऊन बसवतात. मग त्या व्यक्तीने चुकूनही चूक करणे, समाजाला अपेक्षित नसते. परंतु, माणसाचे मोठेपण हे त्याच्या कर्तृत्वात असते. कर्तृत्वाला मोठेपणा न देता, माणसांना मोठेपणा दिल्यामुळे संबंधित व्यक्तीला सामान्य आयुष्य जगणेही कठीण होऊन बसते. हीच व्यथा तुकाराम महाराजांनी एका अभंगातून व्यक्त केली आह़े 

हेही वाचा : विश्वनाट्य सूत्रधार तूच श्यामसुंदरा...; सृष्टीच्या निर्मात्याला - परमेश्वरासाठी रचलेली 'नांदी'

कलियुगी कवित्व करिती पाखांड, कुशल हे भांड बहू झाले।कांद्याचा खाणारा चोजवी कस्तुरी, आपण भिकारी अर्थ नेणे।न कळे ते मज पुसती छळूनी, लागता चरणी न सोडिती।तुझ्या पायाविण दुजे नेणे काही, तू चि सर्वाठायी एक मज।तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा, किती बोलो भांडा वादकांशी।

तुकाराम महाराजांनी इथे त्यांच्या आसपासच्या लोकांचा त्यांना कसा त्रास होत होता आणि भांडखोर माणसे नाना प्रकारे पाखंडी मतांचे प्रतिपादन करून अधम जातीचे काव्य कशी करीत होती, त्यांचे वर्णन करीत आहेत. त्यांच्याबद्दल एक त्यांनी दृष्टांत दिला आहे. कांद्याची आवड असणाऱ्या माणसाला कस्तुरीच्या वासाची काही किंमत जशी वाटत नाही, तशी या पाखंडी कवींना खऱ्या आत्मानुभूतीची मातब्बरी वाटत नाही. 

महाराजांना ते लोक ऐहिक शास्त्रातील नाना प्रश्न व आपल्या सांसारिक अडचणी सांगत होते आणि त्यांचे पाय घट्ट धरून हट्टाने काहीतरी उपाय सांगा असे म्हणत होते. विठ्ठलाजवळ मग महाराज गाऱ्हाणे सांगतात, की देवा मला तुझ्या चरणांच्या सेवेशिवाय आणखी काही नारी रे कळत! मला तूच सगळीकडे दिसतोस आणि मला या भंडावून सोडणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नाहीत. तू आता असे काहीतरी कर, की हे लोक मला वारंवार प्रश्न विचारून भंडावून सोडणार नाहीत. त्यांची बोलणी बंद कर. मी या वादविवाद करणाऱ्यांशी किती बरे भांडू? 

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, असे म्हणतात. आपल्याला दिसते, ती केवळ प्रसिद्धी, पैसा, यश. परंतु, तो एक काटेरी मुकुट असतो. तो मुकुट घालणाऱ्यालाच त्याची व्यथा माहित असते. म्हणून यशस्वी व्यक्तींचे केवळ यश न पाहता त्यांचा यशाकडे नेणारा प्रवास पाहावा. जितका साधेपणा अंगी बाणता येईल, यासाठी प्रयत्न करावा. अध्यात्म मार्गातही असे अनुभव येतात. बहुतेक भक्तांना लोकांकडून - आर्त व पीडित लोकांकडून अस त्रास होतो. यासाठी खरे भक्त आपली भक्तीसाधना लोकांच्या लक्षात येणार नाहीत असे वागतात.    

हेही वाचा : देवाधिदेव महादेवांनादेखील 'राम'नामाचीच मात्रा लागू झाली होती.