शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून चिरंतन आनंदाचा प्रवास कसा करावा याचा कानमंत्र जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 08:39 IST

आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी, त्यांनी दाखवलेला चिन्मयानंदाचा मार्ग आपलाही जीवन प्रवास सुखकर करेल हे नक्की!

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आज पुण्यतिथी! ज्यांना आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून ओळखतो, त्यांचे पूर्ण नाव, गणपती रावजी गोंदवलेकर. त्यांचा जन्म गोंदवले येथे १८४५ मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना देवधर्माची आवड होती. त्यांना नामाची अतिशय गोडी होती. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून, गुरुंच्या शोधार्थ त्यांनी बरीच भ्रमंती केली. अमर्याद प्रवास केला. अनेकदा काशीला जाऊन आले. नैमिषारण्यातील दऱ्याखोऱ्यांतून ते अनेकदा हिंडले. नर्मदा किनाऱ्यावरील महेश्वर गावातील दोन प्रख्यात मांत्रिकांनी महाराजांना सर्पांनी वेष्टून बांधून ठेवले. परंतु महाराजांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला व त्यांना नामाचा मंत्र दिला.

बेळगावचे थोर ब्रह्मज्ञानी तुकाराम चैतन्य या सद्गुरुंची व महाराजांची भेट झाली. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन महाराजांना वयाच्या पंधराव्या वर्षी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त झाली.  रामकृष्णमहाराजांना ते भेटले. त्यांनीच महाराजांना तुकाराम सद्गुरुंकडे जाण्यास सांगितले. त्यांना महाराज शरण गेले. महाराजांना जे हवे होते, ते त्यांना सद्गुरु तुकाराम महाराजांकडे मिळाले. निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते, ते त्यांना सद्गुरुंपाशी मिळाले. ते परमात्मास्वरूप होते. त्यांनी महाराजांवर खूप प्रेम केले.

लहानपणापासून नामाची कृपा महाराजांवर होती. त्यांनी काय करावे याबद्दल त्यांना आतून नामच मार्गदर्शन करी. गोंदवलेकर महाराज म्हणत, `शुद्ध परमात्मास्वरूप सगुण व निर्गुण या दोहींच्या पलीकडे आहे. सगुणाला उपाधीची मर्यादा असते, तर निर्गुणाला ती नसते. मर्यादा व अमर्यादा या दोन्हींचा लोप होऊन जे उरते, ते शुद्ध ब्रह्म होय. ते मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. सगुणाला उपाधीची मर्यादा असते, तर निर्गुणाला ती नसते. मर्यादा व अमर्यादा या दोन्हींचा लोप होऊन जे उरते, ते शुद्ध ब्रह्म होय. ते मानवी कल्पनांच्या पलीकडले आहे. ते सर्वव्यापी, सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहे. ते आहे इतकेच त्यांच्याबद्दल बोलता येते.

ईश्वर हा चिन्मय आहे. जाणीवरूप आहे. तरी तो कर्ता असून, अकर्ता राहतो. सर्व घटना घडवून आणतो. आनंदाने भरलेला ईश्वर माया नावाच्या विलक्षण शक्तीने विश्वाचा व्यवहार करतो. त्याला विसरले की माया छळू लागते. पण स्मरण केले की तीच भक्तीला मदत करते. भगवंताच्या भक्तीने त्याची कृपा होऊन तो मायेतून सुटतो. सर्व सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. ऊँकारातून म्हणजे नादब्रह्मातून तिची उत्पत्ती झाली. ऊँकार म्हणजेच नाम होय. नाम हे सामान्य, सूक्ष्म रुपाने अदृश्य तर रुप हे दृश्य रुपाने स्थूल आहे. अनेक रुपांना एकच नाम व्यापून असते. नामाच्या योगाने वासनेत गुंतलेला जीव बाजूला सरतो. नामस्मरण म्हणजे 'मी भगवंताचा आहे' ही अखंड जाणीव. सद्गुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने व प्रेमाने नाम घ्यावे. त्यातूनच भगवंताला शरण जाण्याची बुद्धी होते. असे महाराज सांगत. 

प्रपंच सांभाळून भगवंताशी अनुसंधान ठेवण्यासाठी भगवंताचे नाम हे सर्वोष्कृष्ट साधन आहे. यासाठी नामाच्या नादी लागावे म्हणून महाराजांनी अथक प्रयत्न केले. महाराजांनी असंख्य प्रापंचिकांना खऱ्या समाधानाचा, आत्मज्ञानाचा मार्ग दाखविला. 

महाराजांच्या हृदयात विश्वामध्ये व्यापून राहणारा ऊँकार नामाचे रूप घेऊ झणत्कार करीत असे. महाराज सर्वांना सांगत असत, `मी तुमच्याजवळ आहे, असं मी म्हणतो त्यावेळी `मी' ही व्यक्ती नसून परमात्मास्वरूप तुमच्याजवळ आहे, असा त्याचा अर्थ असतो. 

एका नामामध्ये भगवंताच्या दर्शासाठी लागणारे सर्व गुण आहेत. जेथे नाम आहे तेथेच मी आहे. तुम्ही तुमच्यापाशी नाही, इतका मी तुमच्याजवळ आहे. मला हाक मारा की मी पुढे आहेच. तुम्ही सतत नाम घेत रहा म्हणजे तुम्हाला सोडून मला राहताच येणार नाही. मी निर्लेप नामामध्ये राहतो. तुम्ही निर्लेप, निर्विकल्प, नाम घ्या.