शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

देवाकडे काय मागावे, हेही संतांकडून शिकावे!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 4, 2021 19:28 IST

देवाच्या भेटीला जाताना काही ना काही मागायची आपल्याला सवयच लागली आहे. हे मागणे पारमार्थिक आहे का? तर तेही नाही. सतत कोणत्या न कोणत्या ऐहिक सुखाची मागणी करता करता ज्याने हे सुंदर आयुष्य दिले, त्याचा सहवास मागायला विसरून जाता़े

ज्योत्स्ना गाडगीळ

एका मंदिराबाहेर एक अपंग भिकारी पेटीवर बेसूर आवाजात गाणी म्हणत बसलेला असतो. त्याचे गाणे ऐकून कोणी त्याला पैसे देतो, तर कोणी नाही. जेवढे मिळते, त्यावर तो गुजराण करतो. त्याच मंदिरात एक शेठ रोज देवदर्शनाला येतो. त्याचा आवाज ऐकून त्रासलेले शेठजी भिकाऱ्याला हटकतात आणि म्हणतात, 'एवढ्या बेसूर आवाजात गाणी म्हणत भीक मागण्यापेक्षा काही काम कर. एवढे अपंग लोक पोटपाण्यासाठी झगडतात, तुला बसल्या जागी सगळे आयते पाहिजे काय? लाज वाटत नाही का भीक मागायला?'

त्यावर भिकारी म्हणतो, 'शेठजी, तुम्ही एवढे धडधाकट असून रोज देवाकडे भिकाऱ्यासारखे मागायला येता, मग तुम्हाला लाज नाही वाटत, तर मी कसली लाज बाळगू? आपण दोघेही सारखेच! एक मंदिराबाहेर भीक मागतो, दुसरा मंदिराच्या आत!'

हेही वाचा : देवापर्यंत पोहोचायचे आहे? तर नाम घेतलेच पाहिजे!

तात्पर्य, देवाच्या भेटीला जाताना काही ना काही मागायची आपल्याला सवयच लागली आहे. हे मागणे पारमार्थिक आहे का? तर तेही नाही. सतत कोणत्या न कोणत्या ऐहिक सुखाची मागणी करता करता ज्याने हे सुंदर आयुष्य दिले, त्याचा सहवास मागायला विसरून जाता़े आणि सुख दु:खाच्या भोवऱ्यात गुंतून राहतो. मात्र, चिरंतन सुख हवे असेल, तर देवाकडे काय मागावे, याबाबत संत तुकाराम महाराज सांगतात, 

सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया।गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ।विठो माऊलिये हाचि वर देई। संचरोनि राही हृदयामाजी।तुका म्हणे काही न मागे आणिक। तुझे पायी सुख सर्व आहे।

तुकाराम महाराज म्हणतात, देव द्यायलाच बसला आहे. परंतु जे सुख तुम्ही मागताय, त्यात समाधान मिळेल, याची शाश्वती नाही. कारण आपली मागण्यांची यादी न संपणारी आहे. त्यापेक्षा त्या भगवंताला मागून घ्या. तो सखा सोबती जवळ असेल, तर दु:खही सहज पचवता येईल. 

आपण थोरामोठ्यांची ओळख काढून त्यांच्याशी आपली सोयरिक जोडू पाहतो. आऊचा काऊ मावसभाऊसुद्धा आपल्याला चालतो. पण ही नाती कधी दगा देतील, सांगता येत नाही. मात्र पांडुरंग तसा नाही. तो शब्दाचा पक्का आहे. त्याच्याशी नाते जोडून घ्या. तो कसा जोडायचा? तर त्यालाच सांगायचे, की माझ्यासमोर सतत तुझे रूप राहू दे. ज्याप्रमाणे गरोदर स्त्रिया कृष्णाची छबी डोळ्यासमोर ठेवतात, विवाहेच्छुक मुले मुली सिनेतारकांसारखा जोडीदार हवा म्हणून आवडत्या नट नट्यांचे फोटो पाहतात, ज्यांना आपले आयुष्य आपल्या आदर्श व्यक्तीसारखे घडवायचे आहे, ते त्यांच्या तसबिरी पाहतात, त्यांचे विचार ऐकतात. तसेच ज्याचा सहवास आपल्याला निरंतर हवा, त्या परमेश्वराच्या रूपाचे सतत स्मरण करा. 

परमेश्वराच्या नित्य सान्निध्याने त्याचे गोड रूप आणि गोड नाम आपल्याला आनंद देईल. सगुण भक्ती करता करता निर्गुणत्वाची प्रचिती येउन 'सबाह्य अभ्यंतरी' तोच व्यापून राहिलेला आहे, याची जाणीव होईल. या सुखाची प्राप्ती झाली, की अन्य सुखांसाठी आपली ओंजळ देवापुढे जाणारच नाही. सुख, समाधान, आनंद यांचा ठेवा आपल्याला मिळेल. म्हणून देवाच्या भेटीला जाताना काही मागण्याऐवजी त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना आणि मागायचेच असेल तर भगवंताला मागून घ्या.

हेही वाचा : तुम्ही खडीसाखर बना, गुरु तुमच्याकडे धावत येतील!