शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

वर्तमानात जगायला शिका, तर आणि तरच आनंदी राहू शकाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:59 IST

आपल्या हातात केवळ वर्तमान आहे, याचे भान ठेवले तरच आयुष्याचा रसास्वाद आपण घेऊ शकू.

भविष्याच्या काळजीने आणि भूतकाळाच्या आठवणीने आपण वर्तमानात जगणे सोडून देतो आणि जे मिळाले आहे त्यात समाधान न मानता, जे मिळाले नाही, त्याबद्दल दु:ख करत बसतो. अशा स्वभावाने आपण आनंदी कधीच राहू शकणार नाही. यासाठी वेळीच बदल करायला हवा. तो कसा? ते या गोष्टीतून शिकुया...

एक बाई तरुण वयात विधवा होते. पतीच्या मृत्यूपश्चात पदरी असलेल्या दोन मुलींचे संगोपन करण्यासाठी अपार कष्ट घेते. मुलींना मोठे करते. त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न लावून देते. त्यांचा सुखाचा संसार बघण्यासाठी कधी एका लेकीकडे तर कधी दुसरीकडे आलटून पालटून राहते.

मुलींच्या घरची परिस्थितीही बेताची असते. म्हणून त्यादेखील व्यवसाय करुन संसाराला हातभार लावत असतात. एका मुलीचा व्यवसाय असतो छत्रीचा, तर दुसरीचा वाळवणाचे पदार्थ करण्याचा! त्यांचे घर छान चालावे एवढीच तिची इच्छा होती. परंतु बदलत्या ऋतूमानाचा परिणाम त्या दोघींच्या व्यवसायावर पडत होता. म्हणून त्यांची आई दरदिवशी देवाला दोष देत असे. पाऊस पडला तर छत्री विकणाऱ्या मुलीच्या व्यवसायाला फायदा होईल आणि कडक ऊन पडले, तर वाळवणे करणाऱ्या मुलीच्या व्यवसायाला फायदा होईल. तिची ईच्छा पूर्ण करण्यासाठी देव कधी ऊन तर कधी पाऊस पाडत असे. तरी तिचे रडगाणे सुरूच असे.

एक दिवस गावातून जाणाऱ्या एका साधुबाबांनी तिला रडण्याचे कारण विचारले, तर म्हणाली, `देवाने माझ्या वाट्याला कष्ट दिले, मी केले परंतु माझ्या मुलींना तरी सुख द्यायला हवे होते. पण तो मात्र त्यांच्या परिश्रमाच्या आड येत आहे. ऊन आणि पाऊस यांचा समतोल त्याला राखताच येत नाही, मग माझ्या मुलींनी व्यवसाय करायचा तरी कसा?'

यावर साधूबाबा म्हणाले, `ही मनुष्याची असमाधानीवृत्ती आहे. देवदयेने तुझ्या मुलींचा छान संसार सुरू आहे, व्यवसायही ठीक ठाक सुरू आहे, पण तुझ्या अवास्तव मागण्या देव कसा पूर्ण करणार? त्याला एकाच वेळी अनेकांचे पालन पोषण करायचे आहे. तरीदेखील तो आपली काळजी घेत आहे याचे समाधान मानायचे सोडून आपण रडत बसलो, तर कधीच सुखी होऊ शकणार नाही. म्हणून काळजी करणे सोड. ज्याप्रमाणे तू कष्ट करून तुझ्या मुलींच्या आयुष्याचे सोने केलेस, तसे त्याही त्यांचे भविष्य घडवतील. म्हणून काळजी करणे सोड आणि वर्तमानात जगायला शिक, तरच आयुष्याचा आनंद घेऊ शकशील.