शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
4
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
5
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
6
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
7
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
8
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
9
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
10
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
11
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
12
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
13
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
14
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
15
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
16
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
17
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
18
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
19
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
20
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमानात जगायला शिका, तर आणि तरच आनंदी राहू शकाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:59 IST

आपल्या हातात केवळ वर्तमान आहे, याचे भान ठेवले तरच आयुष्याचा रसास्वाद आपण घेऊ शकू.

भविष्याच्या काळजीने आणि भूतकाळाच्या आठवणीने आपण वर्तमानात जगणे सोडून देतो आणि जे मिळाले आहे त्यात समाधान न मानता, जे मिळाले नाही, त्याबद्दल दु:ख करत बसतो. अशा स्वभावाने आपण आनंदी कधीच राहू शकणार नाही. यासाठी वेळीच बदल करायला हवा. तो कसा? ते या गोष्टीतून शिकुया...

एक बाई तरुण वयात विधवा होते. पतीच्या मृत्यूपश्चात पदरी असलेल्या दोन मुलींचे संगोपन करण्यासाठी अपार कष्ट घेते. मुलींना मोठे करते. त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न लावून देते. त्यांचा सुखाचा संसार बघण्यासाठी कधी एका लेकीकडे तर कधी दुसरीकडे आलटून पालटून राहते.

मुलींच्या घरची परिस्थितीही बेताची असते. म्हणून त्यादेखील व्यवसाय करुन संसाराला हातभार लावत असतात. एका मुलीचा व्यवसाय असतो छत्रीचा, तर दुसरीचा वाळवणाचे पदार्थ करण्याचा! त्यांचे घर छान चालावे एवढीच तिची इच्छा होती. परंतु बदलत्या ऋतूमानाचा परिणाम त्या दोघींच्या व्यवसायावर पडत होता. म्हणून त्यांची आई दरदिवशी देवाला दोष देत असे. पाऊस पडला तर छत्री विकणाऱ्या मुलीच्या व्यवसायाला फायदा होईल आणि कडक ऊन पडले, तर वाळवणे करणाऱ्या मुलीच्या व्यवसायाला फायदा होईल. तिची ईच्छा पूर्ण करण्यासाठी देव कधी ऊन तर कधी पाऊस पाडत असे. तरी तिचे रडगाणे सुरूच असे.

एक दिवस गावातून जाणाऱ्या एका साधुबाबांनी तिला रडण्याचे कारण विचारले, तर म्हणाली, `देवाने माझ्या वाट्याला कष्ट दिले, मी केले परंतु माझ्या मुलींना तरी सुख द्यायला हवे होते. पण तो मात्र त्यांच्या परिश्रमाच्या आड येत आहे. ऊन आणि पाऊस यांचा समतोल त्याला राखताच येत नाही, मग माझ्या मुलींनी व्यवसाय करायचा तरी कसा?'

यावर साधूबाबा म्हणाले, `ही मनुष्याची असमाधानीवृत्ती आहे. देवदयेने तुझ्या मुलींचा छान संसार सुरू आहे, व्यवसायही ठीक ठाक सुरू आहे, पण तुझ्या अवास्तव मागण्या देव कसा पूर्ण करणार? त्याला एकाच वेळी अनेकांचे पालन पोषण करायचे आहे. तरीदेखील तो आपली काळजी घेत आहे याचे समाधान मानायचे सोडून आपण रडत बसलो, तर कधीच सुखी होऊ शकणार नाही. म्हणून काळजी करणे सोड. ज्याप्रमाणे तू कष्ट करून तुझ्या मुलींच्या आयुष्याचे सोने केलेस, तसे त्याही त्यांचे भविष्य घडवतील. म्हणून काळजी करणे सोड आणि वर्तमानात जगायला शिक, तरच आयुष्याचा आनंद घेऊ शकशील.