शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

जपाची माळ ओढताना 'तर्जनी'चा स्पर्श का टाळावा, याबद्दलचे शास्त्रसंकेत जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 17:33 IST

आपल्या भारतीय संस्कृतीत शास्त्राकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, की जगात इतरत्र अशी व्यवस्था कोठेही नाही. बोटांचे बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितले आहे. 

मंत्राचा जप करताना माळ हातात असली पाहिजे. ती माळ कोणास दिसता कामा नये. प्रत्येक मणी कसा ओढावा, याचेही शास्त्र आहे. या प्रत्येकाचे शास्त्र असण्याचे कारण, यातली प्रत्येक गोष्ट फलास कारणीभूत आहे. एकशे आठ मण्यांची माला असते. एकशे आठच मणी का, यालाही कारण आहे.  प्रत्येक मणी ओढायचा तो मध्यमा, अनामिका व अंगुष्ठ या तीन बोटानीच ओढावा. पहिले बोट म्हणजे तर्जनी लागू नये. करंगळी लागली, तर एकवेळ चालेल. 

आपल्या भारतीय संस्कृतीत शास्त्राकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, की जगात इतरत्र अशी व्यवस्था कोठेही नाही. बोटांचे बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितले आहे. 

तर्जनी हे बोट पितरांचे कार्य करण्यासाठी वापरले जाते. मध्यमा हे बोट माणसांचे आहे. अनामिका हे बोट देवाचे आहे व कनिष्ठिका हे बोट ऋषींचे आहे. म्हणून पद्धत अशी आहे, की सपिंड श्राद्ध विधी असताना पितरांना किंवा त्यावेळी ब्राह्मणांच्या हाताला जे गंध लावायचे ते तर्जनी या बोटाने लावायचे. स्वत:ला गंध मधल्या बोटांनी लावायचे. तर्पण करांगुळीच्या मुळावरून पाणी सोडून करायचे. अंगठा सोडून बाकीच्या चारही बोटांवरून संकल्पाचे पाणी सोडणे याला देवतीर्थ म्हटले आहे.

देवतीर्थाने संकल्प करायचा. मनगटाला लागून असलेला तळहाताचा भाग याला ब्राह्मतीर्थ म्हटले आहे. करांगुळीच्या मुळावरून पाणी सोडणे याला ऋषीतीर्थ म्हटले आहे. तर्जनी व अंगठा यांच्यामधून पाणी सोडणे याला पितृतीर्थ म्हटले आहे. 

असे प्रत्येक बोटाचे महत्त्व पाहता, अध्यात्मिक उन्नतीसाठी जपसाधना करताना मध्यमा, अनामिका आणि अंगठा या तीन बोटांनीच मणी ओढावा, असे शास्त्रकार सांगतात.