शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जपाची माळ ओढताना 'तर्जनी'चा स्पर्श का टाळावा, याबद्दलचे शास्त्रसंकेत जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 17:33 IST

आपल्या भारतीय संस्कृतीत शास्त्राकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, की जगात इतरत्र अशी व्यवस्था कोठेही नाही. बोटांचे बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितले आहे. 

मंत्राचा जप करताना माळ हातात असली पाहिजे. ती माळ कोणास दिसता कामा नये. प्रत्येक मणी कसा ओढावा, याचेही शास्त्र आहे. या प्रत्येकाचे शास्त्र असण्याचे कारण, यातली प्रत्येक गोष्ट फलास कारणीभूत आहे. एकशे आठ मण्यांची माला असते. एकशे आठच मणी का, यालाही कारण आहे.  प्रत्येक मणी ओढायचा तो मध्यमा, अनामिका व अंगुष्ठ या तीन बोटानीच ओढावा. पहिले बोट म्हणजे तर्जनी लागू नये. करंगळी लागली, तर एकवेळ चालेल. 

आपल्या भारतीय संस्कृतीत शास्त्राकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, की जगात इतरत्र अशी व्यवस्था कोठेही नाही. बोटांचे बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितले आहे. 

तर्जनी हे बोट पितरांचे कार्य करण्यासाठी वापरले जाते. मध्यमा हे बोट माणसांचे आहे. अनामिका हे बोट देवाचे आहे व कनिष्ठिका हे बोट ऋषींचे आहे. म्हणून पद्धत अशी आहे, की सपिंड श्राद्ध विधी असताना पितरांना किंवा त्यावेळी ब्राह्मणांच्या हाताला जे गंध लावायचे ते तर्जनी या बोटाने लावायचे. स्वत:ला गंध मधल्या बोटांनी लावायचे. तर्पण करांगुळीच्या मुळावरून पाणी सोडून करायचे. अंगठा सोडून बाकीच्या चारही बोटांवरून संकल्पाचे पाणी सोडणे याला देवतीर्थ म्हटले आहे.

देवतीर्थाने संकल्प करायचा. मनगटाला लागून असलेला तळहाताचा भाग याला ब्राह्मतीर्थ म्हटले आहे. करांगुळीच्या मुळावरून पाणी सोडणे याला ऋषीतीर्थ म्हटले आहे. तर्जनी व अंगठा यांच्यामधून पाणी सोडणे याला पितृतीर्थ म्हटले आहे. 

असे प्रत्येक बोटाचे महत्त्व पाहता, अध्यात्मिक उन्नतीसाठी जपसाधना करताना मध्यमा, अनामिका आणि अंगठा या तीन बोटांनीच मणी ओढावा, असे शास्त्रकार सांगतात.