शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

जपाची माळ ओढताना 'तर्जनी'चा स्पर्श का टाळावा, याबद्दलचे शास्त्रसंकेत जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 17:33 IST

आपल्या भारतीय संस्कृतीत शास्त्राकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, की जगात इतरत्र अशी व्यवस्था कोठेही नाही. बोटांचे बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितले आहे. 

मंत्राचा जप करताना माळ हातात असली पाहिजे. ती माळ कोणास दिसता कामा नये. प्रत्येक मणी कसा ओढावा, याचेही शास्त्र आहे. या प्रत्येकाचे शास्त्र असण्याचे कारण, यातली प्रत्येक गोष्ट फलास कारणीभूत आहे. एकशे आठ मण्यांची माला असते. एकशे आठच मणी का, यालाही कारण आहे.  प्रत्येक मणी ओढायचा तो मध्यमा, अनामिका व अंगुष्ठ या तीन बोटानीच ओढावा. पहिले बोट म्हणजे तर्जनी लागू नये. करंगळी लागली, तर एकवेळ चालेल. 

आपल्या भारतीय संस्कृतीत शास्त्राकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, की जगात इतरत्र अशी व्यवस्था कोठेही नाही. बोटांचे बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितले आहे. 

तर्जनी हे बोट पितरांचे कार्य करण्यासाठी वापरले जाते. मध्यमा हे बोट माणसांचे आहे. अनामिका हे बोट देवाचे आहे व कनिष्ठिका हे बोट ऋषींचे आहे. म्हणून पद्धत अशी आहे, की सपिंड श्राद्ध विधी असताना पितरांना किंवा त्यावेळी ब्राह्मणांच्या हाताला जे गंध लावायचे ते तर्जनी या बोटाने लावायचे. स्वत:ला गंध मधल्या बोटांनी लावायचे. तर्पण करांगुळीच्या मुळावरून पाणी सोडून करायचे. अंगठा सोडून बाकीच्या चारही बोटांवरून संकल्पाचे पाणी सोडणे याला देवतीर्थ म्हटले आहे.

देवतीर्थाने संकल्प करायचा. मनगटाला लागून असलेला तळहाताचा भाग याला ब्राह्मतीर्थ म्हटले आहे. करांगुळीच्या मुळावरून पाणी सोडणे याला ऋषीतीर्थ म्हटले आहे. तर्जनी व अंगठा यांच्यामधून पाणी सोडणे याला पितृतीर्थ म्हटले आहे. 

असे प्रत्येक बोटाचे महत्त्व पाहता, अध्यात्मिक उन्नतीसाठी जपसाधना करताना मध्यमा, अनामिका आणि अंगठा या तीन बोटांनीच मणी ओढावा, असे शास्त्रकार सांगतात.