शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Last Solar Eclipse of 2021 : सूर्यग्रहणातील नियम पाळा आणि आरोग्यावरील दुष्परिणाम टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 17:08 IST

Last Solar Eclipse of 2021 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण: सूर्यग्रहणावर राहूची सावली राहील. सूर्यग्रहण काळात अशुभ योग राहील. या ग्रहणाचा तुमच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, कसा ते जाणून घ्या. 

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण शनिवारी ४ डिसेंबर रोजी आहे. याच दिवशी शनी अमावस्यादेखील आहे. याशिवाय या ग्रहणावर राहूची सावलीही राहील. सूर्यग्रहणाच्या काळात सूर्यावर राहू आणि केतूचा प्रभाव अधिक असतो.त्याचे पडसाद पृथ्वीवरील जीवमात्रांवर पडतात म्हणून ग्रहण काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या असा सल्ला दिला जातो. 

भारतात ग्रहण दिसणार नाही, पण... 

हे सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी सकाळी १०. ५९ मिनिटांपासून ते दुपारी ०३.०७ मिनिटांपर्यंत राहील. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा सुतक काळही वैध राहणार नाही. हे खग्रास सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण अटलांटिक महासागर आणि दक्षिण हिंदी महासागर यांसारख्या दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये दिसणार आहे. या ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावरही होणार आहे. ग्रहण दरम्यान, असे मानले जाते की याचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते पाहूया. 

अन्नावर परिणाम 

ग्रहण काळात हवा दुषित होते हे आपणा सर्वांना माहित आहे. पण ग्रहणापूर्वीही तीन चार प्रहर हवा दूषित होते. ग्रहणापूर्वी हवा दूषित होते, म्हणून त्यापूर्वी वेध पाळावा व भोजन करू नये, असे शास्त्र आहे. या काळात हवा दूषित होते हे आता वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. 

ग्रहणकाळात पाणीसुद्धा बिघडते, म्हणून ते पिऊ नये असे शास्त्रज्ञ सांगतात. असे दूषित अन्न आपण खाल्ले तर काय होईल? मानवी जिवनात वास्तविक खरा विचार कोणता असेल तर तो आहाराचा! आणि आज नेमका तोच विचार राहिला नाही. ज्या अन्नाचे आपल्या शरीरात सप्तधातु तयार होतात त्या अन्नाचा विचार अजिबात होऊ नये, हे चुकीचे आहे. म्हणून पूर्वीचे लोक ग्रहणकाळात भोजन करत नसत तसेच साठवलेले पाणी फेकून देत असत. परंतु अन्न पाण्याचा एवढा अपव्यय टाळण्यासाठी शास्त्राने तुळशी पत्र ठेवण्याचा पर्याय सुचवला आहे, निदान आपण त्याचा वापर अवश्य केला पाहिजे. 

मानसिक क्षमता प्रभावित

असेही मानले जाते की ग्रहण काळात सूर्याच्या प्रखर किरणांचा मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे वातावरणात औदासिन्य पसरते. अशा काळात मन प्रसन्न ठेवण्यासाठी देवाचा जप करावा. तसेच गर्भवतींनी विश्रांती घ्यावी किंवा स्तोत्र पठण, नामस्मरण, चांगल्या विषयाचे वाचन करावे. त्यामुळे मन शांत राहील व गर्भावर कोणताही परिणाम होणार नाही. 

डोळ्यांवर वाईट परिणाम

ग्रहण पाहण्यासाठी प्रत्येकाने सनग्लासेस घालण्याचा सल्ला दिला आहे. असे मानले जाते की सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित नाही. दृष्टिदोष निर्माण होतो. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक ठरू शकते, असेही वैज्ञानिकांचे मत आहे.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण