शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Last Solar Eclipse of 2021 : सूर्यग्रहणातील नियम पाळा आणि आरोग्यावरील दुष्परिणाम टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 17:08 IST

Last Solar Eclipse of 2021 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण: सूर्यग्रहणावर राहूची सावली राहील. सूर्यग्रहण काळात अशुभ योग राहील. या ग्रहणाचा तुमच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, कसा ते जाणून घ्या. 

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण शनिवारी ४ डिसेंबर रोजी आहे. याच दिवशी शनी अमावस्यादेखील आहे. याशिवाय या ग्रहणावर राहूची सावलीही राहील. सूर्यग्रहणाच्या काळात सूर्यावर राहू आणि केतूचा प्रभाव अधिक असतो.त्याचे पडसाद पृथ्वीवरील जीवमात्रांवर पडतात म्हणून ग्रहण काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या असा सल्ला दिला जातो. 

भारतात ग्रहण दिसणार नाही, पण... 

हे सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी सकाळी १०. ५९ मिनिटांपासून ते दुपारी ०३.०७ मिनिटांपर्यंत राहील. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा सुतक काळही वैध राहणार नाही. हे खग्रास सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण अटलांटिक महासागर आणि दक्षिण हिंदी महासागर यांसारख्या दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये दिसणार आहे. या ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावरही होणार आहे. ग्रहण दरम्यान, असे मानले जाते की याचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते पाहूया. 

अन्नावर परिणाम 

ग्रहण काळात हवा दुषित होते हे आपणा सर्वांना माहित आहे. पण ग्रहणापूर्वीही तीन चार प्रहर हवा दूषित होते. ग्रहणापूर्वी हवा दूषित होते, म्हणून त्यापूर्वी वेध पाळावा व भोजन करू नये, असे शास्त्र आहे. या काळात हवा दूषित होते हे आता वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. 

ग्रहणकाळात पाणीसुद्धा बिघडते, म्हणून ते पिऊ नये असे शास्त्रज्ञ सांगतात. असे दूषित अन्न आपण खाल्ले तर काय होईल? मानवी जिवनात वास्तविक खरा विचार कोणता असेल तर तो आहाराचा! आणि आज नेमका तोच विचार राहिला नाही. ज्या अन्नाचे आपल्या शरीरात सप्तधातु तयार होतात त्या अन्नाचा विचार अजिबात होऊ नये, हे चुकीचे आहे. म्हणून पूर्वीचे लोक ग्रहणकाळात भोजन करत नसत तसेच साठवलेले पाणी फेकून देत असत. परंतु अन्न पाण्याचा एवढा अपव्यय टाळण्यासाठी शास्त्राने तुळशी पत्र ठेवण्याचा पर्याय सुचवला आहे, निदान आपण त्याचा वापर अवश्य केला पाहिजे. 

मानसिक क्षमता प्रभावित

असेही मानले जाते की ग्रहण काळात सूर्याच्या प्रखर किरणांचा मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे वातावरणात औदासिन्य पसरते. अशा काळात मन प्रसन्न ठेवण्यासाठी देवाचा जप करावा. तसेच गर्भवतींनी विश्रांती घ्यावी किंवा स्तोत्र पठण, नामस्मरण, चांगल्या विषयाचे वाचन करावे. त्यामुळे मन शांत राहील व गर्भावर कोणताही परिणाम होणार नाही. 

डोळ्यांवर वाईट परिणाम

ग्रहण पाहण्यासाठी प्रत्येकाने सनग्लासेस घालण्याचा सल्ला दिला आहे. असे मानले जाते की सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित नाही. दृष्टिदोष निर्माण होतो. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक ठरू शकते, असेही वैज्ञानिकांचे मत आहे.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण