शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

जमीन टाकाऊ नसते, त्यात योग्य बियाणे रुजवावे लागते!- गौर गोपाल दास

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 26, 2021 10:24 IST

धीर देणारे शब्द प्रत्येकाला आयुष्यात हवे असतात. या शब्दांना प्रयत्नांची जोड मिळाली, तर ओसाड जमिनीवरही बाग फुलायला वेळ लागत नाही.

'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात?' गोट्या मालिकेचे हे शीर्षक गीत आजही आपल्या मनात रुंजी घालते. या गीताचा मुखडा आपल्याला मोठी शिकवण देऊन जातो. ती शिकवण कोणती, हे आध्यात्मिक वक्ते गौर गोपाल दास प्रभू यांच्या शब्दात समजून घेऊ.

एक मुलगा अतिशय मेहनती असतो. परंतु अपयश त्याच्या पाचवीला पुजलेले असते. तो जेमतेम पदवीपर्यंतचे शिक्षण घेतो आणि अपार कष्ट घेऊनही काठावर पास होतो. योग्य वयात त्याच्या घरचे त्याचे लग्न लावून देतात. सुदैवाने याबाबतीत त्याचे भाग्य त्याला साथ देते. त्याला अतिशय गुणी पत्नी मिळते. 

लग्नानंतर जबाबदारी वाढल्याने तो नोकरीसाठी धडपड करू लागतो. परंतु जिथे रूजू होतो, तिथे दोन ते तीन महिन्यांच्यावर टिकत नाही. बायको धीर देते. तो पुन्हा प्रयत्न करतो. लहान मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करतो. परंतु मुलांना सांभाळण्याचे, शिकवण्याचे कसब आणि अनुभव त्याच्याकडे नसल्यामुळे तो नोकरीतून काढला जातो. 

आपल्या वाट्याला आलेली अवहेलना आणखी कुणाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून लहान वयातच मुलांना सुयोग्य पद्धतीने घडवावे, असे त्याला मनापासून वाटते. त्याच्या निर्णयाला त्याची बायको दुजोरा देते. तो मूक बधीर मुलांना शिकवण्याचे प्रशिक्षण घेतो आणि काही काळातच स्वत:ची छोटीशी शाळा काढतो. एका खोलीत सुरू झालेल्या त्या शाळेला छान प्रतिसाद मिळतो. त्याचा हुरूप वाढतो. तो आणखी एक शाखा उघडतो. तिथेही यश मिळते. लोकांची विचारणा होऊ लागते. आपल्या शिक्षण कौशल्याला वाढती मागणी पाहून तो अनेक शाखा उघडतो आणि जोडीलाच मूकबधीर मुलांसाठी यंत्र विकायला सुरुवात करतो. त्याची या व्यवसायावर एवढी घट्ट पकड बसते, की पाहता पाहता तो अब्जाधीश होतो. अनेक पुरस्कारांनी गौरवला जातो. तेव्हा एक दिवस बायकोला विचारतो,

'माझ्या पडत्या काळात, मी अपयशाने पार गर्भगळीत झालेलो असताना तू एवढी खंबीर कशी राहिलीस? तुझ्यात एवढा धीर, सकारात्मकता, आत्मविश्वास कुठून आला?'

यावर स्मित हास्य करत नवऱ्याचा हात हातात घेत बायको म्हणाली, `हा आत्मविश्वास मला तुमच्या कर्तृत्वातून मिळाला. तुमची धडपड मी पाहिली. तुमची मेहनतीची तयारी पाहिली. ज्याची कष्ट करण्याची तयारी असते, तोच कितीही अपयश आले, तरी पुन्हा उभा राहू शकतो. कोणतीही जमीन टाकाऊ नसते. त्यात योग्य बी पेरावे लागते. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न, प्रयोग सातत्याने करावे लागतात. तुम्हाला जमीनित गहू घ्यायचा आहे? लागवड करा. पिक आले नाही, तर धान्य पेरून पहा. धान्य उगवले नाही, तर भाज्या पेरून पहा, भाज्याही उगवल्या नाहीत, तर फुलाची शेती करून पहा. एखादे तरी बियाणे त्या जमीनीच्या गर्भात नक्कीच रूजेल. तुम्ही वेगवेगळी बियाणे पेरून पाहिलीत. एक बियाणे रुजले, फोफावले, भरघोस पिक आले. यात श्रेय तुमच्या मेहनतीचे आहे. मी फक्त तुम्हाला वेळोवेळी धीर दिला.'

बायकोचे शब्द ऐकून ती व्यक्ती भारावून गेली. हेच धीर देणारे शब्द प्रत्येकाला आयुष्यात हवे असतात. या शब्दांना प्रयत्नांची जोड मिळाली, तर ओसाड जमिनीवरही बाग फुलायला वेळ लागत नाही.

'बीज अंकुरे अंकुरे' या गीतातून कवी मधुकर अरकडे यांनादेखील बहुधा हीच गोष्ट आपल्या मनात रुजवायची असेल...!