शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जमीन टाकाऊ नसते, त्यात योग्य बियाणे रुजवावे लागते!- गौर गोपाल दास

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 26, 2021 10:24 IST

धीर देणारे शब्द प्रत्येकाला आयुष्यात हवे असतात. या शब्दांना प्रयत्नांची जोड मिळाली, तर ओसाड जमिनीवरही बाग फुलायला वेळ लागत नाही.

'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात?' गोट्या मालिकेचे हे शीर्षक गीत आजही आपल्या मनात रुंजी घालते. या गीताचा मुखडा आपल्याला मोठी शिकवण देऊन जातो. ती शिकवण कोणती, हे आध्यात्मिक वक्ते गौर गोपाल दास प्रभू यांच्या शब्दात समजून घेऊ.

एक मुलगा अतिशय मेहनती असतो. परंतु अपयश त्याच्या पाचवीला पुजलेले असते. तो जेमतेम पदवीपर्यंतचे शिक्षण घेतो आणि अपार कष्ट घेऊनही काठावर पास होतो. योग्य वयात त्याच्या घरचे त्याचे लग्न लावून देतात. सुदैवाने याबाबतीत त्याचे भाग्य त्याला साथ देते. त्याला अतिशय गुणी पत्नी मिळते. 

लग्नानंतर जबाबदारी वाढल्याने तो नोकरीसाठी धडपड करू लागतो. परंतु जिथे रूजू होतो, तिथे दोन ते तीन महिन्यांच्यावर टिकत नाही. बायको धीर देते. तो पुन्हा प्रयत्न करतो. लहान मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करतो. परंतु मुलांना सांभाळण्याचे, शिकवण्याचे कसब आणि अनुभव त्याच्याकडे नसल्यामुळे तो नोकरीतून काढला जातो. 

आपल्या वाट्याला आलेली अवहेलना आणखी कुणाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून लहान वयातच मुलांना सुयोग्य पद्धतीने घडवावे, असे त्याला मनापासून वाटते. त्याच्या निर्णयाला त्याची बायको दुजोरा देते. तो मूक बधीर मुलांना शिकवण्याचे प्रशिक्षण घेतो आणि काही काळातच स्वत:ची छोटीशी शाळा काढतो. एका खोलीत सुरू झालेल्या त्या शाळेला छान प्रतिसाद मिळतो. त्याचा हुरूप वाढतो. तो आणखी एक शाखा उघडतो. तिथेही यश मिळते. लोकांची विचारणा होऊ लागते. आपल्या शिक्षण कौशल्याला वाढती मागणी पाहून तो अनेक शाखा उघडतो आणि जोडीलाच मूकबधीर मुलांसाठी यंत्र विकायला सुरुवात करतो. त्याची या व्यवसायावर एवढी घट्ट पकड बसते, की पाहता पाहता तो अब्जाधीश होतो. अनेक पुरस्कारांनी गौरवला जातो. तेव्हा एक दिवस बायकोला विचारतो,

'माझ्या पडत्या काळात, मी अपयशाने पार गर्भगळीत झालेलो असताना तू एवढी खंबीर कशी राहिलीस? तुझ्यात एवढा धीर, सकारात्मकता, आत्मविश्वास कुठून आला?'

यावर स्मित हास्य करत नवऱ्याचा हात हातात घेत बायको म्हणाली, `हा आत्मविश्वास मला तुमच्या कर्तृत्वातून मिळाला. तुमची धडपड मी पाहिली. तुमची मेहनतीची तयारी पाहिली. ज्याची कष्ट करण्याची तयारी असते, तोच कितीही अपयश आले, तरी पुन्हा उभा राहू शकतो. कोणतीही जमीन टाकाऊ नसते. त्यात योग्य बी पेरावे लागते. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न, प्रयोग सातत्याने करावे लागतात. तुम्हाला जमीनित गहू घ्यायचा आहे? लागवड करा. पिक आले नाही, तर धान्य पेरून पहा. धान्य उगवले नाही, तर भाज्या पेरून पहा, भाज्याही उगवल्या नाहीत, तर फुलाची शेती करून पहा. एखादे तरी बियाणे त्या जमीनीच्या गर्भात नक्कीच रूजेल. तुम्ही वेगवेगळी बियाणे पेरून पाहिलीत. एक बियाणे रुजले, फोफावले, भरघोस पिक आले. यात श्रेय तुमच्या मेहनतीचे आहे. मी फक्त तुम्हाला वेळोवेळी धीर दिला.'

बायकोचे शब्द ऐकून ती व्यक्ती भारावून गेली. हेच धीर देणारे शब्द प्रत्येकाला आयुष्यात हवे असतात. या शब्दांना प्रयत्नांची जोड मिळाली, तर ओसाड जमिनीवरही बाग फुलायला वेळ लागत नाही.

'बीज अंकुरे अंकुरे' या गीतातून कवी मधुकर अरकडे यांनादेखील बहुधा हीच गोष्ट आपल्या मनात रुजवायची असेल...!