शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जमीन टाकाऊ नसते, त्यात योग्य बियाणे रुजवावे लागते!- गौर गोपाल दास

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 26, 2021 10:24 IST

धीर देणारे शब्द प्रत्येकाला आयुष्यात हवे असतात. या शब्दांना प्रयत्नांची जोड मिळाली, तर ओसाड जमिनीवरही बाग फुलायला वेळ लागत नाही.

'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात?' गोट्या मालिकेचे हे शीर्षक गीत आजही आपल्या मनात रुंजी घालते. या गीताचा मुखडा आपल्याला मोठी शिकवण देऊन जातो. ती शिकवण कोणती, हे आध्यात्मिक वक्ते गौर गोपाल दास प्रभू यांच्या शब्दात समजून घेऊ.

एक मुलगा अतिशय मेहनती असतो. परंतु अपयश त्याच्या पाचवीला पुजलेले असते. तो जेमतेम पदवीपर्यंतचे शिक्षण घेतो आणि अपार कष्ट घेऊनही काठावर पास होतो. योग्य वयात त्याच्या घरचे त्याचे लग्न लावून देतात. सुदैवाने याबाबतीत त्याचे भाग्य त्याला साथ देते. त्याला अतिशय गुणी पत्नी मिळते. 

लग्नानंतर जबाबदारी वाढल्याने तो नोकरीसाठी धडपड करू लागतो. परंतु जिथे रूजू होतो, तिथे दोन ते तीन महिन्यांच्यावर टिकत नाही. बायको धीर देते. तो पुन्हा प्रयत्न करतो. लहान मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करतो. परंतु मुलांना सांभाळण्याचे, शिकवण्याचे कसब आणि अनुभव त्याच्याकडे नसल्यामुळे तो नोकरीतून काढला जातो. 

आपल्या वाट्याला आलेली अवहेलना आणखी कुणाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून लहान वयातच मुलांना सुयोग्य पद्धतीने घडवावे, असे त्याला मनापासून वाटते. त्याच्या निर्णयाला त्याची बायको दुजोरा देते. तो मूक बधीर मुलांना शिकवण्याचे प्रशिक्षण घेतो आणि काही काळातच स्वत:ची छोटीशी शाळा काढतो. एका खोलीत सुरू झालेल्या त्या शाळेला छान प्रतिसाद मिळतो. त्याचा हुरूप वाढतो. तो आणखी एक शाखा उघडतो. तिथेही यश मिळते. लोकांची विचारणा होऊ लागते. आपल्या शिक्षण कौशल्याला वाढती मागणी पाहून तो अनेक शाखा उघडतो आणि जोडीलाच मूकबधीर मुलांसाठी यंत्र विकायला सुरुवात करतो. त्याची या व्यवसायावर एवढी घट्ट पकड बसते, की पाहता पाहता तो अब्जाधीश होतो. अनेक पुरस्कारांनी गौरवला जातो. तेव्हा एक दिवस बायकोला विचारतो,

'माझ्या पडत्या काळात, मी अपयशाने पार गर्भगळीत झालेलो असताना तू एवढी खंबीर कशी राहिलीस? तुझ्यात एवढा धीर, सकारात्मकता, आत्मविश्वास कुठून आला?'

यावर स्मित हास्य करत नवऱ्याचा हात हातात घेत बायको म्हणाली, `हा आत्मविश्वास मला तुमच्या कर्तृत्वातून मिळाला. तुमची धडपड मी पाहिली. तुमची मेहनतीची तयारी पाहिली. ज्याची कष्ट करण्याची तयारी असते, तोच कितीही अपयश आले, तरी पुन्हा उभा राहू शकतो. कोणतीही जमीन टाकाऊ नसते. त्यात योग्य बी पेरावे लागते. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न, प्रयोग सातत्याने करावे लागतात. तुम्हाला जमीनित गहू घ्यायचा आहे? लागवड करा. पिक आले नाही, तर धान्य पेरून पहा. धान्य उगवले नाही, तर भाज्या पेरून पहा, भाज्याही उगवल्या नाहीत, तर फुलाची शेती करून पहा. एखादे तरी बियाणे त्या जमीनीच्या गर्भात नक्कीच रूजेल. तुम्ही वेगवेगळी बियाणे पेरून पाहिलीत. एक बियाणे रुजले, फोफावले, भरघोस पिक आले. यात श्रेय तुमच्या मेहनतीचे आहे. मी फक्त तुम्हाला वेळोवेळी धीर दिला.'

बायकोचे शब्द ऐकून ती व्यक्ती भारावून गेली. हेच धीर देणारे शब्द प्रत्येकाला आयुष्यात हवे असतात. या शब्दांना प्रयत्नांची जोड मिळाली, तर ओसाड जमिनीवरही बाग फुलायला वेळ लागत नाही.

'बीज अंकुरे अंकुरे' या गीतातून कवी मधुकर अरकडे यांनादेखील बहुधा हीच गोष्ट आपल्या मनात रुजवायची असेल...!