शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'विटाळ' या संकल्पनेबद्दल संत चोखामेळा यांचे परखड मत काय होते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 10:41 IST

सुतक-सोहेर, विटाळ हे मानवी देहाला चिकटलेले विकार आहेत, देव निर्लेप आहे, मग त्याला विटाळ होतो का, यावर संतांनी केलेले भाष्य पहा. 

ईश्वर हा नित्य, शुद्ध, मुक्त व आनंददायी असतो. सोवळे ओवळे असते, ते मनुष्याला, ईश्वराला नाही. मात्र, लोकांनीच काही संभ्रम निर्माण करून ठेवले आणि त्यातच अडकून राहिले. अशा लोकांना सोवळ्याओवळ्या पलीकडच्या देवाची ओळख करून देण्यासाठी संत चोखामेळा यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या अमोघ शैलीतून देवाची खरी ओळख करून दिली. 

ते म्हणतात, की हा विटाळ आला तरी कोठून? पूर्वजन्मीच्या कर्मानुसार हा विटाळ वंशपरंपरेने आपणास आला काय? पूर्वजन्मी तरी कर्म करण्याची बुद्धी कोणी दिली? या प्रश्नांचा धागा लांबवताना तो थेट ब्रह्मतत्त्वापर्यंत जाऊन पोहोचतो. या एका तत्त्वापासून सर्व सृष्टीची निर्मिती झाली. मग एक सोवळा व दुसरा ओवळा, असा भेद कसा झाला? एका बीजापासून निर्माण झालेल्या वृक्षास फळे सारखीच गोड येणार. दोन-तीन नासकी निघाली, तर बीजातच दोष आहे, अशी शंका घेणार का?

ही शंका चोखोबांनी बोलून दाखवली आहे. विटाळ असेल, तर तो सर्वांनाच आहे. सोवळा कोण? ओवळा कोण? हे सांगणे अवघड आहे.चोखा म्हणे मज नवल वाटते, विटाळापरते आहे कोण?

सर्वांचा जन्म विटाळातूनच होता, असे त्यांना म्हणायचे आहे. त्यांच्या मते, सोवळ्याओवळ्यापलीकडचा एक विठ्ठल आहे.चोखा म्हणे माझा विठ्ठल सोवळा, अरूपे आगळा विटेवरी।

म्हणून कोणाच्या संगतीने देव विटाळतो व पाण्याने शुद्ध होतो, हे त्यांना मान्य नाही. जो सोवळा आहे, त्यास विठ्ठल सोवळा वाटतो आणि ओवळ्याच्या ठिकाणी तो ओवळा आहे. खरे पाहता देव सोवळ्याओवळ्याच्या पलीकडचा आहे. चोखोबा म्हणतात की-

नीचाचे संगती देवो विटाळला,पाणीये प्रक्षाळोनि सोवळा केला,मुळिच सोवळा कोठे तो गोवळा, पाहत पाहणे डोळा जयापरी,सोवळ्याचे ठाई सोवळा आहे,वोवळ्या ठाई वोवळा का न राहे,चोखा म्हणजे देव दोहाच्या वेगळा,तोचि म्या देखिला दृष्टीभरी।

भगवंताला नियमांच्या चौकटीत न अडकवता, आपणही चौकटीपलीकडचा निर्गुण परमात्मा बघायला शिकले पाहिजे. एवढेच काय, तर संत म्हणतात, चराचरात भगवंताला बघायला शिका, म्हणजे मनातून भेदाभेद दूर होईल आणि परमात्म्याचे स्वरूप नजरेस पडेल. असा सोवळ्या ओवळ्या पलीकडचा देव सर्वांना भेटावा, हीच तळमळ चोखोबांच्या या अभंगातून प्रगट होत आहे. 

आपण जी बंधने किंवा नियम पाळतो ते आपल्या मनाची शुचिर्भूतता व्हावी म्हणून! अंघोळ केल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते तसे भगवंतालाही वाटेल, आपल्याला ऊन, वारा, पावसाचा त्रास होतो, तसा देवालाही होत असेल, आपल्याला भूक लागते तशी देवालाही लागत असेल, हा भोळा भाव ठेवून भक्त आपल्याला आवडते ते देवालाही देतो. आणि देवालाही असा प्रेमळ भक्त आवडतो. कर्मकांड सुद्धा यासाठी की आपले मन त्यात एकाग्र व्हावे. यातले कोणतेही उपचार देवाला प्रसन्न करण्यासाठी नाही, तर देवपूजा करताना आपले मन प्रसन्न राहावे यासाठी आहेत. तुकाराम महाराज लिहितात, 'मन करा रे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण!' जीवाचा प्रवास शिवापर्यंत पोहोचवणारे मनच आहे, देह फक्त माध्यम आहे. पण देह शुद्ध असेल तरच मन शुद्ध राहील. ही शुद्धी केवळ पाण्याने किंवा साबणाने येणारी नाही तर आपले कर्म चांगले हवे, तरच देहशुद्धी आणि मनशुद्धी आपोआप होईल आणि देवाला या देहाचा विटाळ कधीच होणार नाही.