शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

लिंबू मिरची घराबाहेर लटकवण्यामागं काय आहे वैज्ञानिक कारण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:35 IST

बहुतांश लोकं त्यांच्या घरावर, वाहनांवर आणि दुकानाबाहेर लिंबू मिरची बांधतात. काही जण दर शनिवारी दाराबाहेर लटकवलेली लिंबू मिरची काढून नवीन लावतात.

तुम्ही पाहिलं असेल अनेक लोकं त्यांच्या दुकानांवर, वाहनांवर आणि घराच्या गेटवर लिंबू मिरची लटकवतात. काहीजण याला अंधविश्वास मानतात तर काही परंपरेनुसार प्रगतीसाठी आणि येणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी लिंबू मिरची बांधतात असं म्हटलं जातं. अनेकजण दुकानाबाहेर आणि घराबाहेर लिंबू मिरची बांधतात कारण त्यामुळे वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असा विश्वास आणि श्रद्धा लोकांच्या मनात आहे.

अनेकांच्या मते, लिंबू मिरची लटकवल्यानं वाईट नजरेपासून रक्षण होतं. लिंबूचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजरेचा प्रभाव कमी करतो. पण याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहीत आहे का? तर हे जाणून घेऊया. दारावर लिंबू मिरची लटकवण्यामागेही शास्त्र आहे. वास्तविक, मिरची, लिंबू यांसारख्या वस्तू पाहिल्यावर त्याची चव आपल्याला मनाला जाणवू लागते, त्यामुळे आपण ती फार काळ बघू शकत नाही आणि लगेच आपले लक्ष तिथून हटवतो.

आरोग्याचंही होतं रक्षण

याशिवाय आरोग्याच्या दृष्टीकोनातून लिंबू आणि मिरची दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते त्यामुळे जेव्हा ती दुकानाबाहेर किंवा घराबाहेर प्रवेशद्वारात बांधली जाते तेव्हा त्याचा मजबूत वासामुळे मच्छर, माशा, किडे घरात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि आपल्या आरोग्याचेही रक्षण होते.

वास्तुशास्त्रातील महत्त्व

लिंबू मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात. ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते. जिथे लिंबूचे झाड असते तिथे त्याच्या आजूबाजूची ठिकाणे अगदी शुद्ध राहतात, वास्तुशास्त्रानुसार ज्या घराजवळ लिंबूचे झाड असते ते घर पूर्णपणे शुद्ध मानले जाते, लिंबूच्या आत नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते.

दर शनिवारी लिंबू-मिरची बदलतात

बहुतांश लोकं त्यांच्या घरावर, वाहनांवर आणि दुकानाबाहेर लिंबू मिरची बांधतात. काही जण दर शनिवारी दाराबाहेर लटकवलेली लिंबू मिरची काढून नवीन लावतात. असंही म्हटलं जातं लिंबू, मिरची रस्त्यात कुठेही पडली असेल तर त्यावर पाय ठेवू नका. लिंबू मिरची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून लोकांचा बचाव करत असते. त्यामुळे लिंबू मिरची घराबाहेर लटकवली जाते.