शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

लिंबू मिरची घराबाहेर लटकवण्यामागं काय आहे वैज्ञानिक कारण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:35 IST

बहुतांश लोकं त्यांच्या घरावर, वाहनांवर आणि दुकानाबाहेर लिंबू मिरची बांधतात. काही जण दर शनिवारी दाराबाहेर लटकवलेली लिंबू मिरची काढून नवीन लावतात.

तुम्ही पाहिलं असेल अनेक लोकं त्यांच्या दुकानांवर, वाहनांवर आणि घराच्या गेटवर लिंबू मिरची लटकवतात. काहीजण याला अंधविश्वास मानतात तर काही परंपरेनुसार प्रगतीसाठी आणि येणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी लिंबू मिरची बांधतात असं म्हटलं जातं. अनेकजण दुकानाबाहेर आणि घराबाहेर लिंबू मिरची बांधतात कारण त्यामुळे वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असा विश्वास आणि श्रद्धा लोकांच्या मनात आहे.

अनेकांच्या मते, लिंबू मिरची लटकवल्यानं वाईट नजरेपासून रक्षण होतं. लिंबूचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजरेचा प्रभाव कमी करतो. पण याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहीत आहे का? तर हे जाणून घेऊया. दारावर लिंबू मिरची लटकवण्यामागेही शास्त्र आहे. वास्तविक, मिरची, लिंबू यांसारख्या वस्तू पाहिल्यावर त्याची चव आपल्याला मनाला जाणवू लागते, त्यामुळे आपण ती फार काळ बघू शकत नाही आणि लगेच आपले लक्ष तिथून हटवतो.

आरोग्याचंही होतं रक्षण

याशिवाय आरोग्याच्या दृष्टीकोनातून लिंबू आणि मिरची दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते त्यामुळे जेव्हा ती दुकानाबाहेर किंवा घराबाहेर प्रवेशद्वारात बांधली जाते तेव्हा त्याचा मजबूत वासामुळे मच्छर, माशा, किडे घरात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि आपल्या आरोग्याचेही रक्षण होते.

वास्तुशास्त्रातील महत्त्व

लिंबू मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात. ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते. जिथे लिंबूचे झाड असते तिथे त्याच्या आजूबाजूची ठिकाणे अगदी शुद्ध राहतात, वास्तुशास्त्रानुसार ज्या घराजवळ लिंबूचे झाड असते ते घर पूर्णपणे शुद्ध मानले जाते, लिंबूच्या आत नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते.

दर शनिवारी लिंबू-मिरची बदलतात

बहुतांश लोकं त्यांच्या घरावर, वाहनांवर आणि दुकानाबाहेर लिंबू मिरची बांधतात. काही जण दर शनिवारी दाराबाहेर लटकवलेली लिंबू मिरची काढून नवीन लावतात. असंही म्हटलं जातं लिंबू, मिरची रस्त्यात कुठेही पडली असेल तर त्यावर पाय ठेवू नका. लिंबू मिरची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून लोकांचा बचाव करत असते. त्यामुळे लिंबू मिरची घराबाहेर लटकवली जाते.