शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लिंबू मिरची घराबाहेर लटकवण्यामागं काय आहे वैज्ञानिक कारण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:35 IST

बहुतांश लोकं त्यांच्या घरावर, वाहनांवर आणि दुकानाबाहेर लिंबू मिरची बांधतात. काही जण दर शनिवारी दाराबाहेर लटकवलेली लिंबू मिरची काढून नवीन लावतात.

तुम्ही पाहिलं असेल अनेक लोकं त्यांच्या दुकानांवर, वाहनांवर आणि घराच्या गेटवर लिंबू मिरची लटकवतात. काहीजण याला अंधविश्वास मानतात तर काही परंपरेनुसार प्रगतीसाठी आणि येणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी लिंबू मिरची बांधतात असं म्हटलं जातं. अनेकजण दुकानाबाहेर आणि घराबाहेर लिंबू मिरची बांधतात कारण त्यामुळे वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असा विश्वास आणि श्रद्धा लोकांच्या मनात आहे.

अनेकांच्या मते, लिंबू मिरची लटकवल्यानं वाईट नजरेपासून रक्षण होतं. लिंबूचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजरेचा प्रभाव कमी करतो. पण याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहीत आहे का? तर हे जाणून घेऊया. दारावर लिंबू मिरची लटकवण्यामागेही शास्त्र आहे. वास्तविक, मिरची, लिंबू यांसारख्या वस्तू पाहिल्यावर त्याची चव आपल्याला मनाला जाणवू लागते, त्यामुळे आपण ती फार काळ बघू शकत नाही आणि लगेच आपले लक्ष तिथून हटवतो.

आरोग्याचंही होतं रक्षण

याशिवाय आरोग्याच्या दृष्टीकोनातून लिंबू आणि मिरची दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते त्यामुळे जेव्हा ती दुकानाबाहेर किंवा घराबाहेर प्रवेशद्वारात बांधली जाते तेव्हा त्याचा मजबूत वासामुळे मच्छर, माशा, किडे घरात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि आपल्या आरोग्याचेही रक्षण होते.

वास्तुशास्त्रातील महत्त्व

लिंबू मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात. ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते. जिथे लिंबूचे झाड असते तिथे त्याच्या आजूबाजूची ठिकाणे अगदी शुद्ध राहतात, वास्तुशास्त्रानुसार ज्या घराजवळ लिंबूचे झाड असते ते घर पूर्णपणे शुद्ध मानले जाते, लिंबूच्या आत नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते.

दर शनिवारी लिंबू-मिरची बदलतात

बहुतांश लोकं त्यांच्या घरावर, वाहनांवर आणि दुकानाबाहेर लिंबू मिरची बांधतात. काही जण दर शनिवारी दाराबाहेर लटकवलेली लिंबू मिरची काढून नवीन लावतात. असंही म्हटलं जातं लिंबू, मिरची रस्त्यात कुठेही पडली असेल तर त्यावर पाय ठेवू नका. लिंबू मिरची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून लोकांचा बचाव करत असते. त्यामुळे लिंबू मिरची घराबाहेर लटकवली जाते.