शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

'श्री स्वामी समर्थ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सुखी जीवनाची वचने 

By देवेश फडके | Updated: January 7, 2021 18:57 IST

स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा नेमका अर्थ जाणून घेऊया...

ठळक मुद्देश्री स्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ वाचाश्री स्वामी समर्थ श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार 'श्री स्वामी समर्थ' हा षडाक्षरी सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र

सन २०२१ नवीन वर्ष सुरू झालेले आहे. नवीन वर्षात अनेकांनी नवीन संकल्प केले असतील. सन २०२० हे अनेकार्थाने वेगळे ठरले. पुन्हा असा अनुभव येऊ नये, असे साकडेच कोट्यवधी भाविकांनी देवासमोर घातले असणार हे नक्की. भारतीय संस्कृती अनेकविध थोर महापुरुष होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे पाहायला मिळते. मात्र, केवळ चमत्कारात न अडकता, प्रत्येकाने 'समर्थ' व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत, ही स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे, असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केले जाते. श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय? हे पाहुया...

भारतात शेकडो देवी-देवता आणि त्यांचे हजारो मंत्र आहेत. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार त्याचे पठण करत असते. प्रत्येकाला संस्कृत भाषेतील मंत्र, स्तोत्रे म्हणता येतात असे नाही. म्हणूनच अनेक मंत्र, स्तोत्रे सहज, सुलभ आणि सोप्या भाषेत अनेक संत महंतांनी रचलेली आढळून येतात. स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे, हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून, अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, अगदी त्याचप्रमाणे 'श्री स्वामी समर्थ' हा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे, असे सांगितले जाते. 

षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे, अशी मान्यता आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते. 'श्री स्वामी समर्थ'मधील श्री म्हणजे स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास 'स्वाः + मी' अशी होते. यातील स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे. 'मी' म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा. याचाच अर्थ असा की, 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभु शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा, असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे, असे सांगितले जाते. 

स्वामी समर्थांची वचने

- भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.- जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.- आळशी माणसाचे तोंड पाहू नये.- शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा.- जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.- भिऊ नकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.- आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.- मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.- हम गया नही जिंदा है.