शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

'श्री स्वामी समर्थ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सुखी जीवनाची वचने 

By देवेश फडके | Updated: January 7, 2021 18:57 IST

स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा नेमका अर्थ जाणून घेऊया...

ठळक मुद्देश्री स्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ वाचाश्री स्वामी समर्थ श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार 'श्री स्वामी समर्थ' हा षडाक्षरी सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र

सन २०२१ नवीन वर्ष सुरू झालेले आहे. नवीन वर्षात अनेकांनी नवीन संकल्प केले असतील. सन २०२० हे अनेकार्थाने वेगळे ठरले. पुन्हा असा अनुभव येऊ नये, असे साकडेच कोट्यवधी भाविकांनी देवासमोर घातले असणार हे नक्की. भारतीय संस्कृती अनेकविध थोर महापुरुष होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे पाहायला मिळते. मात्र, केवळ चमत्कारात न अडकता, प्रत्येकाने 'समर्थ' व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत, ही स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे, असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केले जाते. श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय? हे पाहुया...

भारतात शेकडो देवी-देवता आणि त्यांचे हजारो मंत्र आहेत. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार त्याचे पठण करत असते. प्रत्येकाला संस्कृत भाषेतील मंत्र, स्तोत्रे म्हणता येतात असे नाही. म्हणूनच अनेक मंत्र, स्तोत्रे सहज, सुलभ आणि सोप्या भाषेत अनेक संत महंतांनी रचलेली आढळून येतात. स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे, हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून, अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, अगदी त्याचप्रमाणे 'श्री स्वामी समर्थ' हा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे, असे सांगितले जाते. 

षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे, अशी मान्यता आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते. 'श्री स्वामी समर्थ'मधील श्री म्हणजे स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास 'स्वाः + मी' अशी होते. यातील स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे. 'मी' म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा. याचाच अर्थ असा की, 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभु शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा, असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे, असे सांगितले जाते. 

स्वामी समर्थांची वचने

- भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.- जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.- आळशी माणसाचे तोंड पाहू नये.- शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा.- जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.- भिऊ नकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.- आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.- मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.- हम गया नही जिंदा है.