शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संकटांवर संकटे, भाविकाला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले! तुम्हालाही आलाय असा अनुभव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:39 IST

एक आशेचा किरण आणि स्वामींवरील विश्वास संकटातून बाहेर पडण्यासाठी सहाय्यभूत होते, असा काहींचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन शेकडो अधिक वर्षे उलटून गेली असली तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतचआहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने अन्‌ भक्तीने महाराष्ट्रातील घराघरांतून नित्य सुरू आहे. स्वामी समर्थांच्या कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवीत आहेत. स्वामींना मानणारा वर्ग मोठा आहे. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक कथा या भाविकांनी घेतलेल्या अनुभवांतून समोर आलेल्या आहेत. अशीच एक कथा घडल्याचे सांगितले जाते. 

एक भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करत असतो. एकदा त्यावर मोठे संकट येते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामींचा धावा करतो. मात्र, संकट अधिक गहिरे होते. त्रास वाढतो. बाहेर कसे पडावे हेच कळत नाही. अशातच काही दिवसांनी हळूहळू तो भाविक संकटमुक्त होतो. परंतु, स्वामींनी मदत केली नाही, अशी धारणा तो करून घेतो. त्यामुळे स्वामी सेवेकडे त्याचे दुर्लक्ष होते. मात्र, काही दिवसांनी त्याला एक स्वप्न पडते.

संकटकाळात तुझ्या सोबतच होतो, याची ती साक्ष आहे

भाविकाला स्वप्नात दिसते की, स्वामी आणि तो एका भल्या मोठ्या वाळवंटातून जात आहेत. कितीतरी वेळ झाला दोघेही चालत आहेत. नेमका बाहेर पडण्याचा मार्ग अद्यापही दृष्टिपथात येत नाही. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. हळूहळू चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण शरीर घामाघूम झाले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत स्वामी शांतपणे आणि हसतमुखाने सोबत चालत आहेत. मात्र, काहीवेळाने भाविकाला वाळवंटात पायांचे दोघांच्या ठसे उमटलेले दिसतात. याबाबत तो स्वामींना विचारतो. स्वामी समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या ऊन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे?, या प्रश्नावर स्वामी ऊत्तर देतात की, हे पावलांचे ठसे तुझ्या आणि माझ्याच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटकाळात मी तुझ्यासोबतच होतो. याची ती साक्ष आहे. आणखी थोडे पूढे गेल्यावर त्याला फक्त एकाच्याच पावलांचे ठसे दिसतात. यावर, स्वामी जेव्हा मी खूपच अडचणीत होतो, तेव्हा आपण सोडून गेलात. त्यामुळे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना?, या भाविकाच्या प्रश्नावर स्वामी म्हणतात की, नाही रे वेड्या...! येथून पुढे मी तुला माझ्या खांद्यावर घेतले होते. स्वामींच्या उत्तराने भाविक स्तब्ध होतो. त्याला खूप पश्चाताप होतो. संकटकाळात आशेचा एक किरण नवी उमेद देत असतो. 

आशेचा किरण, नवी उमेद आणि स्वामींवरील विश्वास

संकटकाळात दिसलेला एक आशेचा किरण नवीन उमेद देत असतो. स्वामींवरील विश्वास संकटातून मार्ग काढण्यासाठी तसेच त्याच्याशी लढण्यासाठी बळ देत असतो. पाच दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले होते. एके दिवशी एक दिवा म्हणाला, मी इतके जळून माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही, त्यामुळे संपणेच चांगले, असा विचार करून तो विझतो. तो दिवा म्हणजे उत्साहाचे प्रतिक. जो दुसरा दिवा शांततेचे, संयमाचे प्रतिक, तोही असाच विचार करून विझून जातो. यानंतर तिसरा दिवा जो हिमतीचे, धैर्याचे प्रतिक असतो, तोही या दोघांसारखा विचार करून विझून जातो. उत्साह, शांतता, संयम आणि धीर सुटल्यामुळे समृद्धीचे प्रतिक असलेला चौथा दिवाही विझतो. पाचवा दिवा एकटाच जळत राहतो. पाचवा दिवा सगळ्यात छोटा असतो, परंतु निरंतर तेवत राहतो. कालांतराने त्या घरात एक व्यक्ती प्रवेश करते आणि एक दिवा तेवत असल्याचे पाहून आनंदाने प्रसन्न होते. कारण शेजारचे चार दिवे विझले तरी कमीत कमी एक दिवा तरी तेवत आहे. त्या व्यक्तीने एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्ज्वलित केले. तो पाचवा दिवा म्हणजेच आशेचा किरण आणि नवी उमेद.

|| श्री स्वामी समर्थ ||

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक