शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संकटांवर संकटे, भाविकाला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले! तुम्हालाही आलाय असा अनुभव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:39 IST

एक आशेचा किरण आणि स्वामींवरील विश्वास संकटातून बाहेर पडण्यासाठी सहाय्यभूत होते, असा काहींचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन शेकडो अधिक वर्षे उलटून गेली असली तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतचआहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने अन्‌ भक्तीने महाराष्ट्रातील घराघरांतून नित्य सुरू आहे. स्वामी समर्थांच्या कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवीत आहेत. स्वामींना मानणारा वर्ग मोठा आहे. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक कथा या भाविकांनी घेतलेल्या अनुभवांतून समोर आलेल्या आहेत. अशीच एक कथा घडल्याचे सांगितले जाते. 

एक भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करत असतो. एकदा त्यावर मोठे संकट येते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामींचा धावा करतो. मात्र, संकट अधिक गहिरे होते. त्रास वाढतो. बाहेर कसे पडावे हेच कळत नाही. अशातच काही दिवसांनी हळूहळू तो भाविक संकटमुक्त होतो. परंतु, स्वामींनी मदत केली नाही, अशी धारणा तो करून घेतो. त्यामुळे स्वामी सेवेकडे त्याचे दुर्लक्ष होते. मात्र, काही दिवसांनी त्याला एक स्वप्न पडते.

संकटकाळात तुझ्या सोबतच होतो, याची ती साक्ष आहे

भाविकाला स्वप्नात दिसते की, स्वामी आणि तो एका भल्या मोठ्या वाळवंटातून जात आहेत. कितीतरी वेळ झाला दोघेही चालत आहेत. नेमका बाहेर पडण्याचा मार्ग अद्यापही दृष्टिपथात येत नाही. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. हळूहळू चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण शरीर घामाघूम झाले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत स्वामी शांतपणे आणि हसतमुखाने सोबत चालत आहेत. मात्र, काहीवेळाने भाविकाला वाळवंटात पायांचे दोघांच्या ठसे उमटलेले दिसतात. याबाबत तो स्वामींना विचारतो. स्वामी समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या ऊन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे?, या प्रश्नावर स्वामी ऊत्तर देतात की, हे पावलांचे ठसे तुझ्या आणि माझ्याच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटकाळात मी तुझ्यासोबतच होतो. याची ती साक्ष आहे. आणखी थोडे पूढे गेल्यावर त्याला फक्त एकाच्याच पावलांचे ठसे दिसतात. यावर, स्वामी जेव्हा मी खूपच अडचणीत होतो, तेव्हा आपण सोडून गेलात. त्यामुळे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना?, या भाविकाच्या प्रश्नावर स्वामी म्हणतात की, नाही रे वेड्या...! येथून पुढे मी तुला माझ्या खांद्यावर घेतले होते. स्वामींच्या उत्तराने भाविक स्तब्ध होतो. त्याला खूप पश्चाताप होतो. संकटकाळात आशेचा एक किरण नवी उमेद देत असतो. 

आशेचा किरण, नवी उमेद आणि स्वामींवरील विश्वास

संकटकाळात दिसलेला एक आशेचा किरण नवीन उमेद देत असतो. स्वामींवरील विश्वास संकटातून मार्ग काढण्यासाठी तसेच त्याच्याशी लढण्यासाठी बळ देत असतो. पाच दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले होते. एके दिवशी एक दिवा म्हणाला, मी इतके जळून माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही, त्यामुळे संपणेच चांगले, असा विचार करून तो विझतो. तो दिवा म्हणजे उत्साहाचे प्रतिक. जो दुसरा दिवा शांततेचे, संयमाचे प्रतिक, तोही असाच विचार करून विझून जातो. यानंतर तिसरा दिवा जो हिमतीचे, धैर्याचे प्रतिक असतो, तोही या दोघांसारखा विचार करून विझून जातो. उत्साह, शांतता, संयम आणि धीर सुटल्यामुळे समृद्धीचे प्रतिक असलेला चौथा दिवाही विझतो. पाचवा दिवा एकटाच जळत राहतो. पाचवा दिवा सगळ्यात छोटा असतो, परंतु निरंतर तेवत राहतो. कालांतराने त्या घरात एक व्यक्ती प्रवेश करते आणि एक दिवा तेवत असल्याचे पाहून आनंदाने प्रसन्न होते. कारण शेजारचे चार दिवे विझले तरी कमीत कमी एक दिवा तरी तेवत आहे. त्या व्यक्तीने एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्ज्वलित केले. तो पाचवा दिवा म्हणजेच आशेचा किरण आणि नवी उमेद.

|| श्री स्वामी समर्थ ||

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक