शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

Karva Chauth 2024: द्रौपदीनेही पांडवांसाठी केले होते करवा चौथ व्रत; वाचा व्रताचे महाभारत कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:14 IST

Karva Chauth 2024: २० ऑक्टोबर रोजी आपल्याकडे संकष्टीचे व्रत असले, तरी उत्तर भारतात ही तिथी करवा चौथ म्हणून ओळखली जाते; जाणून घ्या प्राचीन प्रथेविषयी!

२० ऑक्टोबर रोजी संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024)आहे, त्यानिमित्त आपण बाप्पाची उपासना म्हणून संकष्टीचे व्रत करतो. तसेच आश्विन महिन्यातील ही चतुर्थी अन्य कारणामुळेही महत्त्वाची ठरते, ती म्हणजे करवा चौथ (Karva Chauth 2024) या व्रतामुळे. पतीला दिर्घआयुष्य मिळावे म्हणून आपल्याकडे जसे वटपौर्णिमेचे व्रत आहे, तसे उत्तर भारतीय स्त्रिया हे व्रत करवा चौथ या नावे करतात. दिवसभर उपास आणि रात्री चंद्र दर्शन घेऊन पाणी पिणे आणि फराळ करणे असे या व्रताचे स्वरूप असते. हिंदी चित्रपटात यावर आधारित अनेक दृश्य आपण पाहिली आहेत. त्याबद्दल आपणही अधिक माहिती करून घेऊ आणि या व्रताचा महाभारताशी संबंध कसा आहे तेही जाणून घेऊ. 

करवा चौथ हा शब्द आला कुठून? 

तर त्यामागे आहे एक पौराणिक कथा! करवा नावाची एक पतिव्रता स्त्री नदीवर धुणं करत असताना तिथे एक मगर आली आणि त्या मगरीने तिच्या नवऱ्याला पकडले. तिने हातातले काम सोडून चक्क मगरीचा सामना करत नवऱ्याला वाचवण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. तिच्या नवऱ्याला नेण्यासाठी आलेल्या यमदूतांनी तिचे साहस पाहिले आणि यमराजाला ही माहिती दिली. तिच्या पातिव्रत्यासमोर यमराजही झुकले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला मगरमिठीतून सोडवले, तो दिवस होता चतुर्थीचा. दोघांनी मिळून चंद्र दर्शन घेतले आणि चंद्राच्या साक्षीने मिळालेले यश साजरे करण्यासाठी, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करवाने चौथचे अर्थात चतुर्थीचे वर्णन केले. तेव्हापासून अनेक उत्तर भारतीय महिला करवा चतुर्थीचे व्रत करू लागल्या. 

चंद्र दर्शनासाठी चाळणीचा वापर का?

करवा नावाची महिला पतिव्रता होती, आपल्या पतीचे मुख हेच चंद्रापेक्षा अधिक प्रिय मानणारी होती. त्याच्या जीवाचे रक्षण आणि चंद्राप्रती कृतज्ञता हे दोन्ही भाव एकत्रित व्यक्त करण्यासाठी तिने चंद्राच्या कृपेने पतीचे मुख पाहता आले, म्हणून तिने छिद्र असलेल्या चाळणीतून चंद्र दर्शन घेतले आणि नंतर त्याच चाळणीतून पतीचे दर्शन घेत व्रत पूर्ण केले. तेव्हापासून चंद्र दर्शन थेट न घेता चाळणीतून चंद्र दर्शन घेण्याची प्रथा पडली. पतीवर निस्सीम प्रेम असलेल्या या भारतीय महिलेला चंद्र देखील पतीसमोर आकर्षक वाटत नाही, म्हणून त्याच्याकडे ती आडून पाहते आणि नवऱ्याचा मुखचंद्र डोळे भरून पाहते, हा भाव त्या कृतीमागे दडला असावा. 

या व्रताला महाभारताचीही पार्श्वभूमी : 

एकदा पांडवपुत्र अर्जुन निलगिरी पर्वतावर तपस्या करत असताना त्याच्यावर नैसर्गिक संकट आलं. त्याची तपश्चर्या भंग होऊ नये म्हणून महर्षी नारदांच्या सांगण्यावरून द्रौपदीनेदेखील हे व्रत केलं आणि अर्जुनावरचं संकट टळलं. इथेही स्त्रीचं पातिव्रत्य दिसून येतं. एकूणच हे व्रत भावनांशी निगडित आहे हे लक्षात येते. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी