शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक मास हा दामोदर मास म्हणूनही ओळखला जातो, ते पुढील कारणांसाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 17:23 IST

कार्तिक महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विवाह त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीबरोबर लावून दिला जातो, म्हणून श्रीकृष्णाचा या महिन्यावर आत्यंतिक जिव्हाळा असतो. याच कारणाने, कार्तिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात.

कार्तिक महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. कारण, या महिन्यात अनेक धार्मिक विधी, सण, उत्सव पार पाडले जातात. उत्तम स्वास्थ्य, कौटुंबिक सुख, वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती, तसेच ईश्वरी कृपा मिळवण्यासाठी कार्तिक महिना अतिशय अनुकूल असतो, असे वर्णन स्कंद पुराण, नारद पुराण आणि पद्म पुराणातही केले आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विवाह त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीबरोबर लावून दिला जातो, म्हणून श्रीकृष्णाचा या महिन्यावर आत्यंतिक जिव्हाळा असतो. याच कारणाने, कार्तिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात.

कृष्णप्रियो हि कार्तिक:, कार्तिक: कृष्णवल्लभ:।

हेही वाचा : संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह

कार्तिक मासाचे पुराणातील महत्त्व:भविष्य पुराणातील कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाला कार्तिक महिन्यात राधेची भेट घेण्यास विलंब झाला. त्यामुळे राधा कृष्णावर रागावली. वास्तविक काही कारणास्तव यशोदेने कृष्णाला घराबाहेर जाऊ दिले नव्हते. त्यामुळे कृष्णाचा काहीच दोष नव्हता. परंतु, राधेला ही परिस्थिती माहित नसल्यामुळे तिने आपल्या मनी वसलेल्या कृष्णाला लतावेलींची दोरी करून रागावून घट्ट बांधून ठेवले. मात्र, जेव्हा तिला खरा प्रसंग कळला, तेव्हा तिने कृष्णाची क्षमा मागितली आणि त्याला बंधनातून मुक्त केले. मात्र, राधेचे प्रेम आणि तिची कृष्णाची असलेली सलगी पाहून, या महिन्याला `श्रीराधा-दामोदर मास' अशी ओळख मिळाली.

पद्म पुराणात असा उल्लेख आहे, की सत्यभामाने आपल्या पूर्वजन्मात आजीवन एकादशी व्रत आणि कार्तिक व्रत नेटाने पाळले होते. त्याचेच फळ म्हणून श्रीहरी तिला पतीस्वरूपात प्राप्त झाले. सत्यभामेने व्रत, तप आणि प्रार्थना करून भगवंताला आपलेसे करून घेतले, तसे आपणही भगवंताला आपले करून घ्यावे, ही जाणीव कार्तिक मासात करून देतो. 

स्कंद पुराणात कार्तिक मासाचे महत्त्व मौखिक प्रचारातून कसे पसरत गेले, याची सुरस कथा आहे. नारायणांनी ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवांनी नारदाला आणि नारदांनी महाराज पृथुला कार्तिक महिन्याचे महत्त्व सांगितले. कार्तिक महिन्यात भगवान विष्णुंची पूजा, प्रात:काळी स्नान, तुळशी पूजा, उद्यापन आणि दीपदान ही कार्तिक मास व्रताची पाच वैशिष्ट्ये आहेत. भागवत कथा, दामोदर स्तोत्र, विष्णुसहस्रनाम यांचे पठण, श्रवण या महिन्यात फलदायी असते. तसेच तुळशी पूजेच्या वेळी पुढील मंत्र लाभकारक ठरतो.

'नमो रमस्ते तुलसि पापं हर हरप्रिये'

चला तर आपणही, दामोदर मासाचे अर्थात कार्तिक मासाचे पुण्य पदरात पाडून घेऊ आणि भगवंताला आपलेसे करून घेऊ.

ओम नमो भगवते वासुदेवाय!

हेही वाचा : Adhik Maas 2020: पूजेवेळी घंटानाद का करतात, जाणून घ्या शास्त्र