शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

jaya parvati vrat 2024 ६ दिवस साजरे केले जाणारे जया-पार्वती व्रत: ‘असे’ करा पूजन; पाहा, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 11:37 IST

Jaya Parvati Vrat 2024: चांगला जोडीदार मिळावा तसेच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी जया पार्वती व्रत केले जाते. हे व्रत कसे करतात? पूजा विधीसह अन्य महत्त्वाची माहिती जाणून घ्या...

Jaya Parvati Vrat 2024: देवशयनी आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. चातुर्मास काळात सृष्टीचे पालन-चालन महादेव करतात, अशी मान्यता आहे. चातुर्मास काळाला भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशीनंतर साजरे केले जाणारे एक व्रत म्हणजे जया पार्वती व्रत. देशातील अनेक ठिकाणी हे व्रत केले जाते. हे व्रत सुमारे सहा दिवसांचे असते, असे सांगितले जाते. कसे करावे हे व्रत, मान्यता आणि महात्म्य काय आहे, ते जाणून घेऊया...

आषाढ शुद्ध त्रयोदशीपासून जया पार्वती व्रतांरभ होतो आणि आषाढ कृष्ण तृतीयेला या व्रताची सांगता केली जाते. म्हणजेच यंदाच्या वर्षी १९ जुलै २०२४ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत हे व्रत केले जाणार आहे. अविवाहित आणि सौभाग्यवती महिला या व्रताचे आचरण करतात. अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे, यासाठी हे व्रत प्रामुख्याने केले जाते. तर चांगला जोडीदार मिळावा, यासाठी अविवाहिता या व्रताचे आचरण करतात, असे म्हटले जाते. 

जया पार्वती व्रताचा पूजन विधी

हे व्रत देवी जया यांना समर्पित असल्याचे सांगितले जाते. जया या पार्वती देवीचे प्रतिरुप असल्याची मान्यता आहे. जया पार्वती व्रताचरण करणाऱ्यांनी सकाळी लवकर नित्यकर्म आटोपल्यानंतर शिव-पार्वती पूजनाचा संकल्प करावा. शिव-पार्वतींचे आवाहन करून त्यांची स्थापना करावी. शिव-पार्वतीच्या प्रतिमेवर किंवा मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक करावा. त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. पार्वती देवीचे नामस्मरण, मंत्रजप करावे. जय पार्वती व्रताची कथेचे वाचन करावे किंवा कथा ऐकावी.

जया पार्वती व्रत पूजनाचे महात्म्य

आपल्याला उत्तम जोडीदार मिळावा किंवा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, म्हणून हे व्रत प्रामुख्याने आचरले जाते. या व्रताचा संकल्प केल्यानंतर पाच, सात, नऊ, अकरा आणि २० वर्षे हे व्रत करावे, असे सांगितले जाते. खुद्द भगवान श्रीविष्णूंनी लक्ष्मी देवीला या व्रताचे महत्त्व सांगितले होते, अशी मान्यता आहे. काही ठिकाणी एका दिवसाचे तर काही ठिकाणी पाच दिवसाचे व्रत करण्याची परंपरा आहे. या व्रतामध्ये मातीचा गज (हत्ती) तयार करून त्याचेही पूजन केले जाते. व्रताची सांगता झाल्यानंतर या मातीच्या गजाचे विसर्जन केले जाते. या व्रतादिनी रात्री जागरण करून भजन-कीर्तन केले जाते. व्रत आचरल्यानंतर सात्विक आहार घेण्याचे सल्ला दिला जातो. व्रताची सांगता करताना पूजन केल्यानंतर उपवास सोडावा, असे सांगितले जाते. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक