शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

jaya parvati vrat 2024 ६ दिवस साजरे केले जाणारे जया-पार्वती व्रत: ‘असे’ करा पूजन; पाहा, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 11:37 IST

Jaya Parvati Vrat 2024: चांगला जोडीदार मिळावा तसेच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी जया पार्वती व्रत केले जाते. हे व्रत कसे करतात? पूजा विधीसह अन्य महत्त्वाची माहिती जाणून घ्या...

Jaya Parvati Vrat 2024: देवशयनी आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. चातुर्मास काळात सृष्टीचे पालन-चालन महादेव करतात, अशी मान्यता आहे. चातुर्मास काळाला भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशीनंतर साजरे केले जाणारे एक व्रत म्हणजे जया पार्वती व्रत. देशातील अनेक ठिकाणी हे व्रत केले जाते. हे व्रत सुमारे सहा दिवसांचे असते, असे सांगितले जाते. कसे करावे हे व्रत, मान्यता आणि महात्म्य काय आहे, ते जाणून घेऊया...

आषाढ शुद्ध त्रयोदशीपासून जया पार्वती व्रतांरभ होतो आणि आषाढ कृष्ण तृतीयेला या व्रताची सांगता केली जाते. म्हणजेच यंदाच्या वर्षी १९ जुलै २०२४ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत हे व्रत केले जाणार आहे. अविवाहित आणि सौभाग्यवती महिला या व्रताचे आचरण करतात. अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे, यासाठी हे व्रत प्रामुख्याने केले जाते. तर चांगला जोडीदार मिळावा, यासाठी अविवाहिता या व्रताचे आचरण करतात, असे म्हटले जाते. 

जया पार्वती व्रताचा पूजन विधी

हे व्रत देवी जया यांना समर्पित असल्याचे सांगितले जाते. जया या पार्वती देवीचे प्रतिरुप असल्याची मान्यता आहे. जया पार्वती व्रताचरण करणाऱ्यांनी सकाळी लवकर नित्यकर्म आटोपल्यानंतर शिव-पार्वती पूजनाचा संकल्प करावा. शिव-पार्वतींचे आवाहन करून त्यांची स्थापना करावी. शिव-पार्वतीच्या प्रतिमेवर किंवा मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक करावा. त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. पार्वती देवीचे नामस्मरण, मंत्रजप करावे. जय पार्वती व्रताची कथेचे वाचन करावे किंवा कथा ऐकावी.

जया पार्वती व्रत पूजनाचे महात्म्य

आपल्याला उत्तम जोडीदार मिळावा किंवा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, म्हणून हे व्रत प्रामुख्याने आचरले जाते. या व्रताचा संकल्प केल्यानंतर पाच, सात, नऊ, अकरा आणि २० वर्षे हे व्रत करावे, असे सांगितले जाते. खुद्द भगवान श्रीविष्णूंनी लक्ष्मी देवीला या व्रताचे महत्त्व सांगितले होते, अशी मान्यता आहे. काही ठिकाणी एका दिवसाचे तर काही ठिकाणी पाच दिवसाचे व्रत करण्याची परंपरा आहे. या व्रतामध्ये मातीचा गज (हत्ती) तयार करून त्याचेही पूजन केले जाते. व्रताची सांगता झाल्यानंतर या मातीच्या गजाचे विसर्जन केले जाते. या व्रतादिनी रात्री जागरण करून भजन-कीर्तन केले जाते. व्रत आचरल्यानंतर सात्विक आहार घेण्याचे सल्ला दिला जातो. व्रताची सांगता करताना पूजन केल्यानंतर उपवास सोडावा, असे सांगितले जाते. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक