शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

Jaya Ekadashi 2024: श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले होते जया एकादशीचे व्रत; या दिवशी तुळशीचा असा करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 07:00 IST

Jaya Ekadashi 2024: २० फेब्रुवारी रोजी जया एकादशी आहे, या मुहूर्तावर उपास तर करायलाच हवा, पण तो शक्य झाला नाही तर निदान तुळशीचा उपाय जरूर करा!

जया एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. या एकादशीचे महत्त्व महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते आणि त्यामागची पौराणिक कथादेखील सांगितली होती. ती कथा आणि या व्रतामुळे होणारे लाभ जाणून घेऊ. तसेच या व्रताचा भूत पिशाच्चांशी नेमका काय संबंध आहे तेही जाणून घेऊ. 

पितरांना भूत-पिशाच योनीपासून मुक्ती मिळते

जया एकादशीचे व्रत केल्याने आत्म्यांना भवसागरातून मुक्ती मिळते. दुर्दैवाने कोणी पूर्वज भूत-पिशाचाच्या रूपात पृथ्वीवर फिरत असतील तर कुटुंबातील सदस्याने जया एकादशीचे व्रत पाळल्यास, नियमानुसार पूजा करून कथा ऐकल्यास त्याला मुक्ती मिळते. पितृदोष दूर झाला की कुटुंबाला अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. म्हणून या व्रताचे महत्त्व अधिक आहे. 

जया एकादशी व्रत कथा

पद्म पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला जया एकादशी व्रताची कथा सांगितली. यानुसार देवराज इंद्रासह सर्व देव स्वर्गात सुखाने राहत होते. एके दिवशी इंद्रदेव अप्सरांसोबत सुंदरवनात फिरत होते, अप्सरा पुष्पावती आणि गंधर्व माल्यवानही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे गंधर्व मल्ल्यावानांना पाहून अप्सरा पुष्पावती मोहित झाली. मल्ल्यावानही मंत्रमुग्ध झाले. दोघेही इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी नाचत आणि गात असले तरी. पण दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले आणि गाणे आणि नृत्यात लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. तेव्हा इंद्रदेवाने दोघांना शाप देऊन पृथ्वीवर पिशाचाच्या रूपात जन्म घ्याल असा शाप दिला. 

शापामुळे मल्ल्यावान आणि पुष्पावती दुःखदायक जीवन जगू लागले. दरम्यान, माघ शुक्ल पक्षातील जया एकादशीच्या दिवशी शोकाने व्याकूळ झालेल्या माल्यवान आणि पुष्पावती यांनी काहीही न खाल्ल्याने संपूर्ण रात्र पिंपळाच्या झाडाखाली जागून काढली, भगवान विष्णूंची प्रार्थना केली. विष्णूंच्या कृपेने त्यांची पिशाच्च योनीतुन सुटका झाली आणि त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे पुन्हा खुली झाली. 

हे व्रत कसे करावे? 

हे व्रत तीन प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन! परंतु, आजच्या धकाधकीच्या जिवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तीभावाने तुळस वाहणे किंवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले, तरी एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येते. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३