शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

देवाकडे काहीही मागणे योग्य असते की अयोग्य? वाचा हा दृष्टांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 10:02 IST

देवाकडे काही मागायचेच असेल, तर देवाचे सान्निध्य मागावे. त्याची सेवा मागावी. आपोआप आपले मनोरथ पूर्ण होते. 

आपण सगळेच देवाकडे गेल्यावर काही ना काही मागत असतो. जेवढे काही मिळालेले आहे, त्याबद्दल समाधान न मानता काय मिळाले नाही, याबद्दल देवाकडे तक्रार करतो. एका कवितेत एक कवी म्हणतात, 

आम्ही देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखे वागतो,चार आठाणे टाकून काहीतरी मागतो!

आता चार आठाण्यांचा जमाना राहिला नाही. म्हणून आताचे भक्त देवाला सोने, चांदी, हिरे, गाडी, बंगला ऑफर करतात. पण अशा प्रलोभनांना भूलेल तो देव कसला? देव तर भावाचा भुकेला. त्याला हवा असतो तो केवळ शुद्ध भाव! त्याचा मात्र असतो अभाव! आपण देवाकडे मागत राहतो आणि देव देत राहतो. कारण असे मागणारे देवाला जवळ नकोच आहेत. जे आपल्याकडचे दुसऱ्याला देऊ करतात आणि देवाला आपलेसे करतात, असेच भक्त देवाला हवे आहेत. म्हणून देवाकडे जाऊन काहीही मागणे म्हणजे देवाला आपल्यापासून दूर करण्यासारखे आहे. 

देवाकडे काहीही का मागू नये. याबाबत समर्थ रामदास स्वामींचा एक दृष्टांत सांगितला जातो. समर्थांचा शिष्य समर्थांना विचारतो, 'गुरुदेव, देवाकडे आपण काहीही मागणे योग्य असते का? आणि योग्य असले तर काय मागितले पाहिजे?'

समर्थ आपल्या शिष्याला घेऊन एका राजाच्या महालाबाहेर गेले. दूर एका झाडाखाली ते दोघे उभे होते. तिथून राज दरबारातील परिसराचे अवलोकन करत होते. त्या परिसरात एक भिकारी बसला होता. जाता येता राजाची दृष्टी आपल्यावर पडावी या हेतूने तो तिथे बसला होता. समर्थांनी त्याच्याकडे बोट दाखवत शिष्याला सांगितले, भिकारी राजाकडे काही न मागता केवळ त्याच्या दृष्टीक्षेपात येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला काय गरज आहे, हे राजाने ओळखावे आणि त्याला मदत करावी, अशी भिकाऱ्याची अपेक्षा आहे. त्यानुसार राजाची त्याच्यावर नजर जाताच, सेवकांकरवी राजाने त्याला अन्न धान्य, कपडे दान दिले. भिकाऱ्याची गरज भागली. 

आपण मंदिरात जाऊन देवाकडे काही मागत असू तर आपल्यात आणि त्या भिकाऱ्यात काहीच भेद उरणार नाही. प्रश्न राहिला देवाच्या दृष्टीक्षेपात येण्याचा, तर तो आपल्या सर्वांकडे लक्ष ठेवून आहे. म्हणून त्याच्याकडे निदान ऐहिक सुखं मागण्याची आवश्यकता नाही. काही मागायचेच असेल, तर देवाचे सान्निध्य मागावे. त्याची सेवा मागावी. आपोआप आपले मनोरथ पूर्ण होते.