शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवाकडे काहीही मागणे योग्य असते की अयोग्य? वाचा हा दृष्टांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 10:02 IST

देवाकडे काही मागायचेच असेल, तर देवाचे सान्निध्य मागावे. त्याची सेवा मागावी. आपोआप आपले मनोरथ पूर्ण होते. 

आपण सगळेच देवाकडे गेल्यावर काही ना काही मागत असतो. जेवढे काही मिळालेले आहे, त्याबद्दल समाधान न मानता काय मिळाले नाही, याबद्दल देवाकडे तक्रार करतो. एका कवितेत एक कवी म्हणतात, 

आम्ही देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखे वागतो,चार आठाणे टाकून काहीतरी मागतो!

आता चार आठाण्यांचा जमाना राहिला नाही. म्हणून आताचे भक्त देवाला सोने, चांदी, हिरे, गाडी, बंगला ऑफर करतात. पण अशा प्रलोभनांना भूलेल तो देव कसला? देव तर भावाचा भुकेला. त्याला हवा असतो तो केवळ शुद्ध भाव! त्याचा मात्र असतो अभाव! आपण देवाकडे मागत राहतो आणि देव देत राहतो. कारण असे मागणारे देवाला जवळ नकोच आहेत. जे आपल्याकडचे दुसऱ्याला देऊ करतात आणि देवाला आपलेसे करतात, असेच भक्त देवाला हवे आहेत. म्हणून देवाकडे जाऊन काहीही मागणे म्हणजे देवाला आपल्यापासून दूर करण्यासारखे आहे. 

देवाकडे काहीही का मागू नये. याबाबत समर्थ रामदास स्वामींचा एक दृष्टांत सांगितला जातो. समर्थांचा शिष्य समर्थांना विचारतो, 'गुरुदेव, देवाकडे आपण काहीही मागणे योग्य असते का? आणि योग्य असले तर काय मागितले पाहिजे?'

समर्थ आपल्या शिष्याला घेऊन एका राजाच्या महालाबाहेर गेले. दूर एका झाडाखाली ते दोघे उभे होते. तिथून राज दरबारातील परिसराचे अवलोकन करत होते. त्या परिसरात एक भिकारी बसला होता. जाता येता राजाची दृष्टी आपल्यावर पडावी या हेतूने तो तिथे बसला होता. समर्थांनी त्याच्याकडे बोट दाखवत शिष्याला सांगितले, भिकारी राजाकडे काही न मागता केवळ त्याच्या दृष्टीक्षेपात येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला काय गरज आहे, हे राजाने ओळखावे आणि त्याला मदत करावी, अशी भिकाऱ्याची अपेक्षा आहे. त्यानुसार राजाची त्याच्यावर नजर जाताच, सेवकांकरवी राजाने त्याला अन्न धान्य, कपडे दान दिले. भिकाऱ्याची गरज भागली. 

आपण मंदिरात जाऊन देवाकडे काही मागत असू तर आपल्यात आणि त्या भिकाऱ्यात काहीच भेद उरणार नाही. प्रश्न राहिला देवाच्या दृष्टीक्षेपात येण्याचा, तर तो आपल्या सर्वांकडे लक्ष ठेवून आहे. म्हणून त्याच्याकडे निदान ऐहिक सुखं मागण्याची आवश्यकता नाही. काही मागायचेच असेल, तर देवाचे सान्निध्य मागावे. त्याची सेवा मागावी. आपोआप आपले मनोरथ पूर्ण होते.