शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

आपण भगवंताकडे पाहणे महत्त्वाचे नसून भगवंताचे आपल्याकडे पाहणे महत्त्वाचे असते; संत सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 15:07 IST

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम आधीही होते आणि नंतरही राहणार आहे. नाम रुपाला व्यापून असते.

हरिपाठाच्या सुरुवातीला दोन मुख्य अभंग म्हटले जातात. त्यातला एक आहे ध्यानाचा आणि दुसरा आहे रूपाचा! ते अभंग म्हणजे 'सुंदर ते ध्यान' आणि 'रूप पाहता लोचनी'. या अभंगात सुंदर ध्यान या अभंगाला ध्यानाचा आणि रूप पाहता लोचनी या अभंगाला रूपाचा अभंग म्हटले आहे. मात्र त्यातील वर्णन नीट ऐकले, तर ते परस्परविरुद्ध आहे, हे आपल्याला लक्षात येईल. सुंदर ते ध्यान हा ध्यानाचा अभंग असून त्यात पांडुरंगाच्या रूपाचे वर्णन आढळते, तर रूप पाहता लोचनी अभंगात पांडुरंगाकडे ध्यान लावल्यावर होणारा आनंद व्यक्त केला आहे. याचाच अर्थ रूप आणि ध्यान या दोन्ही गोष्टी नामावर अवलंबून आहेत. 

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम आधीही होते आणि नंतरही राहणार आहे. नाम रुपाला व्यापून असते. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकींनी रामायण लिहिले होते. रामाने मागाहून जन्म घेऊन तसे आचरण करून दाखवले. म्हणजेच राम अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते आणि रामाच्या अस्तित्वानंतरही नाम शिल्लक राहिले. म्हणजे नाम हे देश काल मर्यादेच्या पलीकडे असते आणि रूपापेक्षा सत्य असते. म्हणून रूपापेक्षा नामाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. 

एखाद्या व्यक्तीचे नाव काढताच आपल्याला त्याचे रूप डोळ्यासमोर येते. पण कधी? जेव्हा त्या व्यक्तीला आपण पाहिलेले असते. मात्र, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतही नाही, तेव्हा आपण आधी नाम विचारून घेतो आणि मग रूप पाहण्याचा प्रयत्न करतो. 

सगुण भक्ती करताना देवाचे नाम घेताच आपल्या डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती उभी राहते. परंतु निर्गुण भक्तीत सर्वव्यापी परमेश्वर ही संकल्पना मानली जाते. सगुण भक्ती कशासाठी, तर आपले चित्त भक्तीमार्गात स्थिर व्हावे, यासाठी! ज्याप्रमाणे गणिताची उकल करताना आपल्याला 'क्ष' ची मदत होते. त्याप्रमाणे अध्यात्माची उकल करताना भगवंताची मूर्ती अर्थात त्याचे रूप किंवा ध्यान डोळ्यासमोर ठेवण्यास मदत होते. मात्र गोंदवलेकर महाराज सांगतात, रूपाचा विचार करताना मन त्यात अडकते, रूपाच्या पलीकडे असलेला परमेश्वर पाहायचा असेल, तर नामाला पर्याय नाही. म्हणून रूप डोळ्यासमोर असो न असो, सर्वत्र व्यापून राहिलेल्या  परमेश्वराला साक्षी ठेवून नामस्मरण सुरू करा.