शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

आपण भगवंताकडे पाहणे महत्त्वाचे नसून भगवंताचे आपल्याकडे पाहणे महत्त्वाचे असते; संत सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 15:07 IST

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम आधीही होते आणि नंतरही राहणार आहे. नाम रुपाला व्यापून असते.

हरिपाठाच्या सुरुवातीला दोन मुख्य अभंग म्हटले जातात. त्यातला एक आहे ध्यानाचा आणि दुसरा आहे रूपाचा! ते अभंग म्हणजे 'सुंदर ते ध्यान' आणि 'रूप पाहता लोचनी'. या अभंगात सुंदर ध्यान या अभंगाला ध्यानाचा आणि रूप पाहता लोचनी या अभंगाला रूपाचा अभंग म्हटले आहे. मात्र त्यातील वर्णन नीट ऐकले, तर ते परस्परविरुद्ध आहे, हे आपल्याला लक्षात येईल. सुंदर ते ध्यान हा ध्यानाचा अभंग असून त्यात पांडुरंगाच्या रूपाचे वर्णन आढळते, तर रूप पाहता लोचनी अभंगात पांडुरंगाकडे ध्यान लावल्यावर होणारा आनंद व्यक्त केला आहे. याचाच अर्थ रूप आणि ध्यान या दोन्ही गोष्टी नामावर अवलंबून आहेत. 

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम आधीही होते आणि नंतरही राहणार आहे. नाम रुपाला व्यापून असते. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकींनी रामायण लिहिले होते. रामाने मागाहून जन्म घेऊन तसे आचरण करून दाखवले. म्हणजेच राम अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते आणि रामाच्या अस्तित्वानंतरही नाम शिल्लक राहिले. म्हणजे नाम हे देश काल मर्यादेच्या पलीकडे असते आणि रूपापेक्षा सत्य असते. म्हणून रूपापेक्षा नामाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. 

एखाद्या व्यक्तीचे नाव काढताच आपल्याला त्याचे रूप डोळ्यासमोर येते. पण कधी? जेव्हा त्या व्यक्तीला आपण पाहिलेले असते. मात्र, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतही नाही, तेव्हा आपण आधी नाम विचारून घेतो आणि मग रूप पाहण्याचा प्रयत्न करतो. 

सगुण भक्ती करताना देवाचे नाम घेताच आपल्या डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती उभी राहते. परंतु निर्गुण भक्तीत सर्वव्यापी परमेश्वर ही संकल्पना मानली जाते. सगुण भक्ती कशासाठी, तर आपले चित्त भक्तीमार्गात स्थिर व्हावे, यासाठी! ज्याप्रमाणे गणिताची उकल करताना आपल्याला 'क्ष' ची मदत होते. त्याप्रमाणे अध्यात्माची उकल करताना भगवंताची मूर्ती अर्थात त्याचे रूप किंवा ध्यान डोळ्यासमोर ठेवण्यास मदत होते. मात्र गोंदवलेकर महाराज सांगतात, रूपाचा विचार करताना मन त्यात अडकते, रूपाच्या पलीकडे असलेला परमेश्वर पाहायचा असेल, तर नामाला पर्याय नाही. म्हणून रूप डोळ्यासमोर असो न असो, सर्वत्र व्यापून राहिलेल्या  परमेश्वराला साक्षी ठेवून नामस्मरण सुरू करा.