शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

आत्म्याला ८४ लक्ष योनीतुन प्रवास करावा लागतो असे म्हणतात, पद्म पुराणात दिलेली माहिती जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 17:31 IST

'पुनरपि जननम पुनरमी मरणम' या चक्रातून मुक्ती हवी असेल तर मानवी देह ही शेवटची संधी आहे. याबाबत पद्म पुराण सांगते.. 

सनातन धर्माच्या अनेक पुस्तकांमध्ये ८४ लक्ष योनींचा उल्लेख आहे. असे म्हणतात की ८४ लाख जन्मांचा टप्पा ओलांडल्यानंतर सत्कर्माच्या जोरावर मनुष्य देह मिळतो आणि आत्मा मनुष्य रूपात जन्माला येतो. पण या ८४ लाख योनी नेमक्या कशा आहेत? याबद्दल पद्मपुराणात तपशीलवार दिलेले वर्णन जाणून घेऊया. 

८४ लक्ष योनीचे चक्र समजून घेऊ 

पद्म पुराणानुसार, ८४ लाख योनीचा अर्थ ब्रह्मांडात आढळणारे विविध प्रकारचे प्राणी आहेत. या सजीवांना योजिन आणि सन्यावती या दोन भागात विभागले आहे. यासोबतच प्राण्यांचे शरीर थलचर, नभचर आणि जलचर असे ३ भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. पुराणात ९ लाख जलचर, २० लाख झाडे-वनस्पती, ११ लाख कीटक, १० लाख पक्षी, ३० लाख प्राणी आणि ४ लाख देवता, दानव आणि मानव असल्याचे सांगितले आहे. या सर्व मिळून एकूण ८४ लाख योनी तयार होतात.

मानवी योनी शेवटी असते 

नरदेहाला अर्थात मनुष्य देहाला मुक्तीचे दार म्हटले आहे. कारण मानवी देहात ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मेंदू आणि विचार करण्यासाठी मन दिले आहे. त्यामुळे बरे वाईट यातला भेद ओळखून पुण्य कर्म करावे आणि या चक्रातून मुक्ती मिळवावी अशी ईश्वरी रचना आहे. तसे झाले नाही तर आत्म्याचा प्रवास पुन्हा सुरु होतो. सुख दुःखाचे सोहळे, पीडा, भय या सगळ्या गोष्टी ८४ लाख देहाच्या प्रवासात पुन्हा सहन कराव्या लागतात. म्हणून हा देह सत्कारणी लावा असे संत कानीकपाळी ओरडून सांगतात. याच गोष्टीला पद्म पुराणाने दुजोरा दिला आहे. 

पद्मपुराणात वर्णन केले आहे

पद्मपुराणात असे म्हटले आहे की जेव्हा आत्मा विहित ८४ लाख योनीचा प्रवास पूर्ण करतो आणि त्याचे कर्म देखील चांगले असते तेव्हा त्याला पितृ किंवा देव योनी प्राप्त होतो. अर्थात ती व्यक्ती मृत्यूनंतर वैकुंठधामला जाते. दुष्ट कर्म करणारा आत्मा पुन्हा ८४ लाख जन्मांत जन्म घेण्यासाठी पाठवला जातो. वेद आणि पुराणांमध्ये याला दुर्गती म्हटले आहे, म्हणजे आत्मा पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, ही परिस्थिती आदर्श मानली जात नाही.

त्यामुळे स्वर्गात जायचे की नरकात हे आपले भाग्य नाही तर आपले कर्म ठरवते हे लक्षात ठेवा आणि नेहमी प्रामाणिकपणे आपले काम करत राहा. कारण आपल्या प्रत्येक कामाची नोंद घेतली जाते.