शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भगवंताबद्दल मनात भीती निर्माण करतो तो धर्म नाही; समस्त धर्माची विचारधारा सांगते की... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 13:14 IST

धर्म, शास्त्र, आध्यात्म याबद्दल आपण मनात अकारण भीती बाळगतो, ती भीती दूर करताना श्री. श्री. रविशंकर यांनी केलेले मार्गदर्शन पहा. 

भगवंताने ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यात वैविध्य निर्माण केले. कारण तो खरा रसिक आहे. अन्यथा त्याने एकच फुल , एकच भाजी, एकच रंग, एकसारख्या विचारप्रवाहाची माणसं बनवून सृष्टी निरुत्साही बनवली असती. परंतु तसे झाले नाही, ज्या अर्थी त्याने एवढे वैविध्य निर्माण केले, त्याअर्थी तो वैविध्यप्रिय आहे. ही विविधता अगदी धर्म, पंथ यांच्या बाबतीतही लागू होते. त्यामुळे कोणताही एक धर्म श्रेष्ठ आणि अन्य कनिष्ठ होत नाही. सर्व धर्मांची विचारधारा आनंद निर्माण करणारी आहे आणि ती भगवंताला प्रिय आहे. तो जर हे वैविध्य स्वीकारायला तयार आहे, तर आपण त्यांचे अस्तित्व नाकारणारे कोण?

ते म्हणतात, `लोकांना धर्म, पंथ, अध्यात्म हे काहीतरी गुढ आहे असे वाटते. या विषयांबद्दल जेवढे धीरगंभीर चेहरे तेवढे लोक कर्मठ मानले जातात. परंतु धर्माचे हे रूप नाहीच! आई वडिलांना मुले जशी हसती खेळती आवडतात, तशी भगवंतालाही प्रसन्न, आनंदी, मजेने जगणारे लोक आवडतात. ज्यांना आनंदाने आयुष्य जगता आले, त्यांना अध्यात्म कळले, असे म्हणता येईल! उगीचच ओढलेले, ताणलेले, आक्रसलेले चेहरे आपल्याला आवडत नाहीत, तर देवाला तरी कसे आवडणार? हीच सर्व धर्माची शिकवण आहे. आनंदाने जगा आणि जगू द्या.'

'अध्यात्म ही मानवी ऊर्जेशी संबंधित आहे. अध्यात्म माणसांना जोडते. आपल्या देशात, जगात विविध धर्म, पंथ असले तरी त्यांची शिकवण हीच आहे. 'धर्मो धारयते प्रजा' अर्थात धर्म समाजाला संघटित ठेवतो, अपेक्षांचे ओझे मनावर न ठेवता कर्तव्याची जाणीव करून देतो. आनंदाने जगायला शिकवतो. याचे भान ज्या व्यक्तीला असते, ती खरी अध्यात्मिक व्यक्ती असते. अशीच एक आठवण सांगतो - 

इराकमध्ये तणावाची स्थिती असताना मी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावर तेथे गेलो होते. इंग्लंडचे पंतप्रधान रेड झोनमध्ये थांबले होते व तेथेच बॉम्बस्फोट झाला होता. मला तेथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था देण्यात आली होती. परंतु मला रेड झोनमध्ये जायचे होते. तेथे जिद्द करून गेल्यानंतर तेथील लोकांनी माझे स्वागत केले. मी त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पहिल्यांदाच आम्हाला कुणी ऐकून घेत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विरोधी गटातील आठ हजार कुटुंबीयांची हकालपट्टी केली होती. दुसऱ्या दिवशी मी विरोधी गटातील प्रतिनिधींना रेड झोनमध्ये घेऊन गेलो. अगोदर चर्चेदरम्यान वाद झाले, पण मग ते मध्यस्थीतून शांत झाले. तो इराकसाठी टर्निंग पॉईंट ठरला व आठ हजार कुटुंबीय स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला. हेच अध्यात्म आणि हीच अध्यात्माची शिकवण!