शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

भगवंताबद्दल मनात भीती निर्माण करतो तो धर्म नाही; समस्त धर्माची विचारधारा सांगते की... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 13:14 IST

धर्म, शास्त्र, आध्यात्म याबद्दल आपण मनात अकारण भीती बाळगतो, ती भीती दूर करताना श्री. श्री. रविशंकर यांनी केलेले मार्गदर्शन पहा. 

भगवंताने ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यात वैविध्य निर्माण केले. कारण तो खरा रसिक आहे. अन्यथा त्याने एकच फुल , एकच भाजी, एकच रंग, एकसारख्या विचारप्रवाहाची माणसं बनवून सृष्टी निरुत्साही बनवली असती. परंतु तसे झाले नाही, ज्या अर्थी त्याने एवढे वैविध्य निर्माण केले, त्याअर्थी तो वैविध्यप्रिय आहे. ही विविधता अगदी धर्म, पंथ यांच्या बाबतीतही लागू होते. त्यामुळे कोणताही एक धर्म श्रेष्ठ आणि अन्य कनिष्ठ होत नाही. सर्व धर्मांची विचारधारा आनंद निर्माण करणारी आहे आणि ती भगवंताला प्रिय आहे. तो जर हे वैविध्य स्वीकारायला तयार आहे, तर आपण त्यांचे अस्तित्व नाकारणारे कोण?

ते म्हणतात, `लोकांना धर्म, पंथ, अध्यात्म हे काहीतरी गुढ आहे असे वाटते. या विषयांबद्दल जेवढे धीरगंभीर चेहरे तेवढे लोक कर्मठ मानले जातात. परंतु धर्माचे हे रूप नाहीच! आई वडिलांना मुले जशी हसती खेळती आवडतात, तशी भगवंतालाही प्रसन्न, आनंदी, मजेने जगणारे लोक आवडतात. ज्यांना आनंदाने आयुष्य जगता आले, त्यांना अध्यात्म कळले, असे म्हणता येईल! उगीचच ओढलेले, ताणलेले, आक्रसलेले चेहरे आपल्याला आवडत नाहीत, तर देवाला तरी कसे आवडणार? हीच सर्व धर्माची शिकवण आहे. आनंदाने जगा आणि जगू द्या.'

'अध्यात्म ही मानवी ऊर्जेशी संबंधित आहे. अध्यात्म माणसांना जोडते. आपल्या देशात, जगात विविध धर्म, पंथ असले तरी त्यांची शिकवण हीच आहे. 'धर्मो धारयते प्रजा' अर्थात धर्म समाजाला संघटित ठेवतो, अपेक्षांचे ओझे मनावर न ठेवता कर्तव्याची जाणीव करून देतो. आनंदाने जगायला शिकवतो. याचे भान ज्या व्यक्तीला असते, ती खरी अध्यात्मिक व्यक्ती असते. अशीच एक आठवण सांगतो - 

इराकमध्ये तणावाची स्थिती असताना मी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावर तेथे गेलो होते. इंग्लंडचे पंतप्रधान रेड झोनमध्ये थांबले होते व तेथेच बॉम्बस्फोट झाला होता. मला तेथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था देण्यात आली होती. परंतु मला रेड झोनमध्ये जायचे होते. तेथे जिद्द करून गेल्यानंतर तेथील लोकांनी माझे स्वागत केले. मी त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पहिल्यांदाच आम्हाला कुणी ऐकून घेत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विरोधी गटातील आठ हजार कुटुंबीयांची हकालपट्टी केली होती. दुसऱ्या दिवशी मी विरोधी गटातील प्रतिनिधींना रेड झोनमध्ये घेऊन गेलो. अगोदर चर्चेदरम्यान वाद झाले, पण मग ते मध्यस्थीतून शांत झाले. तो इराकसाठी टर्निंग पॉईंट ठरला व आठ हजार कुटुंबीय स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला. हेच अध्यात्म आणि हीच अध्यात्माची शिकवण!