शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

सकाळी सकाळी 'या' गोष्टींचे नजरेस पडणे ठरते लाभदायक; जाणून घ्या त्या लकी ठरणाऱ्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 11:04 IST

ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी सकाळीच नजरेस पडल्याने दिवसभरात अचानक अनेक लाभ होतात. या लाभाचे कारण पुढील गोष्टींमध्ये दडलेले असू शकते!

आपली सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो. म्हणून धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे उघडताच आपल्या तळ हाताचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे. कारण आपल्या हातात लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद यांचा वास असतो. त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करावी हा त्यामागचा हेतू असतो. त्यानंतरही काही गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्यांचे दर्शन आपल्या दिवसाला आनंद दायी, लाभदायी होण्यास कारणीभूत ठरते. 

सकाळी पुढील गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या तर त्या लाभदायी ठरणार असे समजा: 

>>सकाळी जाग येताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर समजून जा की दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मात्र लक्षात घ्या, पक्ष्याचा किलबिलाट पहाटेच जास्त ऐकू येतो. त्यामुळे आपल्यालाही पहाटे जाग येणे क्रमप्राप्त झाले. ज्याचा दिवस ब्रह्म मुहूर्तावर सुरु होतो त्याचा दिवस चांगला जाणारच असे शास्त्र सांगते!

>>सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष देव दर्शनाला सोवळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसला, तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला मोठे काम मिळण्याचीही शक्यता असते. 

>>सकाळी उठल्यावर आपल्याला पांढऱ्या फुलांचे दर्शन घडत असेल तर दिवस आनंददायी जाणारच!

>>ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधाचे भरलेले पातेले दिसणे हेदेखील शुभ व सुबत्तेचे लक्षण मानले गेले आहे. तसेच तुमच्या घरात दूध, दह्याची साठवण केल्यामुळे लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहील. 

>>सकाळी किंवा कामासाठी घराबाहेर पडताना गो मातेचे दर्शन होणे देखील शुभ ठरते. गोमातेच्या केवळ दर्शनानेदेखील आपल्या नोकरी, व्यायवसायत भरभराट होते. 

>>सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दर्शन घडणे देखील शुभ मानले जाते. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार, याचे ते चिन्ह असते. 

>>एखाद्या झाडाला फळे लगडलेली पाहिलीत, तर तुमच्या प्रयत्नांनादेखील लवकरच चांगले फळ मिळणार आहे असे समजून जा. 

>>सकाळी डोळे उघडताच जवळच्या मंदिरातील किंवा घरातल्या देव्हाऱ्यातील घंटेचा नाद कानावर पडत असेल तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता जाते. तसेच कोणतेही बिघडलेले किंवा रखडलेले काम पूर्ण होऊ शकते.