शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
2
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
3
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
4
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
5
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
6
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
7
"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
8
इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
9
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
10
प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?
11
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
12
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
13
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
14
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
15
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची सीएनजी कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
16
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
17
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
18
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
19
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
20
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच

अपयशाची कारणे देण्यापेक्षा, अपयाशाची कारणे शोधा! - रतन टाटा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 27, 2020 14:31 IST

ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात.

ठळक मुद्देलोखंडाला कोणीही तोडू शकत नाही, मात्र त्याला गंज लागला, तर तो निकामी होतो. ज्या गोष्टी परमेश्वर प्राप्तीला साधन रूप आहेत, त्याच अडचणीच्या आहेत, असे मानणारे लोक या जगात पुष्कळ आहेत.

ज्योत्स्ना गाडगीळ 

'कारणे द्या' या प्रश्नाचे शालेय वयात उत्तर दिले, की गपकन ५-६ गुणांची कमाई होत असे. तेव्हापासून, कठीण प्रश्न सोडून देत, सोप्या प्रश्नांसाठी कारणे देत राहण्याची मनुष्याला नकळत सवयच लागली. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा आपल्या एका भाषणात म्हणाले होते, `लोखंडाला कोणीही तोडू शकत नाही, मात्र त्याला गंज लागला, तर तो निकामी होतो. म्हणून अपयश आले, तर वाईट वाटून हार पत्करण्यापेक्षा अपयशाची कारणे शोधा, त्यावर मात करा आणि भविष्याकडे यशस्वी वाटचाल करा.' 

आपल्या सभोवती असे अनेक लोक असतात, ज्यांना स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे माहित असतात, परंतु ती त्यांना शोधायची नसतात. ते आळस करतात आणि नशीबाला दोष देत राहतात. दुसऱ्यांचे सगळे कसे चांगले, आपले कसे वाईट, हा विचार करण्यात आयुष्यातला बराच वेळ वाया घालवतात. लोकांमुळे आपली प्रगती कशी अडली, आपले नुकसान कसे झाले, आपण अपयशी कसे झालो, याबाबत लोकांना दोष देत राहतात. अशा लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही! 

हेही वाचा : जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट

याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. अशा लोकांची राष्ट्रविकासासाठी गरज असते. हाच धागा धरून संत तुकाराम महाराज म्हणतात, 

ढालतलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजा कैसा झुंजो।पोटी पडदाळे सिले टोप ओझे, हें तो झाले दुजे मरणमूळ।बैसविले मला येणे अश्वावरी, धावू पळू तरी कैसा आता।असोनि उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय काय करू।तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संतचरण।।

ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. या टाळाटाळीची काही उदाहरणे महाराजांनी येथे दिली आहेत. एक रडतराव युद्धाचा प्रसंग आल्यावर काय म्हणतो पहा, त्याला लढण्यासाठी ढाल-तलवार दिली, घोड्यावर बसवले, डोक्याला टोप, अंगात चिलखत वगैरे संरक्षणात्मक पोशाख दिला, युद्धासाठी या सर्वांची मदत झाली असती, पण या शिपाई काय म्हणतो,  अहो, माझे हात ढालीने, तलवारीने गुंतून पडले आहेत. मी लढाई कशी करणार? या चिलखताची, या टोपाची केवढी अडचण झाली आहे? मला यानेच मरण येईल, मला याचेच ओझे झाले आहे. मला घोड्यावर बसविले आहे, माझ्यावर शत्रू धावून आले, तर मी पळून कसा जाऊ? म्हणजे लढायची गोष्ट दूरच! पळायचे कसे याचीच चिंता! 

हे उदाहरण देऊन तुकाराम महाराज म्हणतात, ज्या गोष्टी परमेश्वर प्राप्तीला साधन रूप आहेत, त्याच अडचणीच्या आहेत, असे मानणारे लोक या जगात पुष्कळ आहेत. तोंडाने नाम घेणे त्यांना अडचणीचे वाटते. हातांनी टाळ वाजविणे अडचणीचे वाटते. आपला देह हाच परमार्थाला सहाय्यभूत आहे, पण ते त्यांना कळत नाही. अशा लोकांना काय म्हणावे? स्वत:ला हे हीनदीन समजतात. खरोखर सर्वतोपरी हे ब्रह्मरूपच आहेत, पण त्यांना हे कळत नाही.

हेही वाचा : Sadguru Speech: 'मी काही दिवस सोशल मीडियावरून रजा घेतोय' असा मेसेज करून तर बघा...

टॅग्स :Ratan Tataरतन टाटा