शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

अपयशाची कारणे देण्यापेक्षा, अपयाशाची कारणे शोधा! - रतन टाटा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 27, 2020 14:31 IST

ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात.

ठळक मुद्देलोखंडाला कोणीही तोडू शकत नाही, मात्र त्याला गंज लागला, तर तो निकामी होतो. ज्या गोष्टी परमेश्वर प्राप्तीला साधन रूप आहेत, त्याच अडचणीच्या आहेत, असे मानणारे लोक या जगात पुष्कळ आहेत.

ज्योत्स्ना गाडगीळ 

'कारणे द्या' या प्रश्नाचे शालेय वयात उत्तर दिले, की गपकन ५-६ गुणांची कमाई होत असे. तेव्हापासून, कठीण प्रश्न सोडून देत, सोप्या प्रश्नांसाठी कारणे देत राहण्याची मनुष्याला नकळत सवयच लागली. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा आपल्या एका भाषणात म्हणाले होते, `लोखंडाला कोणीही तोडू शकत नाही, मात्र त्याला गंज लागला, तर तो निकामी होतो. म्हणून अपयश आले, तर वाईट वाटून हार पत्करण्यापेक्षा अपयशाची कारणे शोधा, त्यावर मात करा आणि भविष्याकडे यशस्वी वाटचाल करा.' 

आपल्या सभोवती असे अनेक लोक असतात, ज्यांना स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे माहित असतात, परंतु ती त्यांना शोधायची नसतात. ते आळस करतात आणि नशीबाला दोष देत राहतात. दुसऱ्यांचे सगळे कसे चांगले, आपले कसे वाईट, हा विचार करण्यात आयुष्यातला बराच वेळ वाया घालवतात. लोकांमुळे आपली प्रगती कशी अडली, आपले नुकसान कसे झाले, आपण अपयशी कसे झालो, याबाबत लोकांना दोष देत राहतात. अशा लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही! 

हेही वाचा : जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट

याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. अशा लोकांची राष्ट्रविकासासाठी गरज असते. हाच धागा धरून संत तुकाराम महाराज म्हणतात, 

ढालतलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजा कैसा झुंजो।पोटी पडदाळे सिले टोप ओझे, हें तो झाले दुजे मरणमूळ।बैसविले मला येणे अश्वावरी, धावू पळू तरी कैसा आता।असोनि उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय काय करू।तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संतचरण।।

ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. या टाळाटाळीची काही उदाहरणे महाराजांनी येथे दिली आहेत. एक रडतराव युद्धाचा प्रसंग आल्यावर काय म्हणतो पहा, त्याला लढण्यासाठी ढाल-तलवार दिली, घोड्यावर बसवले, डोक्याला टोप, अंगात चिलखत वगैरे संरक्षणात्मक पोशाख दिला, युद्धासाठी या सर्वांची मदत झाली असती, पण या शिपाई काय म्हणतो,  अहो, माझे हात ढालीने, तलवारीने गुंतून पडले आहेत. मी लढाई कशी करणार? या चिलखताची, या टोपाची केवढी अडचण झाली आहे? मला यानेच मरण येईल, मला याचेच ओझे झाले आहे. मला घोड्यावर बसविले आहे, माझ्यावर शत्रू धावून आले, तर मी पळून कसा जाऊ? म्हणजे लढायची गोष्ट दूरच! पळायचे कसे याचीच चिंता! 

हे उदाहरण देऊन तुकाराम महाराज म्हणतात, ज्या गोष्टी परमेश्वर प्राप्तीला साधन रूप आहेत, त्याच अडचणीच्या आहेत, असे मानणारे लोक या जगात पुष्कळ आहेत. तोंडाने नाम घेणे त्यांना अडचणीचे वाटते. हातांनी टाळ वाजविणे अडचणीचे वाटते. आपला देह हाच परमार्थाला सहाय्यभूत आहे, पण ते त्यांना कळत नाही. अशा लोकांना काय म्हणावे? स्वत:ला हे हीनदीन समजतात. खरोखर सर्वतोपरी हे ब्रह्मरूपच आहेत, पण त्यांना हे कळत नाही.

हेही वाचा : Sadguru Speech: 'मी काही दिवस सोशल मीडियावरून रजा घेतोय' असा मेसेज करून तर बघा...

टॅग्स :Ratan Tataरतन टाटा