शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

Indira Ekadashi 2024: एकादशी कोणतीही असो, तांदूळ असो नाहीतर वरी तांदूळ अजिबात खाऊ नका, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 07:00 IST

Indira Ekadashi 2024: एकादशी आणि दुप्पट खाशी आपण म्हणतो आणि तसे वागतोही; पण एकादशीला तांदूळ आवर्जून वर्ज्य का करावा ते जाणून घेऊ.

>> सचिन मधुकर परांजपे (पालघर)

एकादशीला तांदुळ, किंवा भगर जे वेगळे धान्य असूनही तांदळाचाच प्रकार अनेकजण मानतात. शास्त्रानुसार हे पदार्थ उपासाला चालत नाहीत. त्यामागे काही कथाही सांगितल्या जातात. पुराणातील कथांवर कोणी किती विश्वास ठेवायचा? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एकादशीला भगर (वरीचा तांदूळ/उपासाचा तांदूळ) का खाऊ नये या संदर्भात वाचनात आलेली कथा सांगतो.  

१) विष्णुपुराणातील संदर्भानुसार महर्षी मेधा हे ऋषी देविच्या क्रोधापासून वाचण्यासाठी योगबलाने देहत्याग करुन तो देह जमीनीत एकरुप करतात आणि त्या देहापासूनच तांदूळ निर्माण झाला आहे. एकादशीला मांसाहार वर्ज्य असल्याने त्या दिवशी तांदूळ सेवन करणे हे मांसभक्षण समजले जाते म्हणून एकादशीला तांदुळ आणि तांदळाचे पदार्थ व उपप्रकार समजला जाणारा वरी तांदूळ किंवा भगर वर्ज्य आहे. 

२) तांदुळ किंवा भात हे हविषान्न आहे म्हणजे ते यज्ञामार्फत देवास अर्पण केले जाते म्हणून ते एकादशीच्या दिवशी वर्ज्य आहे.

३) तांदळात जलाचे प्रमाण अधिक आहे आणि एकादशीला जास्त किंवा अती प्रमाणात पाणी पिणे अयोग्य मानण्यात येते म्हणून तांदूळ सेवन करु नये असे मानतात....

वरील तिन्ही मुद्दे मी एकादशीला तांदुळ भगर वर्ज्य का? यासाठी संदर्भ म्हणून दिले आहेत. धार्मिक संदर्भाचा उपवास करताना अधिकाधिक नियम पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. एकादशीच्या दिवशी साबुदाणा, बटाटा, अनेक कंदमुळे, सुरण, रताळी, शिंगडा, केळी आणि इतर सर्व प्रकारची फळे, दूध, फळांचे रस, सुका मेवा, राजगिरा असे असंख्य अगणित खाद्यपर्याय उपलब्ध असल्याने भगर खाण्याचा हट्ट सहज सोडता येईल.  भगर पौष्टिक, पोटभरीची आणि अनेक चांगल्या आरोग्यसंपन्न गुणधर्मानी युक्त आहे पण अमुक एका संदर्भानुसार जर ती एकादशीला वर्ज्य आहे तर एकादशी वगळता अन्य दिवशी तिचे सेवन करायला काहीच हरकत नाही. 

टॅग्स :foodअन्न