शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Indira Ekadashi 2024: एकादशी कोणतीही असो, तांदूळ असो नाहीतर वरी तांदूळ अजिबात खाऊ नका, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 07:00 IST

Indira Ekadashi 2024: एकादशी आणि दुप्पट खाशी आपण म्हणतो आणि तसे वागतोही; पण एकादशीला तांदूळ आवर्जून वर्ज्य का करावा ते जाणून घेऊ.

>> सचिन मधुकर परांजपे (पालघर)

एकादशीला तांदुळ, किंवा भगर जे वेगळे धान्य असूनही तांदळाचाच प्रकार अनेकजण मानतात. शास्त्रानुसार हे पदार्थ उपासाला चालत नाहीत. त्यामागे काही कथाही सांगितल्या जातात. पुराणातील कथांवर कोणी किती विश्वास ठेवायचा? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एकादशीला भगर (वरीचा तांदूळ/उपासाचा तांदूळ) का खाऊ नये या संदर्भात वाचनात आलेली कथा सांगतो.  

१) विष्णुपुराणातील संदर्भानुसार महर्षी मेधा हे ऋषी देविच्या क्रोधापासून वाचण्यासाठी योगबलाने देहत्याग करुन तो देह जमीनीत एकरुप करतात आणि त्या देहापासूनच तांदूळ निर्माण झाला आहे. एकादशीला मांसाहार वर्ज्य असल्याने त्या दिवशी तांदूळ सेवन करणे हे मांसभक्षण समजले जाते म्हणून एकादशीला तांदुळ आणि तांदळाचे पदार्थ व उपप्रकार समजला जाणारा वरी तांदूळ किंवा भगर वर्ज्य आहे. 

२) तांदुळ किंवा भात हे हविषान्न आहे म्हणजे ते यज्ञामार्फत देवास अर्पण केले जाते म्हणून ते एकादशीच्या दिवशी वर्ज्य आहे.

३) तांदळात जलाचे प्रमाण अधिक आहे आणि एकादशीला जास्त किंवा अती प्रमाणात पाणी पिणे अयोग्य मानण्यात येते म्हणून तांदूळ सेवन करु नये असे मानतात....

वरील तिन्ही मुद्दे मी एकादशीला तांदुळ भगर वर्ज्य का? यासाठी संदर्भ म्हणून दिले आहेत. धार्मिक संदर्भाचा उपवास करताना अधिकाधिक नियम पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. एकादशीच्या दिवशी साबुदाणा, बटाटा, अनेक कंदमुळे, सुरण, रताळी, शिंगडा, केळी आणि इतर सर्व प्रकारची फळे, दूध, फळांचे रस, सुका मेवा, राजगिरा असे असंख्य अगणित खाद्यपर्याय उपलब्ध असल्याने भगर खाण्याचा हट्ट सहज सोडता येईल.  भगर पौष्टिक, पोटभरीची आणि अनेक चांगल्या आरोग्यसंपन्न गुणधर्मानी युक्त आहे पण अमुक एका संदर्भानुसार जर ती एकादशीला वर्ज्य आहे तर एकादशी वगळता अन्य दिवशी तिचे सेवन करायला काहीच हरकत नाही. 

टॅग्स :foodअन्न