शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

कीर्तन चांग, कीर्तन चांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 02:00 IST

नारद व नामदेव हे कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक समजले जातात. वीणा या वाद्याला यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकनारद व नामदेव हे कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक समजले जातात. वीणा या वाद्याला यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. उदा. संत तुकाराम महाराजांची वीणा निळोबारायांकडे व त्यांच्याकडून वास्कर महाराजांकडे आल्याचे उल्लेख संप्रदायाच्या इतिहासात आहेत. वारकरी कीर्तन, हरिदासी कीर्तन, समर्थ संप्रदायाचे कीर्तन, गाडगे महाराज संप्रदायाचे कीर्तन असे वर्गीकरण करता येते.कीर्तन संस्था ही महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन अशी सांस्कृतिक संस्था असून, नवविधा भक्तीमध्ये कीर्तनाचा उल्लेख दुसरी भक्ती म्हणून केला जातो. भगवद्गीतेमध्ये कीर्तन महिमा सांगितलेला आहे. तो असा-सततं कीर्तयन्तो मां यतत्नश्च दृढव्रता:। नमस्यन्तश्च मां भक्तया नित्ययुक्ता उपासते।।तरी कीर्तनाचेनि नटनाचे। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।जे नामचि नाही पापाचें। ऐसे केले।।असा कीर्तनाचा महिमा ‘ज्ञानेश्वरी’च्या नवव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. विष्णुपुराण, स्कंदपुराण, आदित्यपुराण, आदी पुराणांमध्ये संकीर्तनाचे उल्लेख आहेत.भागवत संप्रदायी संतांनी कीर्तनाचा महिमा अनेकवार विशद केला आहे. ‘कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप’ असे संतांनी म्हटले आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी।’ असे संत नामदेवांनी म्हटले आहे.कीर्तन करणे ही एक उपासनाच आहे. भगवंताची भक्ती करून त्याच्या चरित्राचे गायन करणे हे जरी कीर्तनाचे मुख्य अंग असले, तरी जगाला सन्मार्गाला लावणे, त्याला यथायोग्य उपदेश करून हे प्रवर्तित झालेले अनादिधर्मचक्र यापुढे तसेच चालले पाहिजे, अशी व्यवस्था करणे, हाही कीर्तनाचा एक प्रधान हेतू आहे. तो हेतू साधण्याकरिता म्हणून कीर्तनात देवाच्या व भक्ताच्या निरनिराळ्या कथांचा आदर्श पुढे ठेवण्याची रीत पडली आहे.कीर्तनाचे संप्रदायसापेक्ष वर्गीकरण करता येते. वारकरी कीर्तन हे भागवत संप्रदायाचे कीर्तन म्हणून ओळखले जाते, तर हरिदासी कीर्तन अर्थात नारदीय कीर्तनावर दत्त संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे. राम आणि हनुमान ही समर्थ संप्रदायाची दैवते आहेत. समर्थ संप्रदायाची कीर्तनपद्धती ही नारदीय अर्थात हरिदासी कीर्तन पद्धतीसारखीच असते. समर्थ संप्रदायांच्या कीर्तनात राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर निरूपण केले जाते.गाडगे महाराज संप्रदायाचे कीर्तन हे समाजप्रबोधनपर असून, भक्तीचा सोपा मार्ग, सोप्या भाषेतून या कीर्तनाद्वारे सांगितला जातो. कीर्तनाच्या प्रकारांमधून महाराष्ट्रात आजही आध्यात्मिक उद्बोधन आणि समाजप्रबोधन घडविले जाते आहे. नशाबंदी, साक्षरता प्रसार, हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीयता निर्मूलन, ग्रामस्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्या, जलसंवर्धन, आदी सामाजिक प्रश्नांसंबंधीचे उद्बोधन कीर्तनातून घडते. ‘कीर्तनाची गोडी देव निवडी आपण’ असा कीर्तनाचा महिमा आहे.