शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

'नक्कल करून अक्कल येत नाही; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 18:09 IST

'मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो' असे म्हणतात. ज्या दिवशी आपण शिकण्याची सवय थांबवतो आणि स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो, त्यादिवसापासून आपण स्वत:ची प्रगती थांबवतो.

एका राजाकडे एक तलवारबाज होता. तो तलवारबाजीत निपुण होता. त्याचा आपल्या राज्याला उपयोग करून घ्यावा, म्हणून राजाने त्याला सेनापती पद दिले. त्यानेही इमाने इतबारे राजाच्या दरबारी आयुष्यभर चाकरी केली. 

हळू हळू सेनापती वयोवृद्ध होऊ लागला. त्याला वाटले, आपल्या आयुष्याचा शेवट जवळ येत चालला आहे. आपल्या अंगी असलेली तलवारबाजीची कला आपल्याबरोबर लोप पावू नये, म्हणून त्याने राजासमोर प्रस्ताव मांडला. `आपल्या राज्यात कोणाला तलवारबाजी शिकायची असेल, तर मी शिकवायला तयार आहे.' राजाला प्रस्ताव आवडला. त्याने राज्यात दवंडी पिटवली. उत्साही शिष्य शिकण्यासाठी गोळा झाले.

दुसऱ्या दिवसापासून तालीम सुरु झाली. वयोवृद्ध सरदारांमध्ये जोम आला. ते पूर्ण ताकदीने आपल्या शिष्यांना प्रशिक्षण देत होते. त्या शिष्यांमध्ये एक तरुण अतिशय हुशार होता. त्याने गुरुंकडून तलवारबाजी आत्मसात केली. त्याच्या अंगभूत गुणांमुळे तो शिष्योत्तम ठरला होता. त्याला वाटू लागले, आपण गुरुंपेक्षा वरचढ झालो आहोत. आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. मग आपल्याला आपल्या गुणवत्तेची योग्य किंमत मिळायला हवी. अशा विचाराने त्याने राजाला सांगितले, `मी तलवारबाजीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, आपल्याकडील सेनापतीचे रिक्त असलेले पद आपण मला द्यावेत.'

यावर राजाने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. हुशार तलवारबाजाला हरवायचे तर प्रतिस्पर्धी भक्कम हवा. अशा विचाराने त्यांनी त्याच्या गुरुंशी म्हणजे माजी सेनापतींशी स्पर्धा करायची ठरवली. सेनापतींनीदेखील प्रस्ताव मान्य केला. तरुणासाठी हे अनपेक्षित होते. त्याला वाटले, गुरुजी स्पर्धा न करता बिनविरोध माझे नाव सुचवतील. परंतु, ज्याअर्थी त्यांनी स्पर्धेत उतरायचे ठरवले आहे, त्याअर्थी त्यांनी नक्कीच एखादे यशाचे सूत्र आपल्याला सांगितले नाही. या विचाराने तो तरुण दिवस रात्र गुरुंवर पाळत ठेवू लागला. 

गुरुंनी स्पर्धेसाठी खास पंधरा फुटाची एक म्यान बनवून घेतली. अर्धवट माहिती घेऊन शिष्याने गुरंच्या वरचढ राहण्यासाठी सोळा फुटाची तलवार बनवून घेतली. 

ऐन युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा स्पर्धा सुरु होताच गुरुजींनी म्यानातून तलवार बाहेर काढली आणि शिष्याच्या मानेवर धरली. शिष्य मात्र सोळा फूट लांब तलवार म्यानेतून बाहेर काढता काढताच धारातीर्थी पडला. तेव्हा गुरु हसून म्हणाले, `नक्कल करून अक्कल येत नसते बाळा. तू अर्धवट प्रशिक्षण घेऊन स्वत:ला हुशार समजू लागलास. परंतु, अशा अर्धवटरावांच्या वाट्याला नेहमी अपयशच येते. म्हणून कोणतेही शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय आणि गुरुआज्ञा मिळाल्याशिवाय स्पर्धेत उतरू नये. आपल्या ज्ञानाचा वृथा अभिमान बाळगू नये. अन्यथा गर्वाचे घर खाली होते.' शिष्य वरमला. त्याने माफी मागितली. गुरुंनी मोठ्या मनाने त्याला माफ करून तलवारबाजीत परिपूर्ण केले आणि गुरुंच्या सांगण्यावरून भविष्यात तो तरुण, राजाच्या दरबारी सरदार झाला.

'मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो' असे म्हणतात. ज्या दिवशी आपण शिकण्याची सवय थांबवतो आणि स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो, त्यादिवसापासून आपण स्वत:ची प्रगती थांबवतो. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहा आणि आत्मसात केलेले गुण अमलात आणत राहा.