शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

मृत्यूनंतर नरकाचे दार टाळायचे असेल तर जिवंतपणी 'या' चुका प्रकर्षाने टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:14 IST

भगवंताने सर्वकाही देऊनही त्याचा सुयोग्य वापर केला नाही तर जन्माला येऊनही आपण मृतवत आयुष्य जगलो असे शास्त्रकार सांगतात.

मनुष्य जन्माला येतो, वाढतो, जगतो आणि एक दिवस मरतो. या कालावधीत तो काय करतो यावर त्याचा मृत्यूनंतरचा प्रवास ठरतो. किडा मुंगीदेखील जगतात, परंतु मनुष्य जन्म त्यांच्यापेक्षा वेगळा आहे कारण परमेश्वराने मनुष्याला देह, बुद्धी, विचारशील मन आणि कृती करायला हात, पाय असे सर्व काही दिले आहे. त्याचा सुयोग्य वापर केला नाही तर जन्माला येऊनही आपण मृतवत आयुष्य जगलो असे शास्त्रकार सांगतात. दर वाढदिवसाला आपल्या गत आयुष्याचे सिंहावलोकन करून पुढील आयुष्यात मागे झालेल्या चुका टाळणे ही आपल्यासाठी संधी असते. त्यासाठी शास्त्रकारांनी केलेले मार्गदर्शन पुढीलप्रमाणे- 

>>ज्या लोकांमध्ये दयाभाव नाही, त्यांचे जीवन व्यर्थ आहे. इतकेच नाही तर त्यांच्या स्वभावाचा हा कठोरपणा त्यांना माणूस म्हणवून घेण्याचा हक्क देत नाही निष्ठुरपणाने जगणाऱ्या लोकांचे जीवनात मोठे नुकसान होते.

>>जे लोक नेहमी दुसऱ्यांशी भांडत असतात आणि शत्रू बनवतात. अशा लोकांपासून इतर लोक अंतर ठेवतात. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही. माणसाची ही वाईट वागणूक ना त्याला यश मिळवू देत ना आनंद! अशी व्यक्ती आपल्या कुटुंबाची हानी आणि बदनामी करून घेतात.

>>जे लोक स्वतः कर्म करून पैसा कमावण्याऐवजी इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, त्यांना आयुष्यात कधीही सुख मिळत नाही. उलट चोरी, लबाडी आणि फसवणूक करून कमावलेला पैसा त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा नाश करतो.

>>जे लोक आपल्या मित्रपरिवाराला अडचणीच्या वेळी मदत करत नाहीत, लोक त्यांना साथही देत ​​नाहीत. अडचणीच्या वेळी या लोकांना कोणीही मदत करत नाही. ते त्यांच्या आयुष्यात एकाकी पडतात. 

>>जी व्यक्ती आयुष्यभर स्वतःसाठी जगते अशा व्यक्तीलाही स्वर्गात जागा मिळत नाही. याउलट जे लोक इतरांना सहकार्य, सेवा, मदत करतात त्यांना नरकाची भीती नसते. 

>>सतत रागावणाऱ्या लोकांच्या आयुष्यात शेवटी पश्चातापच भोगण्याची वेळ येते. रागामुळे त्याच्या स्वतःच्या घरातील लोकांनाही त्याच्यासोबत राहणे आवडत नाही. रागामुळे ते त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या संधी गमावतात आणि त्यांची ऊर्जा नकारात्मक कामात वाया घालवतात. असे लोक मेले तरी समाजाला काही फरक पडत नाही. आयुष्यभर दुसऱ्यांना त्रास दिल्याची शिक्षा म्हणून जिवंतपणी आणि मृत्यूपश्चातही नरक भोगावा लागतो!