शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
8
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
9
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
10
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
11
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
12
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
13
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
14
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
15
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
16
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
17
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
18
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
19
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
20
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!

मृत्यूनंतर नरकाचे दार टाळायचे असेल तर जिवंतपणी 'या' चुका प्रकर्षाने टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:14 IST

भगवंताने सर्वकाही देऊनही त्याचा सुयोग्य वापर केला नाही तर जन्माला येऊनही आपण मृतवत आयुष्य जगलो असे शास्त्रकार सांगतात.

मनुष्य जन्माला येतो, वाढतो, जगतो आणि एक दिवस मरतो. या कालावधीत तो काय करतो यावर त्याचा मृत्यूनंतरचा प्रवास ठरतो. किडा मुंगीदेखील जगतात, परंतु मनुष्य जन्म त्यांच्यापेक्षा वेगळा आहे कारण परमेश्वराने मनुष्याला देह, बुद्धी, विचारशील मन आणि कृती करायला हात, पाय असे सर्व काही दिले आहे. त्याचा सुयोग्य वापर केला नाही तर जन्माला येऊनही आपण मृतवत आयुष्य जगलो असे शास्त्रकार सांगतात. दर वाढदिवसाला आपल्या गत आयुष्याचे सिंहावलोकन करून पुढील आयुष्यात मागे झालेल्या चुका टाळणे ही आपल्यासाठी संधी असते. त्यासाठी शास्त्रकारांनी केलेले मार्गदर्शन पुढीलप्रमाणे- 

>>ज्या लोकांमध्ये दयाभाव नाही, त्यांचे जीवन व्यर्थ आहे. इतकेच नाही तर त्यांच्या स्वभावाचा हा कठोरपणा त्यांना माणूस म्हणवून घेण्याचा हक्क देत नाही निष्ठुरपणाने जगणाऱ्या लोकांचे जीवनात मोठे नुकसान होते.

>>जे लोक नेहमी दुसऱ्यांशी भांडत असतात आणि शत्रू बनवतात. अशा लोकांपासून इतर लोक अंतर ठेवतात. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही. माणसाची ही वाईट वागणूक ना त्याला यश मिळवू देत ना आनंद! अशी व्यक्ती आपल्या कुटुंबाची हानी आणि बदनामी करून घेतात.

>>जे लोक स्वतः कर्म करून पैसा कमावण्याऐवजी इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, त्यांना आयुष्यात कधीही सुख मिळत नाही. उलट चोरी, लबाडी आणि फसवणूक करून कमावलेला पैसा त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा नाश करतो.

>>जे लोक आपल्या मित्रपरिवाराला अडचणीच्या वेळी मदत करत नाहीत, लोक त्यांना साथही देत ​​नाहीत. अडचणीच्या वेळी या लोकांना कोणीही मदत करत नाही. ते त्यांच्या आयुष्यात एकाकी पडतात. 

>>जी व्यक्ती आयुष्यभर स्वतःसाठी जगते अशा व्यक्तीलाही स्वर्गात जागा मिळत नाही. याउलट जे लोक इतरांना सहकार्य, सेवा, मदत करतात त्यांना नरकाची भीती नसते. 

>>सतत रागावणाऱ्या लोकांच्या आयुष्यात शेवटी पश्चातापच भोगण्याची वेळ येते. रागामुळे त्याच्या स्वतःच्या घरातील लोकांनाही त्याच्यासोबत राहणे आवडत नाही. रागामुळे ते त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या संधी गमावतात आणि त्यांची ऊर्जा नकारात्मक कामात वाया घालवतात. असे लोक मेले तरी समाजाला काही फरक पडत नाही. आयुष्यभर दुसऱ्यांना त्रास दिल्याची शिक्षा म्हणून जिवंतपणी आणि मृत्यूपश्चातही नरक भोगावा लागतो!