शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतर नरकाचे दार टाळायचे असेल तर जिवंतपणी 'या' चुका प्रकर्षाने टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:14 IST

भगवंताने सर्वकाही देऊनही त्याचा सुयोग्य वापर केला नाही तर जन्माला येऊनही आपण मृतवत आयुष्य जगलो असे शास्त्रकार सांगतात.

मनुष्य जन्माला येतो, वाढतो, जगतो आणि एक दिवस मरतो. या कालावधीत तो काय करतो यावर त्याचा मृत्यूनंतरचा प्रवास ठरतो. किडा मुंगीदेखील जगतात, परंतु मनुष्य जन्म त्यांच्यापेक्षा वेगळा आहे कारण परमेश्वराने मनुष्याला देह, बुद्धी, विचारशील मन आणि कृती करायला हात, पाय असे सर्व काही दिले आहे. त्याचा सुयोग्य वापर केला नाही तर जन्माला येऊनही आपण मृतवत आयुष्य जगलो असे शास्त्रकार सांगतात. दर वाढदिवसाला आपल्या गत आयुष्याचे सिंहावलोकन करून पुढील आयुष्यात मागे झालेल्या चुका टाळणे ही आपल्यासाठी संधी असते. त्यासाठी शास्त्रकारांनी केलेले मार्गदर्शन पुढीलप्रमाणे- 

>>ज्या लोकांमध्ये दयाभाव नाही, त्यांचे जीवन व्यर्थ आहे. इतकेच नाही तर त्यांच्या स्वभावाचा हा कठोरपणा त्यांना माणूस म्हणवून घेण्याचा हक्क देत नाही निष्ठुरपणाने जगणाऱ्या लोकांचे जीवनात मोठे नुकसान होते.

>>जे लोक नेहमी दुसऱ्यांशी भांडत असतात आणि शत्रू बनवतात. अशा लोकांपासून इतर लोक अंतर ठेवतात. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही. माणसाची ही वाईट वागणूक ना त्याला यश मिळवू देत ना आनंद! अशी व्यक्ती आपल्या कुटुंबाची हानी आणि बदनामी करून घेतात.

>>जे लोक स्वतः कर्म करून पैसा कमावण्याऐवजी इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, त्यांना आयुष्यात कधीही सुख मिळत नाही. उलट चोरी, लबाडी आणि फसवणूक करून कमावलेला पैसा त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा नाश करतो.

>>जे लोक आपल्या मित्रपरिवाराला अडचणीच्या वेळी मदत करत नाहीत, लोक त्यांना साथही देत ​​नाहीत. अडचणीच्या वेळी या लोकांना कोणीही मदत करत नाही. ते त्यांच्या आयुष्यात एकाकी पडतात. 

>>जी व्यक्ती आयुष्यभर स्वतःसाठी जगते अशा व्यक्तीलाही स्वर्गात जागा मिळत नाही. याउलट जे लोक इतरांना सहकार्य, सेवा, मदत करतात त्यांना नरकाची भीती नसते. 

>>सतत रागावणाऱ्या लोकांच्या आयुष्यात शेवटी पश्चातापच भोगण्याची वेळ येते. रागामुळे त्याच्या स्वतःच्या घरातील लोकांनाही त्याच्यासोबत राहणे आवडत नाही. रागामुळे ते त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या संधी गमावतात आणि त्यांची ऊर्जा नकारात्मक कामात वाया घालवतात. असे लोक मेले तरी समाजाला काही फरक पडत नाही. आयुष्यभर दुसऱ्यांना त्रास दिल्याची शिक्षा म्हणून जिवंतपणी आणि मृत्यूपश्चातही नरक भोगावा लागतो!