शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:45 IST

काही लोकांशी घातलेले वाद आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकतात. ते वाद टाळा असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहेत.

स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, मूर्खांशी वाद घालणे म्हणजे मूर्खांची संख्या आणखी एकाने वाढवणे. किंवा आपले पूर्वजही नेहमी सांगत असत, चिखलात दगड मारून काय उपयोग? आपल्याच अंगावर शिंतोडे उडणार. म्हणून आवश्यक तिथे वाद जरूर घाला पण आचार्य चाणक्य यांच्या मते पुढील चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा, जेणेकरून भविष्यातील पश्चात्ताप टळेल. 

वादांपासून दूर राहणे नेहमीच चांगले, परंतु काही ठिकाणी हक्कासाठी, न्यायासाठी, सत्यासाठी आवाज उठवावाच लागतो. त्यामुळे वाद उद्भवतात. मात्र काही लोकांशी घातलेले वाद आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकतात. ते वाद टाळा असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहेत.

आचार्य चाणक्याची धोरणे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहेत. मग ते जीवनात यश मिळवण्यासाठी असो, श्रीमंत होण्यासाठी असो, संकटातून बाहेर पडण्यासाठी असो किंवा संकटातून मुक्त होण्यासाठी असो. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली धोरणे आजही तितकीच समर्पक आहेत. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला जीवनातील त्रास आणि पश्चात्ताप टाळायचा असेल तर पुढील चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा. 

मूर्ख व्यक्ती - आचार्य चाणक्य म्हणतात की, मूर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नये. यातून तुमचा वेळ तर वाया जातोच पण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून ती व्यक्ती तुमची प्रतिमाही खराब करू शकते म्हणून मूर्ख व्यक्तीपासून अंतर ठेवणे चांगले.

मित्र- चांगला आणि खरा मित्र हा प्रत्येक सुख-दु:खाचा साथीदार असतो. जर तुम्ही त्याच्याशी वाद घातला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अतिशय प्रेमळ आणि विश्वासार्ह नाते गमावाल. तसेच जर एखादा मित्र तुमचा शत्रू झाला तर तो तुमची अनेक गुपिते उघड करून तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

नातेवाईक - आई-वडील, भावंड, पत्नी किंवा मुलांशी कधीही वाद घालू नका. कारण छोट्याशा कारणापायी झालेला वाद आयुष्यभराचे नाते तोडू शकते. आणि ती चूक तुम्हाला आयुष्यभर दुःख देऊ शकते.

गुरू- जीवनात गुरुची भूमिका खूप महत्त्वाची असते. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो. आव्हानांना कसे सामोरे जावे हे स्पष्ट करते. तुम्हाला ज्ञान देते. म्हणून गुरूशी कधीही वाद घालू नका, अन्यथा गुरूंच्या कृपेपासून वंचित राहाल.