शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:45 IST

काही लोकांशी घातलेले वाद आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकतात. ते वाद टाळा असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहेत.

स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, मूर्खांशी वाद घालणे म्हणजे मूर्खांची संख्या आणखी एकाने वाढवणे. किंवा आपले पूर्वजही नेहमी सांगत असत, चिखलात दगड मारून काय उपयोग? आपल्याच अंगावर शिंतोडे उडणार. म्हणून आवश्यक तिथे वाद जरूर घाला पण आचार्य चाणक्य यांच्या मते पुढील चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा, जेणेकरून भविष्यातील पश्चात्ताप टळेल. 

वादांपासून दूर राहणे नेहमीच चांगले, परंतु काही ठिकाणी हक्कासाठी, न्यायासाठी, सत्यासाठी आवाज उठवावाच लागतो. त्यामुळे वाद उद्भवतात. मात्र काही लोकांशी घातलेले वाद आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकतात. ते वाद टाळा असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहेत.

आचार्य चाणक्याची धोरणे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहेत. मग ते जीवनात यश मिळवण्यासाठी असो, श्रीमंत होण्यासाठी असो, संकटातून बाहेर पडण्यासाठी असो किंवा संकटातून मुक्त होण्यासाठी असो. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली धोरणे आजही तितकीच समर्पक आहेत. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला जीवनातील त्रास आणि पश्चात्ताप टाळायचा असेल तर पुढील चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा. 

मूर्ख व्यक्ती - आचार्य चाणक्य म्हणतात की, मूर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नये. यातून तुमचा वेळ तर वाया जातोच पण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून ती व्यक्ती तुमची प्रतिमाही खराब करू शकते म्हणून मूर्ख व्यक्तीपासून अंतर ठेवणे चांगले.

मित्र- चांगला आणि खरा मित्र हा प्रत्येक सुख-दु:खाचा साथीदार असतो. जर तुम्ही त्याच्याशी वाद घातला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अतिशय प्रेमळ आणि विश्वासार्ह नाते गमावाल. तसेच जर एखादा मित्र तुमचा शत्रू झाला तर तो तुमची अनेक गुपिते उघड करून तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

नातेवाईक - आई-वडील, भावंड, पत्नी किंवा मुलांशी कधीही वाद घालू नका. कारण छोट्याशा कारणापायी झालेला वाद आयुष्यभराचे नाते तोडू शकते. आणि ती चूक तुम्हाला आयुष्यभर दुःख देऊ शकते.

गुरू- जीवनात गुरुची भूमिका खूप महत्त्वाची असते. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो. आव्हानांना कसे सामोरे जावे हे स्पष्ट करते. तुम्हाला ज्ञान देते. म्हणून गुरूशी कधीही वाद घालू नका, अन्यथा गुरूंच्या कृपेपासून वंचित राहाल.