शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:45 IST

काही लोकांशी घातलेले वाद आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकतात. ते वाद टाळा असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहेत.

स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, मूर्खांशी वाद घालणे म्हणजे मूर्खांची संख्या आणखी एकाने वाढवणे. किंवा आपले पूर्वजही नेहमी सांगत असत, चिखलात दगड मारून काय उपयोग? आपल्याच अंगावर शिंतोडे उडणार. म्हणून आवश्यक तिथे वाद जरूर घाला पण आचार्य चाणक्य यांच्या मते पुढील चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा, जेणेकरून भविष्यातील पश्चात्ताप टळेल. 

वादांपासून दूर राहणे नेहमीच चांगले, परंतु काही ठिकाणी हक्कासाठी, न्यायासाठी, सत्यासाठी आवाज उठवावाच लागतो. त्यामुळे वाद उद्भवतात. मात्र काही लोकांशी घातलेले वाद आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकतात. ते वाद टाळा असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहेत.

आचार्य चाणक्याची धोरणे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहेत. मग ते जीवनात यश मिळवण्यासाठी असो, श्रीमंत होण्यासाठी असो, संकटातून बाहेर पडण्यासाठी असो किंवा संकटातून मुक्त होण्यासाठी असो. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली धोरणे आजही तितकीच समर्पक आहेत. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला जीवनातील त्रास आणि पश्चात्ताप टाळायचा असेल तर पुढील चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा. 

मूर्ख व्यक्ती - आचार्य चाणक्य म्हणतात की, मूर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नये. यातून तुमचा वेळ तर वाया जातोच पण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून ती व्यक्ती तुमची प्रतिमाही खराब करू शकते म्हणून मूर्ख व्यक्तीपासून अंतर ठेवणे चांगले.

मित्र- चांगला आणि खरा मित्र हा प्रत्येक सुख-दु:खाचा साथीदार असतो. जर तुम्ही त्याच्याशी वाद घातला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अतिशय प्रेमळ आणि विश्वासार्ह नाते गमावाल. तसेच जर एखादा मित्र तुमचा शत्रू झाला तर तो तुमची अनेक गुपिते उघड करून तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

नातेवाईक - आई-वडील, भावंड, पत्नी किंवा मुलांशी कधीही वाद घालू नका. कारण छोट्याशा कारणापायी झालेला वाद आयुष्यभराचे नाते तोडू शकते. आणि ती चूक तुम्हाला आयुष्यभर दुःख देऊ शकते.

गुरू- जीवनात गुरुची भूमिका खूप महत्त्वाची असते. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो. आव्हानांना कसे सामोरे जावे हे स्पष्ट करते. तुम्हाला ज्ञान देते. म्हणून गुरूशी कधीही वाद घालू नका, अन्यथा गुरूंच्या कृपेपासून वंचित राहाल.