शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

तणावमुक्त आयुष्य जगायचे असेल, तर हा 'खात्रीशीर' उपाय नक्की करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:25 IST

यापुढे जेव्हा जेव्हा मनावर ताण येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला समजवा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत बाकी गोष्टी ज्या माझ्या आवाक्यात नाहीत त्या मी देवावर सोपवून दिल्या आहेत. क्षणार्धात ताण नाहीसा होतो की नाही बघा.

जवळपास १०० कोटी रुपयांची उलाढाल असणारा एक व्यावसायिक रोज रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतो, याउलट दिवसाला शंभर रुपये कमावणारा कामगार पाठ टेकवताच झोपी जातो. वास्तविक हेचित्र उलट असायला हवे ना? परंतु तसे होत नाही. कारण १०० कोटी कमावणारा २०० कोटींपर्यंत व्यवसाय कसा नेता येईल या विवंचनेत असतो, तर १०० रुपये कमावणारा आजचा दिवस भागला या समाधानात झोपतो. तात्पर्य, जो समाधानी असतो, तो तणावमुक्त असतो.

बालपणापासून आपल्यावर समाधानी राहण्याचा संस्कारच झालेला नाही. दुसऱ्याला कणभर जास्त गेलेले आपल्याला पचत नाही, रुचत नाही. परंतु त्याच्या आणि आपल्या वाट्यात फक्त कणभराचा फरक आहे, हे मन स्वीकारत नाही. हीच सवय मनाला जडते आणि कणभराने वाढलेल्या अपेक्षा मणभर कधी होत जातात, हे आपल्याही लक्षात येत नाही. 

आपण सगळेच जण काही ना काही कारणांनी सतत दुःखी असतो. कारण आपण सगळेच आपल्या मनावर अदृश्य स्वरूपात असलेले अपेक्षांचे ओझे वाहत असतो. या ओझ्याखाली दबून जीवाची घुसमट होतेय, परंतु ते ओझे उतरवून खाली ठेवण्याची आपल्याला शुद्धच राहिलेली नाही. अपेक्षा न संपणाऱ्या आहेत, परंतु आपल्याला समाधानी राहायला शिकायचे आहे. ते कसे राहायचे ते पाहू!

आपल्या आवाक्यात शंभर गोष्टी असतील, परंतु हजार गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत, हे आपण मान्य करत नाही. यासाठी आपण आपल्या कामाप्रती शंभर टक्के द्यावेत बाकी भार देवावर सोपवावा. दिवसभर अथक परिश्रम करावेत, परंतु या परिश्रमाचे फळ काय मिळेल हे आपल्या हाती नाही, म्हणून तो भार देवावर टाकावा. 

रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराचे कर्म देवाच्या पायी अर्पण करून त्या कर्माचे फळ 'तुला उचित वाटेल ते दे', असे म्हणून आपण निश्चिन्त मनाने झोपी जावे. सगळा तणाव क्षणार्धात नष्ट होईल. कोणीतरी आपली काळजी घेणारं आहे, ही भावनादेखील अत्यन्त दिलासादायक असते. अंधारात एकट्याला चालताना भीती वाटेल, पण कोणाची सोबत असेल तर धीर वाटतो. त्याचप्रमाणे भविष्यात काय दडले आहे, हे आपल्याला दिसत नाही. पुढे चाचपडत जाताना भगवंत आपल्या सोबत आहे, ही भावना मनाला नक्कीच उभारी देते. म्हणून हा प्रवास न थांबता करायचा असेल, तर त्याला सोबती बनवा आणि काही भार स्वतः वर घेऊन तर काही भार देवावर सोपवून निश्चिन्त व्हा. 

यापुढे जेव्हा जेव्हा मनावर ताण येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला समजवा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत बाकी गोष्टी ज्या माझ्या आवाक्यात नाहीत त्या मी देवावर सोपवून दिल्या आहेत. क्षणार्धात ताण नाहीसा होतो की नाही बघा. चिंता करून चिंता दूर होत नाहीत, मग विश्वास ठेवून चिंता दूर करण्याचा प्रयत्न करूया. बरोबर ना?