शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

तणावमुक्त आयुष्य जगायचे असेल, तर हा 'खात्रीशीर' उपाय नक्की करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:25 IST

यापुढे जेव्हा जेव्हा मनावर ताण येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला समजवा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत बाकी गोष्टी ज्या माझ्या आवाक्यात नाहीत त्या मी देवावर सोपवून दिल्या आहेत. क्षणार्धात ताण नाहीसा होतो की नाही बघा.

जवळपास १०० कोटी रुपयांची उलाढाल असणारा एक व्यावसायिक रोज रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतो, याउलट दिवसाला शंभर रुपये कमावणारा कामगार पाठ टेकवताच झोपी जातो. वास्तविक हेचित्र उलट असायला हवे ना? परंतु तसे होत नाही. कारण १०० कोटी कमावणारा २०० कोटींपर्यंत व्यवसाय कसा नेता येईल या विवंचनेत असतो, तर १०० रुपये कमावणारा आजचा दिवस भागला या समाधानात झोपतो. तात्पर्य, जो समाधानी असतो, तो तणावमुक्त असतो.

बालपणापासून आपल्यावर समाधानी राहण्याचा संस्कारच झालेला नाही. दुसऱ्याला कणभर जास्त गेलेले आपल्याला पचत नाही, रुचत नाही. परंतु त्याच्या आणि आपल्या वाट्यात फक्त कणभराचा फरक आहे, हे मन स्वीकारत नाही. हीच सवय मनाला जडते आणि कणभराने वाढलेल्या अपेक्षा मणभर कधी होत जातात, हे आपल्याही लक्षात येत नाही. 

आपण सगळेच जण काही ना काही कारणांनी सतत दुःखी असतो. कारण आपण सगळेच आपल्या मनावर अदृश्य स्वरूपात असलेले अपेक्षांचे ओझे वाहत असतो. या ओझ्याखाली दबून जीवाची घुसमट होतेय, परंतु ते ओझे उतरवून खाली ठेवण्याची आपल्याला शुद्धच राहिलेली नाही. अपेक्षा न संपणाऱ्या आहेत, परंतु आपल्याला समाधानी राहायला शिकायचे आहे. ते कसे राहायचे ते पाहू!

आपल्या आवाक्यात शंभर गोष्टी असतील, परंतु हजार गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत, हे आपण मान्य करत नाही. यासाठी आपण आपल्या कामाप्रती शंभर टक्के द्यावेत बाकी भार देवावर सोपवावा. दिवसभर अथक परिश्रम करावेत, परंतु या परिश्रमाचे फळ काय मिळेल हे आपल्या हाती नाही, म्हणून तो भार देवावर टाकावा. 

रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराचे कर्म देवाच्या पायी अर्पण करून त्या कर्माचे फळ 'तुला उचित वाटेल ते दे', असे म्हणून आपण निश्चिन्त मनाने झोपी जावे. सगळा तणाव क्षणार्धात नष्ट होईल. कोणीतरी आपली काळजी घेणारं आहे, ही भावनादेखील अत्यन्त दिलासादायक असते. अंधारात एकट्याला चालताना भीती वाटेल, पण कोणाची सोबत असेल तर धीर वाटतो. त्याचप्रमाणे भविष्यात काय दडले आहे, हे आपल्याला दिसत नाही. पुढे चाचपडत जाताना भगवंत आपल्या सोबत आहे, ही भावना मनाला नक्कीच उभारी देते. म्हणून हा प्रवास न थांबता करायचा असेल, तर त्याला सोबती बनवा आणि काही भार स्वतः वर घेऊन तर काही भार देवावर सोपवून निश्चिन्त व्हा. 

यापुढे जेव्हा जेव्हा मनावर ताण येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला समजवा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत बाकी गोष्टी ज्या माझ्या आवाक्यात नाहीत त्या मी देवावर सोपवून दिल्या आहेत. क्षणार्धात ताण नाहीसा होतो की नाही बघा. चिंता करून चिंता दूर होत नाहीत, मग विश्वास ठेवून चिंता दूर करण्याचा प्रयत्न करूया. बरोबर ना?