शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

सर्व प्रकारच्या दुःखाचा शेवट करायचा असेल तर मंत्र एकच- सोडून द्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 11, 2021 19:15 IST

मूर्ख लोकांशी वाद घालून मूर्खांची संख्या एकाने वाढवू नये.

कोणी आपल्यासमोर त्याचे दुःख उगाळू लागले, की सांत्वनपर आपण एकच वाक्य म्हणतो, 'जाऊ द्या, सोडून द्या...!' पण वेळ जेव्हा आपल्यावर येते, तेव्हा हे शब्द कानावर पडताच आपण राग राग करतो. परंतु, शांत डोक्याने विचार केला, तर काही गोष्टी सोडून देण्यातच खरे शहाणपण असते. स्वामी विवेकानंद म्हणत, 'मूर्ख लोकांशी वाद घालून मूर्खांची संख्या एकाने वाढवू नये.' त्याप्रमाणे ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नाहीत, त्या सोडून द्याव्यात आणि नवीन गोष्टींचा ध्यास घेऊन आयुष्य सुरु ठेवावे. समाज माध्यमावर वाचण्यात आलेल्या एका कवितेत खूप छान वर्णन केले आहे,

एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेलतर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं

ऐकूनही न ऐकल्या सारखं करत असतील तर उगाचंच संवाद साधणं सोडून द्यावं

मुलं मोठी झाल्या वर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं

एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवलीतर मनावर घेणं सोडून द्यावं

आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं

ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणंसोडून द्यावं

प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळंम्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं

आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं  सोडून द्यावं