शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सर्व प्रकारच्या दुःखाचा शेवट करायचा असेल तर मंत्र एकच- सोडून द्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 11, 2021 19:15 IST

मूर्ख लोकांशी वाद घालून मूर्खांची संख्या एकाने वाढवू नये.

कोणी आपल्यासमोर त्याचे दुःख उगाळू लागले, की सांत्वनपर आपण एकच वाक्य म्हणतो, 'जाऊ द्या, सोडून द्या...!' पण वेळ जेव्हा आपल्यावर येते, तेव्हा हे शब्द कानावर पडताच आपण राग राग करतो. परंतु, शांत डोक्याने विचार केला, तर काही गोष्टी सोडून देण्यातच खरे शहाणपण असते. स्वामी विवेकानंद म्हणत, 'मूर्ख लोकांशी वाद घालून मूर्खांची संख्या एकाने वाढवू नये.' त्याप्रमाणे ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नाहीत, त्या सोडून द्याव्यात आणि नवीन गोष्टींचा ध्यास घेऊन आयुष्य सुरु ठेवावे. समाज माध्यमावर वाचण्यात आलेल्या एका कवितेत खूप छान वर्णन केले आहे,

एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेलतर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं

ऐकूनही न ऐकल्या सारखं करत असतील तर उगाचंच संवाद साधणं सोडून द्यावं

मुलं मोठी झाल्या वर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं

एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवलीतर मनावर घेणं सोडून द्यावं

आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं

ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणंसोडून द्यावं

प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळंम्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं

आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं  सोडून द्यावं