शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आपल्यात किती संयम आहे हे तपासून पहायचे असेल तर 'ही' गोष्ट वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:28 IST

आयुष्यात आपल्यावरही अशी जिवन-मृत्यूशी झुंज देण्याची वेळ येते. अशा वेळी आपल्याला मदतीचा हात येईपर्यंत तग धरून ठेवण्याची तयारी दाखवायला हवी.

तग धरण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणाचे पटकन अवसान गळते, तर कोणी स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहते. याबाबत एका शास्त्रज्ञाने एक सिद्धांत मांडला, तो सिद्धांत होता `संयमाचा सिद्धांत' त्याबाबत एक गोष्ट आहे ती अशी-

एका शास्त्रज्ञाने प्रयोग म्हणून एका उंदराची क्षमता पाहायची असे ठरवले. त्याने एका पाणी पिण्याच्या खोलगट भांड्यात एका उंदराला टाकले आणि काही वेळात त्याची धडपड पाहून त्याला बाहेर काढले.

दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा एकदा तो प्रयोग केला. मात्र यावेळेस त्या भांड्यात पाणी टाकले आणि नंतर उंदराला आत सोडले. कालच्यासारखाच बाहेर पडण्यासाठी उंदीर प्रयत्न करू लागला. परंतु शास्त्रज्ञाला आज त्याच्या संयमाची परीक्षा घ्यायची होती. म्हणून यावेळेस त्याने मदतीचा हात पुढे केला नाही. परंतु आश्चर्य म्हणजे पाणी भरलेल्या त्या भांड्यात पोहता येत नसतानाही उंदराने बाहेर पडण्याची खटाटोप सुरू ठेवली.

त्याची धडपड अतिशय केविलवाणी होती. परंतु अशा प्रसंगी भावुक होऊन चालणार नव्हते. म्हणून शास्त्रज्ञाने आणखी काही काळ त्याची परीक्षा पाहिली. तर काय आश्चर्य...पुढचा दीड दिवस त्या उंदराने अथकपणे हात पाय मारत बाहेर पडण्याची जिद्द कायम ठेवली. शेवटी शास्त्रज्ञाने त्याचा आणखी अंत न पाहता त्याला सुरक्षित पणे बाहेर काढून उबदार जागेत ठेवले आणि उंदराचे प्राण वाचवले. या सिद्धांताला त्याने `संयमाचा सिद्धांत' असे नाव दिले. 

तुम्ही म्हणाल, यात कुठला आलाय सिद्धांत? उंदराने तग धरली, याला सिद्धांत म्हणावे का? तर नाही, सिद्धांत हा आहे, की उंदराने तोपर्यंत जगण्याची जिद्द कायम ठेवली, जोपर्यंत त्याला आदल्या दिवशीसारखा मदतीचा हात मिळाला नाही. तो हात मिळेपर्यंत एवढ्याशा जिवाने मृत्यूशी झुंज दिली, संयमाचा कस लावला आणि तग धरून ठेवण्यात यशस्वी झाला, त्यालाच शास्त्रज्ञाने संयमाचा सिद्धांत असे नाव दिले.

आयुष्यात आपल्यावरही अशी जिवन-मृत्यूशी झुंज देण्याची वेळ येते. अशा वेळी आपल्याला मदतीचा हात येईपर्यंत तग धरून ठेवण्याची तयारी दाखवायला हवी. तो हात एक ना एक दिवस मदतीला नक्की येईल, आपण तोवर संयम दाखवायला हवा!