शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

आपल्यात किती संयम आहे हे तपासून पहायचे असेल तर 'ही' गोष्ट वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:28 IST

आयुष्यात आपल्यावरही अशी जिवन-मृत्यूशी झुंज देण्याची वेळ येते. अशा वेळी आपल्याला मदतीचा हात येईपर्यंत तग धरून ठेवण्याची तयारी दाखवायला हवी.

तग धरण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणाचे पटकन अवसान गळते, तर कोणी स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहते. याबाबत एका शास्त्रज्ञाने एक सिद्धांत मांडला, तो सिद्धांत होता `संयमाचा सिद्धांत' त्याबाबत एक गोष्ट आहे ती अशी-

एका शास्त्रज्ञाने प्रयोग म्हणून एका उंदराची क्षमता पाहायची असे ठरवले. त्याने एका पाणी पिण्याच्या खोलगट भांड्यात एका उंदराला टाकले आणि काही वेळात त्याची धडपड पाहून त्याला बाहेर काढले.

दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा एकदा तो प्रयोग केला. मात्र यावेळेस त्या भांड्यात पाणी टाकले आणि नंतर उंदराला आत सोडले. कालच्यासारखाच बाहेर पडण्यासाठी उंदीर प्रयत्न करू लागला. परंतु शास्त्रज्ञाला आज त्याच्या संयमाची परीक्षा घ्यायची होती. म्हणून यावेळेस त्याने मदतीचा हात पुढे केला नाही. परंतु आश्चर्य म्हणजे पाणी भरलेल्या त्या भांड्यात पोहता येत नसतानाही उंदराने बाहेर पडण्याची खटाटोप सुरू ठेवली.

त्याची धडपड अतिशय केविलवाणी होती. परंतु अशा प्रसंगी भावुक होऊन चालणार नव्हते. म्हणून शास्त्रज्ञाने आणखी काही काळ त्याची परीक्षा पाहिली. तर काय आश्चर्य...पुढचा दीड दिवस त्या उंदराने अथकपणे हात पाय मारत बाहेर पडण्याची जिद्द कायम ठेवली. शेवटी शास्त्रज्ञाने त्याचा आणखी अंत न पाहता त्याला सुरक्षित पणे बाहेर काढून उबदार जागेत ठेवले आणि उंदराचे प्राण वाचवले. या सिद्धांताला त्याने `संयमाचा सिद्धांत' असे नाव दिले. 

तुम्ही म्हणाल, यात कुठला आलाय सिद्धांत? उंदराने तग धरली, याला सिद्धांत म्हणावे का? तर नाही, सिद्धांत हा आहे, की उंदराने तोपर्यंत जगण्याची जिद्द कायम ठेवली, जोपर्यंत त्याला आदल्या दिवशीसारखा मदतीचा हात मिळाला नाही. तो हात मिळेपर्यंत एवढ्याशा जिवाने मृत्यूशी झुंज दिली, संयमाचा कस लावला आणि तग धरून ठेवण्यात यशस्वी झाला, त्यालाच शास्त्रज्ञाने संयमाचा सिद्धांत असे नाव दिले.

आयुष्यात आपल्यावरही अशी जिवन-मृत्यूशी झुंज देण्याची वेळ येते. अशा वेळी आपल्याला मदतीचा हात येईपर्यंत तग धरून ठेवण्याची तयारी दाखवायला हवी. तो हात एक ना एक दिवस मदतीला नक्की येईल, आपण तोवर संयम दाखवायला हवा!