शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या चार गोष्टी कायम लक्षात ठेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 15:21 IST

कोणतीही लढाई आधी मनात जिंकावी लागते, तरच जनात ती लढाई जिंकणे शक्य होते!

आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु यश कोणाला पटकन मिळते तर कोणाला मिळता मिळता हुलकावणी देते. अपयशासाठी केवळ नशिबाला दोष देऊन उपयोग नाही, तर आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेत की नाही हे पाहणेही महत्त्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये चार कारणे विशेष अधोरेखित केली आहेत. ही चाणक्य नीती आपल्यालाही अनुसरता आली तर अपयशाच्या मुळापर्यंत पोहोचणे सोपे जाईल. चला तर जाणून घेऊया त्या चार गोष्टी-

>>लोक यशस्वी लोकांच्या मागे धावतात, पण तुम्ही अपयशी लोकांशी चर्चा करा. त्यांना का अपयश आले, हे आपल्याला त्यांच्या अनुभवावरून कळेल आणि त्यांनी केलेल्या चुका भविष्यात टाळता येतील. दर वेळी स्वतःच्या चुकांमधून शिकायला हवे असे नाही, दुसऱ्यांच्या चुकांमधून आपणही धडा घेतला पाहिजे. त्यालाच मराठीत म्हण आहे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा!

>>यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा. त्यांनी कोणत्या पद्धतीने स्वतःची प्रगती केली. त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली, याचे  प्रशिक्षण आपल्याला त्यांच्या अनुभवातून मिळू शकते. 

>>यशस्वी आणि अपयशी लोकांकडून शिकण्यासारख्या गोष्टींची तुमच्याकडे नोंद करा. जेणेकरून तुमच्या आयुष्यात असे प्रसंग उद्भवल्यास तुम्हाला त्या प्रसंगाशी कसे तोंड द्यायचे आहे याची आपली वैचारिक तयारी झालेली असेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेण्याची सवय लागली, की तुमचे निर्णय चुकणार नाहीत आणि एखादा निर्णय चुकला तरी त्यावर मात करण्यासाठी तुम्ही सिद्ध असाल. 

>>कठीण प्रसंगात आपण त्या प्रसंगाला तोंड कसे देतो, यावर यशापयश आवलंबून असते. सकारात्मक विचार करणारी व्यक्ती प्रत्येक कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचे सामर्थ्य बाळगते. अशी व्यक्ती शांत डोक्याने प्रत्येक गोष्ट यशस्वीपणे पार पाडू शकते.