शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या चार गोष्टी कायम लक्षात ठेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 15:21 IST

कोणतीही लढाई आधी मनात जिंकावी लागते, तरच जनात ती लढाई जिंकणे शक्य होते!

आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु यश कोणाला पटकन मिळते तर कोणाला मिळता मिळता हुलकावणी देते. अपयशासाठी केवळ नशिबाला दोष देऊन उपयोग नाही, तर आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेत की नाही हे पाहणेही महत्त्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये चार कारणे विशेष अधोरेखित केली आहेत. ही चाणक्य नीती आपल्यालाही अनुसरता आली तर अपयशाच्या मुळापर्यंत पोहोचणे सोपे जाईल. चला तर जाणून घेऊया त्या चार गोष्टी-

>>लोक यशस्वी लोकांच्या मागे धावतात, पण तुम्ही अपयशी लोकांशी चर्चा करा. त्यांना का अपयश आले, हे आपल्याला त्यांच्या अनुभवावरून कळेल आणि त्यांनी केलेल्या चुका भविष्यात टाळता येतील. दर वेळी स्वतःच्या चुकांमधून शिकायला हवे असे नाही, दुसऱ्यांच्या चुकांमधून आपणही धडा घेतला पाहिजे. त्यालाच मराठीत म्हण आहे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा!

>>यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा. त्यांनी कोणत्या पद्धतीने स्वतःची प्रगती केली. त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली, याचे  प्रशिक्षण आपल्याला त्यांच्या अनुभवातून मिळू शकते. 

>>यशस्वी आणि अपयशी लोकांकडून शिकण्यासारख्या गोष्टींची तुमच्याकडे नोंद करा. जेणेकरून तुमच्या आयुष्यात असे प्रसंग उद्भवल्यास तुम्हाला त्या प्रसंगाशी कसे तोंड द्यायचे आहे याची आपली वैचारिक तयारी झालेली असेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेण्याची सवय लागली, की तुमचे निर्णय चुकणार नाहीत आणि एखादा निर्णय चुकला तरी त्यावर मात करण्यासाठी तुम्ही सिद्ध असाल. 

>>कठीण प्रसंगात आपण त्या प्रसंगाला तोंड कसे देतो, यावर यशापयश आवलंबून असते. सकारात्मक विचार करणारी व्यक्ती प्रत्येक कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचे सामर्थ्य बाळगते. अशी व्यक्ती शांत डोक्याने प्रत्येक गोष्ट यशस्वीपणे पार पाडू शकते.