शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोणी मदत करेल याची वाट बघत बसलात, तर तुमची वाट निश्चितच चुकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:21 IST

स्वावलंबी व्हा. स्वत:च्या कष्टाने मिळेल, तेवढेच घ्या. दुसऱ्याच्या मेहेरबानीवर जगण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगणे केव्हाही चांगले!

'जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' अशा शब्दात समर्थ रामदास स्वामी आपली कानउघडणी करतात. परंतु आपण सुधारत नाही. आपल्याला छोट्या छोट्या बाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय लागलेली असते. ही सवय एक दिवस आपला घात करते. कशी ते पहा...

एका शेतकऱ्याला मुलगा होता. शेतकऱ्याला वाटत होते, भविष्यात मुलाने आपले काम सांभाळावे. परंतु मुलाला राजाच्या सैन्यात भरती व्हायचे होते. शेतकऱ्याने त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा दिली. मुलाला सैन्यात भरती व्हायचे असले, तरी त्यासाठी लागणारे कोणतेही गुण त्याच्या अंगी नव्हते. ना कमावलेले शरीर ना शस्त्र विद्येत प्राविण्य. त्याचा मामा सैन्यात सेनापती होता. मुलाने आपल्या आईला सांगून मामाकडे शब्द टाकायला लावला. भाच्याला नकार कसा द्यायचा, म्हणून मामाने त्याला सैन्यात भरती करून घेतले, पण जिथे विशेष कामे नसतात, अशा विभागात त्याची नियुक्ती केली.

मुलगा इतर सैनिकांसारखा ताठ मानेने गावात फिरू लागला. एकदा परराज्यातून हल्ला झाला आणि सैन्य विभागाच्या तळा गाळातील सैनिकांनासुद्धा युद्धभूमीवर लढण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस या मुलालाही नाईलाजाने जावे लागले. परंतु, त्याला युद्धाचे जराही ज्ञान नसल्याने इतर सैनिक त्याचे संरक्षण करत त्याला परत घेऊन आले. त्यांनी सेनापतीजवळ त्याची तक्रार केली. मामा असूनही सेनापतींचा नाईलाज झाला. त्यांनी भाच्याला राजाच्या दरबाराबाहेरचा पहारेकरी म्हणून नोकरी लावून दिली. 

दिवसरात्र उभे राहून, पहारा देऊन आधीच कमकुवत असलेला मुलगा प्रकृतीने आणखी ढासळू लागला. त्याला मामाचीसुद्धा साथ मिळणार नव्हती. तो राजाकडे काही वशिला लागेल या आशेने उभा असे. थंडीच्या दिवसात हुडहुडत पहारा देत असताना एक दिवस राजाचे लक्ष त्याच्याकडे गेले. राजाने त्याची चौकशी केली आणि सेवकांकरवी त्याच्यासाठी उबदार शाल पाठवतो, असे राजाने आश्वासन दिले. मुलाला हायसे वाटले. राजाने आपली दखल घेतली याचा त्याला आनंद झाला. परंतु बराच काळ वाट बघूनही आतून शाल आली नाही. कारण राजा महालात गेल्यावर ही छोटीशी गोष्ट विसरून गेला. परंतु, बाहेर उभ्या असलेल्या मुलाने शालीसाठी तिष्ठत प्राण सोडले.

या कथेवरून लक्षात येते, की कोणी आपल्या मदतीला धावून येईल, याची वाट बघत बसलात तर आहे तेही गमावून बसाल. म्हणून स्वावलंबी व्हा. स्वत:च्या कष्टाने मिळेल, तेवढेच घ्या. दुसऱ्याच्या मेहेरबानीवर जगण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगणे केव्हाही चांगले!