शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

कोणी मदत करेल याची वाट बघत बसलात, तर तुमची वाट निश्चितच चुकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:21 IST

स्वावलंबी व्हा. स्वत:च्या कष्टाने मिळेल, तेवढेच घ्या. दुसऱ्याच्या मेहेरबानीवर जगण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगणे केव्हाही चांगले!

'जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' अशा शब्दात समर्थ रामदास स्वामी आपली कानउघडणी करतात. परंतु आपण सुधारत नाही. आपल्याला छोट्या छोट्या बाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय लागलेली असते. ही सवय एक दिवस आपला घात करते. कशी ते पहा...

एका शेतकऱ्याला मुलगा होता. शेतकऱ्याला वाटत होते, भविष्यात मुलाने आपले काम सांभाळावे. परंतु मुलाला राजाच्या सैन्यात भरती व्हायचे होते. शेतकऱ्याने त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा दिली. मुलाला सैन्यात भरती व्हायचे असले, तरी त्यासाठी लागणारे कोणतेही गुण त्याच्या अंगी नव्हते. ना कमावलेले शरीर ना शस्त्र विद्येत प्राविण्य. त्याचा मामा सैन्यात सेनापती होता. मुलाने आपल्या आईला सांगून मामाकडे शब्द टाकायला लावला. भाच्याला नकार कसा द्यायचा, म्हणून मामाने त्याला सैन्यात भरती करून घेतले, पण जिथे विशेष कामे नसतात, अशा विभागात त्याची नियुक्ती केली.

मुलगा इतर सैनिकांसारखा ताठ मानेने गावात फिरू लागला. एकदा परराज्यातून हल्ला झाला आणि सैन्य विभागाच्या तळा गाळातील सैनिकांनासुद्धा युद्धभूमीवर लढण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस या मुलालाही नाईलाजाने जावे लागले. परंतु, त्याला युद्धाचे जराही ज्ञान नसल्याने इतर सैनिक त्याचे संरक्षण करत त्याला परत घेऊन आले. त्यांनी सेनापतीजवळ त्याची तक्रार केली. मामा असूनही सेनापतींचा नाईलाज झाला. त्यांनी भाच्याला राजाच्या दरबाराबाहेरचा पहारेकरी म्हणून नोकरी लावून दिली. 

दिवसरात्र उभे राहून, पहारा देऊन आधीच कमकुवत असलेला मुलगा प्रकृतीने आणखी ढासळू लागला. त्याला मामाचीसुद्धा साथ मिळणार नव्हती. तो राजाकडे काही वशिला लागेल या आशेने उभा असे. थंडीच्या दिवसात हुडहुडत पहारा देत असताना एक दिवस राजाचे लक्ष त्याच्याकडे गेले. राजाने त्याची चौकशी केली आणि सेवकांकरवी त्याच्यासाठी उबदार शाल पाठवतो, असे राजाने आश्वासन दिले. मुलाला हायसे वाटले. राजाने आपली दखल घेतली याचा त्याला आनंद झाला. परंतु बराच काळ वाट बघूनही आतून शाल आली नाही. कारण राजा महालात गेल्यावर ही छोटीशी गोष्ट विसरून गेला. परंतु, बाहेर उभ्या असलेल्या मुलाने शालीसाठी तिष्ठत प्राण सोडले.

या कथेवरून लक्षात येते, की कोणी आपल्या मदतीला धावून येईल, याची वाट बघत बसलात तर आहे तेही गमावून बसाल. म्हणून स्वावलंबी व्हा. स्वत:च्या कष्टाने मिळेल, तेवढेच घ्या. दुसऱ्याच्या मेहेरबानीवर जगण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगणे केव्हाही चांगले!