शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

'तुला भाग्य भेटले, तर माझे भाग्य कधी बदलेल विचार!'; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 14:16 IST

मिळालेल्या संधीचे सोने करता आले, तर भाग्य आपोआप उजळते अन्यथा दूर निघून जाते. 

एक मुलगा कायम आपल्या नशीबाला दोष देत असे. त्याने एका साधूंना गाठले आणि विचारले, माझे भाग्य कधी बदलेल ते सांगा. माझे भाग्य मला सोडून दूर निघून गेले आहे. 

यावर साधू म्हणाले, भाग्य सोडून गेले हा विचार करण्यापेक्षा तू तुझे काम करत राहा, भाग्य आपोआप मागे येईल.

मुलगा दिवसरात्र याच गोष्टीचा विचार करू लागला. स्वप्नातही त्याला हाच विषय दिसत असे. एके दिवशी पहाटे त्याने स्वप्न पाहिले, की आपले भाग्य आपल्यावर रुसुन एका उंच डोंगरावर जाऊन बसले आहे. स्वप्नातून जागे होताच, त्यो डोंगरावर जाऊन आपले भाग्य गाठायचे असा निश्चय केला. 

मुलगा आपले भाग्य गाठण्यासाठी डोंगराच्या दिशेने जाऊ लागला. वाटेत त्याला एक वाघ दिसला. वाघ अतिशय आजारी अवस्थेत असल्याने त्याला वाघाची भीती वाटली नाही. तो वाघाची नजर चुकवून जाणार, तोच वाघ त्याला बोलावतो आणि कुठे चाललास हे विचारतो. मुलगा हकिकत सांगतो. त्यावर वाघ म्हणतो, 'मी गेली कित्येक वर्षे आजारी आहे. तुला भाग्य भेटले, तर माझेही भाग्य कधी बदलेल विचार.'

मुलगा ठिक आहे म्हणतो आणि निघतो. पुढे त्याला एक बाग आढळते. तिथली फळे तोडतो आणि खातो. पण सगळीच फळे कडवट असतात. बागेचा मालक तिथे येतो आणि इथे का आलास हे विचारतो. मुलगा खरे कारण सांगतो. त्यावर बागमालक म्हणतो, 'आजवर एवढी मेहनत घेऊनही माझ्या बागेतली फळे कडवटच येतात. तुला भाग्य भेटले तर माझे भाग्य कधी बदलेल विचार.'

मुलगा त्यालाही ठिक आहे म्हणतो आणि निघतो. पुढे एक राजमहाल लागतो. तिथली सुंदर राजकन्या त्या मुलाला तिथे येण्याचे प्रयोजन विचारते. मुलगा सांगता़े राजकन्या म्हणजे `माझ्याकडे सगळे वैभव असूनही मी दु:खी आहे, तुला भाग्य भेटले तर माझे भाग्य कधी बदलेल विचार.'

तिलाही ठिक आहे म्हणत मुलगा दरमजल करत डोंगराचे टोक गाठतो. तिथे खरोखरच भाग्य नावाची एक व्यक्ती भेटते. मुलगा त्या व्यक्तीला स्वत:च्या आणि वाटेत भेटलेल्या तिघांच्या अडचणी सांगतो. भाग्य म्हणते, `तू पुढे हो मी मागून आलोच.' मुलाला आनंद होतो. तो निघतो. वाटेतून येताना राजकुमारी आणि बागमालकालाही भेटून येतो. शेवटी वाघ भेटतो. तो वाघाला सविस्तर वृत्तांत सांगतो. 

'माझे भाग्य मला म्हणाले, तू पुढे हो मी मागून येतो. वाटेत मला राजकन्या भेटली होती. तिला मनासारखा जोडीदार मिळाला, की तिचे भाग्य बदलणार होते. तर तिने मलाच मागणी घातली. पण मी नाकारली, कारण माझे भाग्य माझ्या पाठीशी होते. बागमालकाला भाग्याने सांगितले, ज्या झऱ्याचे पाणी बागेला देतोस, तिथे सोने दडले आहे, ते दूर कर मग स्वच्छ पाणी बागेला मिळून गोड फळे येतील. बाग मालकाने मला मदत करणार का विचारले, सोन्याचे अमिषही दाखवले, पण मी बधलो नाही. कारण आता माझे भाग्य माझ्या मागे होते. माझ्या भाग्याने तुम्हाला निरोप दिला, की ज्यादिवशी तुम्हाला जगातला मूर्ख प्राणी खायला मिळेल, त्यादिवशी तुमचा दीर्घ आजार कायमचा बरा होईल.'

हे ऐकून वाघ, जगातल्या सर्वात मूर्ख प्राण्याला, अर्थात त्या मुलाला मारतो आणि कायमचा बरा होतो.

तात्पर्य, भाग्य आपल्या बरोबरच असते, परंतु ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. मिळालेल्या संधीचे सोने करता आले, तर भाग्य आपोआप उजळते अन्यथा दूर निघून जाते.