शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

'तुला भाग्य भेटले, तर माझे भाग्य कधी बदलेल विचार!'; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 14:16 IST

मिळालेल्या संधीचे सोने करता आले, तर भाग्य आपोआप उजळते अन्यथा दूर निघून जाते. 

एक मुलगा कायम आपल्या नशीबाला दोष देत असे. त्याने एका साधूंना गाठले आणि विचारले, माझे भाग्य कधी बदलेल ते सांगा. माझे भाग्य मला सोडून दूर निघून गेले आहे. 

यावर साधू म्हणाले, भाग्य सोडून गेले हा विचार करण्यापेक्षा तू तुझे काम करत राहा, भाग्य आपोआप मागे येईल.

मुलगा दिवसरात्र याच गोष्टीचा विचार करू लागला. स्वप्नातही त्याला हाच विषय दिसत असे. एके दिवशी पहाटे त्याने स्वप्न पाहिले, की आपले भाग्य आपल्यावर रुसुन एका उंच डोंगरावर जाऊन बसले आहे. स्वप्नातून जागे होताच, त्यो डोंगरावर जाऊन आपले भाग्य गाठायचे असा निश्चय केला. 

मुलगा आपले भाग्य गाठण्यासाठी डोंगराच्या दिशेने जाऊ लागला. वाटेत त्याला एक वाघ दिसला. वाघ अतिशय आजारी अवस्थेत असल्याने त्याला वाघाची भीती वाटली नाही. तो वाघाची नजर चुकवून जाणार, तोच वाघ त्याला बोलावतो आणि कुठे चाललास हे विचारतो. मुलगा हकिकत सांगतो. त्यावर वाघ म्हणतो, 'मी गेली कित्येक वर्षे आजारी आहे. तुला भाग्य भेटले, तर माझेही भाग्य कधी बदलेल विचार.'

मुलगा ठिक आहे म्हणतो आणि निघतो. पुढे त्याला एक बाग आढळते. तिथली फळे तोडतो आणि खातो. पण सगळीच फळे कडवट असतात. बागेचा मालक तिथे येतो आणि इथे का आलास हे विचारतो. मुलगा खरे कारण सांगतो. त्यावर बागमालक म्हणतो, 'आजवर एवढी मेहनत घेऊनही माझ्या बागेतली फळे कडवटच येतात. तुला भाग्य भेटले तर माझे भाग्य कधी बदलेल विचार.'

मुलगा त्यालाही ठिक आहे म्हणतो आणि निघतो. पुढे एक राजमहाल लागतो. तिथली सुंदर राजकन्या त्या मुलाला तिथे येण्याचे प्रयोजन विचारते. मुलगा सांगता़े राजकन्या म्हणजे `माझ्याकडे सगळे वैभव असूनही मी दु:खी आहे, तुला भाग्य भेटले तर माझे भाग्य कधी बदलेल विचार.'

तिलाही ठिक आहे म्हणत मुलगा दरमजल करत डोंगराचे टोक गाठतो. तिथे खरोखरच भाग्य नावाची एक व्यक्ती भेटते. मुलगा त्या व्यक्तीला स्वत:च्या आणि वाटेत भेटलेल्या तिघांच्या अडचणी सांगतो. भाग्य म्हणते, `तू पुढे हो मी मागून आलोच.' मुलाला आनंद होतो. तो निघतो. वाटेतून येताना राजकुमारी आणि बागमालकालाही भेटून येतो. शेवटी वाघ भेटतो. तो वाघाला सविस्तर वृत्तांत सांगतो. 

'माझे भाग्य मला म्हणाले, तू पुढे हो मी मागून येतो. वाटेत मला राजकन्या भेटली होती. तिला मनासारखा जोडीदार मिळाला, की तिचे भाग्य बदलणार होते. तर तिने मलाच मागणी घातली. पण मी नाकारली, कारण माझे भाग्य माझ्या पाठीशी होते. बागमालकाला भाग्याने सांगितले, ज्या झऱ्याचे पाणी बागेला देतोस, तिथे सोने दडले आहे, ते दूर कर मग स्वच्छ पाणी बागेला मिळून गोड फळे येतील. बाग मालकाने मला मदत करणार का विचारले, सोन्याचे अमिषही दाखवले, पण मी बधलो नाही. कारण आता माझे भाग्य माझ्या मागे होते. माझ्या भाग्याने तुम्हाला निरोप दिला, की ज्यादिवशी तुम्हाला जगातला मूर्ख प्राणी खायला मिळेल, त्यादिवशी तुमचा दीर्घ आजार कायमचा बरा होईल.'

हे ऐकून वाघ, जगातल्या सर्वात मूर्ख प्राण्याला, अर्थात त्या मुलाला मारतो आणि कायमचा बरा होतो.

तात्पर्य, भाग्य आपल्या बरोबरच असते, परंतु ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. मिळालेल्या संधीचे सोने करता आले, तर भाग्य आपोआप उजळते अन्यथा दूर निघून जाते.