शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

स्वतःला 'या' सवयी लावल्या, तर नकारात्मक विचार तुमच्या मनाला शिवणारही नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:16 IST

सगळे म्हणतात सतत सकारात्मक राहा, पण आजच्या काळात तसं राहण्यासाठी दिलेले उपाय नक्की करा!

कळायला लागल्या पासून ''दुनिया का सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग!' या एका प्रश्नाभोवती आपले आयुष्य फिरत असते. लोक बोलून मोकळे होतात आणि त्यांच्या बोलण्याचा विचार करत आयुष्य आपले निघून जाते. याबाबतीत ब्रह्मकुमारी शिवानी दीदी सांगतात, लोक आपल्याबद्दल काय बोलतात यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय बोलतो हे पाहणं महत्त्वाचं!

मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही असे म्हणतात. हे माहीत असूनसुद्धा समोरची व्यक्ती आपल्या बाजूने बोलावी यासाठी आपण अट्टहास करतो. तसे झाले तरी कोणाच्या बोलण्याने कोणतीही व्यक्ती चांगली ठरत नाही किंवा वाईट ठरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण प्रत्येक जण कोणासाठी चांगला तर कोणासाठी वाईट असतोच. हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो. हे फक्त व्यक्तीच्या बाबतीत नाही, तर फुलं, फळं, रंग, रूप, वस्तू अशा सगळ्या बाबतीत घडते. अशी एकही गोष्ट नाही जिला जगात सर्वमान्यता मिळाली आहे. असे असताना केवळ एक व्यक्ती तुमचा पूर्णतः स्वीकार करू शकते, ती म्हणजे तुम्ही स्वतः...! 

आपण नेहमी अशी व्यक्ती बाहेर शोधतो, जी आपला स्वीकार करेल, आपल्याला समजून घेईल, आपली काळजी घेईल, आपला आदर करेल. अशी व्यक्ती बाहेर मिळणे कठीण आहे, पण त्या व्यक्तीला स्वतः मध्ये शोधणे सोपे आहे. कोणी आपल्याला नावं ठेवली, आपला अपमान केला तर त्याच्या शब्दांना किंमत देऊन आपण स्वतःला हानी पोहोचवतो, त्रास करून घेतो. याउलट जर आपण आपल्याशी मैत्री केली, स्वतःला ओळखले असले तर आपण स्वतःला सावरू शकतो. ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याला आधार द्यायला सरसावतो, त्या आधाराची सगळ्यात जास्त गरज स्वतःला असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला दुखवून जाते, तेव्हा आपण आपल्याला काही वेळ देतो का? तो द्यायला शिका, जेणेकरून दुसऱ्याने दुखावले तरी त्याक्षणी आपण स्वतःला उभारी देऊ शकू. स्वतःचे सांत्वन करू शकू.

ही सकारात्मकता येण्यासाठी रोज सकाळी आणि झोपण्याआधी स्वतःला वाक्य सांगा, ''लोक काय म्हणतील या भीतीखाली मी जगणार नाही, त्यावर विचार करेन, सुधारणेची गरज असेल तर तीसुद्धा करेन पण कोणाच्या बोलण्याने स्वतःला दुखवून घेणार नाही. कारण मी स्वतःला पुरेपूर ओळखतो, मला माझ्या क्षमता, माझा स्वभाव माहीत आहे. मला प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा आहे. माझ्या आनंदावर विरजण घालण्याची संधी मी कोणालाही देणार नाही! मी दुसऱ्याकडून प्रेम मिळण्याची वाट बघत बसणार नाही. कारण स्वतःला प्रेम देण्यासाठी मी सक्षम आहे.'' 

भगवंताने बनवलेली कोणतीही गोष्ट वाईट असूच शकत नाही. मनुष्य ही सुद्धा भगवंताची निर्मिती आहे. मग ती तरी वाईट कशी असेल? स्वतःला कमी लेखणे सोडून द्या. आवश्यक सुधारणा जरूर करा, मात्र स्वतःचे अस्तित्त्व विसरू नका आणि कोणाच्या सांगण्यावरून अविवेकाने स्वतःला बदलू नका!