शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

जर स्वतःमध्ये 'हे' पाच बदल केलेत तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 14:39 IST

मेहनत तर गाढवही करते, तसे काम उपयोगाचे नाही. ध्येयाने प्रेरित होऊन आणि वेळ ठरवून काम केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ५ बदल पुढीलप्रमाणे-

एका आळसामुळे आपले खूप नुकसान होते. आळशी व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. असे लोक कायम आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडतात. त्यामुळे त्यांच्यापासून लोक दुरावतात आणि ते एकाकी पडतात. 

आळस कशामुळे येतो? तर मेंदू कार्यान्वित न ठेवल्यामुळे. आपल्या मेंदूला सतत कामाचा पुरवठा करावा लागतो नाहीतर तो काम करणे बंद करतो. एकतर ध्येयवेडे लोक सतत कामात असतात नाहीतर परिस्थितीमुळे हतबल झालेले, अन्यथा कामाचा कंटाळा प्रत्येकालाच येतो. मेंदू शिथील झाला, की आळस येतो. 

काम नुसते करून उपयोग नाही. मेहनत तर गाढवही करते, तसे काम उपयोगाचे नाही. ध्येयाने प्रेरित होऊन काम केले पाहिजे आणि वेळ ठरवून काम केले पाहिजे. अन्यथा कामाला गती येणार नाही. दर वेळी आवडीचे काम मिळेल असे नाही, तर जे काम मिळेल ते आवडीने केले पाहिजे. 

जबाबदारी घेण्याबाबत दोन पद्धतीचे लोक असतात, एक कष्टाळू आणि दुसरे कष्ट टाळू! विनोदाचा भाग सोडा, परंतु आळशी लोकांना जबाबदारी घेण्यात अजिबात रस नसतो. ते दुसऱ्यांच्या हाताखाली काम करतील, परंतु स्वत:कडे चांगली बौद्धिक क्षमता असूनही त्याचा योग्य वापर करणार नाहीत. ही कारणे लक्षात घ्या आणि स्वत:मध्ये पुढील बदल करा.

आयुष्यात मोठे ध्येय आणि मोठे लक्ष्य ठेवा : ध्येय नसेल, तर आयुष्यात काहीच मजा नाही. आला दिवस घालवणे हे आपले जीवनाचे लक्ष्य नसून आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वत:चे स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करा. मग बघा, तुम्हाला दिवसाचे चोवीस तासही कमी पडतील. सुरुवात छोट्या छोट्या ध्येयापासून करा. ते ध्येय प्राप्त केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि स्वप्नांचे क्षितीज विस्तारेल.

ताजे आणि पौष्टिक अन्न खा : अन्न हे आपल्या शरीराचे ऊर्जास्रोत आहे. कमी किंवा अधिक अन्नसेवनामुळे शरीर सुरळीतपणे काम करत नाही. म्हणून प्रमाणात अन्नसेवन करावे आणि शक्य असल्यास ताजे अन्न खावे. शिळे अन्न खाल्यामुळे सुस्तपणा येतो आणि आळसाला निमित्त मिळते.

कामाची यादी करा : दिवसाची सुरुवात करताना आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत, त्याची यादी करा आणि कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. त्यामुळे अनावश्यक कामात वेळ खर्च होणार नाही.

सुसंगत ठेवा : उत्साही, अभ्यासू लोकांच्या सहवासात राहा. तुम्हाला आळस आला, तरी असे लोक तुम्हाला कामासाठी प्रोत्साहित करत राहतील. त्यामुळे तुमची आपोआप प्रगती होईल.

हळू हळू बदल करा : कोणताही बदल एका दिवसात होत नाही, त्यासाठी प्रयत्न करा आणि टप्प्याटप्प्याने बदल करा. त्यामुळे सवयीत बदल होतील आणि तुमचा उत्साह टिकून राहील

वरवर छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात मोठा बदल घडवतात हे लक्षात ठेवा आणि कामाला सुरुवात करा.