शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

हे नाणं खिशात असेल, तर तुम्हाला कुठल्याच स्पर्धेत अपयश येणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 08:00 IST

नाणं महत्त्वाचं नाही किंवा छापा काटा महत्त्वाचा नाही, तर आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.

एक मुलगा क्रीडापटू असतो. धावण्यात वाऱ्यालाही मागे टाकेल एवढा चपळ असतो. परंतु थोडासा भित्रा असतो. भीती कशाची? तर भविष्यात काय घडेल याची! त्याची आई त्याला नेहमी प्रोत्साहन देत असे. ती एक भीती सोडली, तर त्याला कोणीच हरवू शकणार नव्हते. 

एक दिवस त्याची धावण्याची शर्यत असते. त्याने खूप मेहनत घेतलेली असते. परंतु नेहमीप्रमाणे पुढे काय होईल ही मनात भीती असते. ती भीती घालवण्यासाठी त्याची आई त्याला स्पर्धेत जाण्यापूर्वी मंदिरात घेऊन जाते. देवाचे दर्शन घेतल्यावर त्याच्या मनातले संशयाचे, काळजीचे ढग थोडे थोडे विरू लागतात. त्यावेळेस आई आपल्या पर्समधून एक नाणे काढते आणि देवाला साक्षी ठेवून मुलाला सांगते, 'छापा आला तर तू आज जिंकणार आणि काटा आला तर...' पुढे काही बोलायच्या आत मुलगा म्हणतो, 'आई छापा येईल बघ!'

आई हवेत नाणं भिरकावते. आणि हळूच मूठ उघडते. छापा दिसतो. मुलगा आनंदाने उड्या मारतो. आज आपणच जिंकणार हे आत्मविश्वासाने सांगतो. त्याच्या मनातली भीती कुठल्या कुठे पळून जाते. तो पूर्ण प्रयत्न पणाला लावून शर्यत जिंकतो. त्या रात्री आई त्याला 'ते' नाणं भेट देते आणि सांगते, ' हे नाणं तुझ्याकडे कायम ठेव, म्हणजे तू कधीच अपयशी होणार नाही!'

मुलगा आनंदाने ते नाणे घेतो आणि दोन्ही बाजूंनी पाहतो. हे तर शोले मधल्या नाण्यासारखं नाणं आहे, असे म्हणत मुलगा आश्चर्य चकित होतो. तेव्हा आई सांगते, 'हो बाळा या नाण्याच्या दोन्ही बाजूंवर छापा आहे. तो आपल्याला नेहमी जिंकण्याचे बळ देतो. हे नाणं महत्त्वाचं नाही किंवा छापा काटा महत्त्वाचा नाही, तर तुझा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तो जोवर तुझ्याकडे आहे तोवर तुला नाण्याच्या दोन्ही बाजूला छापाच दिसेल. ज्यादिवशी आत्मविश्वास डळमळीत होईल, त्यादिवशी दोन्ही बाजूला काटा दिसेल. म्हणून भविष्याची काळजी सोड आणि प्रामाणिक प्रयत्नांवर भर दे, तरच हे खणखणीत नाणं या जगात सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल!'