शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

हे अनमोल रत्न तुम्हाला मिळाले, तर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:15 IST

देवाने रिकाम्या हाताने कोणालाही पाठवलेले नाही. प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहेत, जे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांची प्रतिकृती बनू शकते, परंतु मूळ गुण बदलत नाही.

एक मनुष्य देवपूजा करत होता. परंतु पूजेत त्याचे मन लागत नव्हते. आपल्या नशिबाला, देवाला, दैवाला तो दोष देत होता. अचानक देव प्रगट झाले आणि त्याच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. तो मनुष्य घाबरला. देव म्हणाले, 'घाबरू नकोस, मी कोणी बहुरंगी नाही, तर तर ज्याची तू पूजा करत होतास तोच मी देव आहे. तुझ्या समस्या सोडवायला आलोय.'

मनुष्य म्हणाला, 'देवा तुम्ही यायचे कष्ट कशाला घेतलेत, मलाच तुमच्याजवळ बोलावून घेतले असते. तसेही इथे माझे काही काम नाही की जगण्याला उद्दिष्ट नाही. जगून काय करू, मला तुमच्या बरोबर घेऊन चला.'देव म्हणाले, 'ठीक आहे नेतो. त्याआधी माझे एक काम कर. हे लाल रत्न घे आणि त्याचा बाजारभाव काढून आण, पण अट एवढीच आहे, की हे रत्न विकायचे नाहीस. संध्याकाळी परत घेऊन यायचे.' 

देवाची आज्ञा मानून मनुष्य ते रत्न घेऊन निघाला. बाजारात त्याने एका फळ विक्रेत्याला रत्न दाखवले, 'तो म्हणाला मला हे रत्न विकत घ्यायला आवडेल. त्या मोबदल्यात दहा डझन आंबे घेऊन जा.'नंतर तो मनुष्य एका सोनाराकडे गेला. रत्न पाहून सोनाराचे डोळे चमकले. तो म्हणाला, 'पन्नास लाखात सौदा करूया. आताच्या आता तुला चेक देतो, तू हे रत्न दे.' मनुष्य काहीच बोलला नाही पाहून सोनार म्हणाला, 'एक कोटी देतो, मग तर झालं? दे ते रत्न मला!'मनुष्य म्हणाला, 'माफ करा, मला हे रत्न विकण्याची अनुमती नाही, मी फक्त बाजारभाव काढायला आलो होतो.' हे ऐकून सोनाराने त्याला हाकलून लावले. 

तो मनुष्य लाल रत्न घेऊन हिऱ्यांच्या व्यापाऱ्याकडे आला आणि रत्नाची किंमत विचारू लागला. हिऱ्यांचा व्यापारी डोळे विस्फारून म्हणाला,'एवढं अनमोल रत्न तुम्हाला कुठे मिळालं? माझी सगळी मालमत्ता विकली तरी हे रत्न मी विकत घेऊ शकणार नाही. मीच काय तर जगातली कोणतीही व्यक्ती ते विकत घेऊ शकणार नाही.'

हे ऐकल्यावर मनुष्य लगबगीने घरी आला आणि त्याने देवाच्या पायाला मिठी मारत म्हटलं, देवा या रत्नाला एवढी किंमत आहे, यातली थोडी किंमत जरी माझ्या जीवाला असती तर किती बरं झालं असतं?'देव म्हणाले, 'अरे वेड्या हेच समजवायला मी तुला हे रत्न दाखवलं. तूच काय, तर प्रत्येक जण अनमोल रत्न आहे. त्याची पारख करणारा खरा गुणग्राही हवा. कुठेही जाऊन त्याची किंमत होणार नाही. त्याच्यासाठी अनुकूल जागा शोध आणि मग स्वतःची किंमत जाणून घे!'

तात्पर्य : देवाने रिकाम्या हाताने कोणालाही पाठवलेले नाही. प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहेत, जे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांची प्रतिकृती बनू शकते, परंतु मूळ गुण बदलत नाही. म्हणून स्वतःला त्या लाल रत्नासारखे घडवा. जेणेकरून उचित गुणग्राही, रत्नपारखी व्यक्ती आली, की या अनमोल रत्नाला झळाळी मिळायला वेळ लागणार नाही.