शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
3
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
4
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
5
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
6
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
7
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
8
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
9
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
10
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
11
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
12
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
13
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
14
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
15
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
16
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
17
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
18
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
19
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
20
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

आयुष्य गरिबीत काढायचे नसेल तर करा 'हे' पाच उपाय, होईल तुमचाही भाग्योदय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:04 IST

उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी, असे म्हणतात. त्यासाठी नेमके कोणते कर्म आवश्यक आहे ते जाणून घ्या!

गरीब घरात जन्माला येणं हा आपला अपराध नाही, पण गरिबीत मरणं हा सर्वस्वी तुमचा अपराध आहे असे यशस्वी लोक सांगतात. गरिबीत राहावे असे कोणालाही वाटत नाही. परंतु श्रीमंत होणेदेखील सोपे नाही. त्यासाठी अविरत मेहनत, नशिबाची साथ आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर दिवस पालटायला वेळ लागणार नाही. 

यासाठीच आचार्य चाणक्य सांगताहेत काही महत्त्वपूर्ण गोष्टी. आचार्य चाणक्यांच्या या धोरणांच्या आधारे चंद्रगुप्त मौर्य नंद वंशाचा सम्राट बनला आणि त्याच्या अनेक शत्रूंचा पराभव करू शकला. चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि भरपूर यश मिळते.तसेच गरिबी दूर होते. 

>>आचार्य चाणक्य सांगतात की जर तुम्हाला नेहमी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर कधीही अन्न वाया घालवू नका. अन्न वाया गेल्याने माता अन्नपूर्णा रागावते. घरात अन्नान्न दशा होते आणि गरिबी ओढवली जाते. 

>>जे इतरांना मदत करतात, पैशाचा उत्तम विनियोग करतात आणि इतरांबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना असते अशा लोकांवर माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो. म्हणून पैसे गुंतवणुकीवर भर द्या आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजातून दुसऱ्यांनाही मदत करा. 

>>ज्या कुटुंबात एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा असतो त्या घरात समाधान नांदते. लक्ष्मी मातेला अशी घरे प्रिय असतात. याउलट ज्या घरात सतत हेवेदावे, मत्सर, असमाधानी वृत्ती आणि कलह असतो तिथे लक्ष्मी फार काळ थांबणे पसंत करत नाही. 

>>मेहनतीने पैसा सगळेजण कमावतात. परंतु पैशांचे सुयोग्य नियोजन नसल्यामुळे अनेक जण वर्षानुवर्षे गरिबीत खितपत पडतात. पैसा गुंतवणूक, योग्य वापर आणि त्याच्या वाढीचे प्रयत्न यावर आर्थिक गणित बदलत असते. म्हणून पैसा नुसता कमवून उपयोग नाही तर तो योग्य प्रकारे वापरताही आला पाहिजे. 

>>ज्यांची कठोर परिश्रमाची तयारी असते, तिथे लक्ष्मी कधीही पाठ दाखवत नाही. उलट ती त्याच्या पाठीशी कायम उभी राहते आणि त्याच्या नोकरी, व्यवसायात आर्थिक वाढ होईल असा आशीर्वाद देते!