शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य गरिबीत काढायचे नसेल तर करा 'हे' पाच उपाय, होईल तुमचाही भाग्योदय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:04 IST

उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी, असे म्हणतात. त्यासाठी नेमके कोणते कर्म आवश्यक आहे ते जाणून घ्या!

गरीब घरात जन्माला येणं हा आपला अपराध नाही, पण गरिबीत मरणं हा सर्वस्वी तुमचा अपराध आहे असे यशस्वी लोक सांगतात. गरिबीत राहावे असे कोणालाही वाटत नाही. परंतु श्रीमंत होणेदेखील सोपे नाही. त्यासाठी अविरत मेहनत, नशिबाची साथ आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर दिवस पालटायला वेळ लागणार नाही. 

यासाठीच आचार्य चाणक्य सांगताहेत काही महत्त्वपूर्ण गोष्टी. आचार्य चाणक्यांच्या या धोरणांच्या आधारे चंद्रगुप्त मौर्य नंद वंशाचा सम्राट बनला आणि त्याच्या अनेक शत्रूंचा पराभव करू शकला. चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि भरपूर यश मिळते.तसेच गरिबी दूर होते. 

>>आचार्य चाणक्य सांगतात की जर तुम्हाला नेहमी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर कधीही अन्न वाया घालवू नका. अन्न वाया गेल्याने माता अन्नपूर्णा रागावते. घरात अन्नान्न दशा होते आणि गरिबी ओढवली जाते. 

>>जे इतरांना मदत करतात, पैशाचा उत्तम विनियोग करतात आणि इतरांबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना असते अशा लोकांवर माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो. म्हणून पैसे गुंतवणुकीवर भर द्या आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजातून दुसऱ्यांनाही मदत करा. 

>>ज्या कुटुंबात एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा असतो त्या घरात समाधान नांदते. लक्ष्मी मातेला अशी घरे प्रिय असतात. याउलट ज्या घरात सतत हेवेदावे, मत्सर, असमाधानी वृत्ती आणि कलह असतो तिथे लक्ष्मी फार काळ थांबणे पसंत करत नाही. 

>>मेहनतीने पैसा सगळेजण कमावतात. परंतु पैशांचे सुयोग्य नियोजन नसल्यामुळे अनेक जण वर्षानुवर्षे गरिबीत खितपत पडतात. पैसा गुंतवणूक, योग्य वापर आणि त्याच्या वाढीचे प्रयत्न यावर आर्थिक गणित बदलत असते. म्हणून पैसा नुसता कमवून उपयोग नाही तर तो योग्य प्रकारे वापरताही आला पाहिजे. 

>>ज्यांची कठोर परिश्रमाची तयारी असते, तिथे लक्ष्मी कधीही पाठ दाखवत नाही. उलट ती त्याच्या पाठीशी कायम उभी राहते आणि त्याच्या नोकरी, व्यवसायात आर्थिक वाढ होईल असा आशीर्वाद देते!