शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

आयुष्य गरिबीत काढायचे नसेल तर करा 'हे' पाच उपाय, होईल तुमचाही भाग्योदय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:04 IST

उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी, असे म्हणतात. त्यासाठी नेमके कोणते कर्म आवश्यक आहे ते जाणून घ्या!

गरीब घरात जन्माला येणं हा आपला अपराध नाही, पण गरिबीत मरणं हा सर्वस्वी तुमचा अपराध आहे असे यशस्वी लोक सांगतात. गरिबीत राहावे असे कोणालाही वाटत नाही. परंतु श्रीमंत होणेदेखील सोपे नाही. त्यासाठी अविरत मेहनत, नशिबाची साथ आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर दिवस पालटायला वेळ लागणार नाही. 

यासाठीच आचार्य चाणक्य सांगताहेत काही महत्त्वपूर्ण गोष्टी. आचार्य चाणक्यांच्या या धोरणांच्या आधारे चंद्रगुप्त मौर्य नंद वंशाचा सम्राट बनला आणि त्याच्या अनेक शत्रूंचा पराभव करू शकला. चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि भरपूर यश मिळते.तसेच गरिबी दूर होते. 

>>आचार्य चाणक्य सांगतात की जर तुम्हाला नेहमी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर कधीही अन्न वाया घालवू नका. अन्न वाया गेल्याने माता अन्नपूर्णा रागावते. घरात अन्नान्न दशा होते आणि गरिबी ओढवली जाते. 

>>जे इतरांना मदत करतात, पैशाचा उत्तम विनियोग करतात आणि इतरांबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना असते अशा लोकांवर माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो. म्हणून पैसे गुंतवणुकीवर भर द्या आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजातून दुसऱ्यांनाही मदत करा. 

>>ज्या कुटुंबात एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा असतो त्या घरात समाधान नांदते. लक्ष्मी मातेला अशी घरे प्रिय असतात. याउलट ज्या घरात सतत हेवेदावे, मत्सर, असमाधानी वृत्ती आणि कलह असतो तिथे लक्ष्मी फार काळ थांबणे पसंत करत नाही. 

>>मेहनतीने पैसा सगळेजण कमावतात. परंतु पैशांचे सुयोग्य नियोजन नसल्यामुळे अनेक जण वर्षानुवर्षे गरिबीत खितपत पडतात. पैसा गुंतवणूक, योग्य वापर आणि त्याच्या वाढीचे प्रयत्न यावर आर्थिक गणित बदलत असते. म्हणून पैसा नुसता कमवून उपयोग नाही तर तो योग्य प्रकारे वापरताही आला पाहिजे. 

>>ज्यांची कठोर परिश्रमाची तयारी असते, तिथे लक्ष्मी कधीही पाठ दाखवत नाही. उलट ती त्याच्या पाठीशी कायम उभी राहते आणि त्याच्या नोकरी, व्यवसायात आर्थिक वाढ होईल असा आशीर्वाद देते!