शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही अपयशी, असमाधानी असाल तर त्यामागे आहेत 'ही' तीन कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 15:37 IST

'या' तीन नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!

जर तुम्हाला जीवनात यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता, क्षमता यासोबतच इतर काही गोष्टींची गरज आहे. यामध्ये व्यक्तीची योग्य वागणूक आणि सवयी खूप महत्त्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टींमध्ये गडबड झाली, तर यश मिळाल्यावर माणूस पुन्हा अपयशाच्या दरीत ओढला जाऊ शकतो. आचार्य चाणक्य सांगतात, की ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने अत्यंत सावधपणे वागले पाहिजे.

चाणक्य नीतिनुसार काही चुका टाळल्या पाहिजेत.अन्यथा तुमच्या यशाचा आलेख उतरंडीला लागू शकतो. 

कधीही चुकीच्या गोष्टी करू नका: ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने कधीही अनैतिक गोष्टी करू नयेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळते आणि त्याच गोष्टी यशाच्या मार्गात अडथळा बनतात. चुकीच्या सवयी व्यक्तीला त्याच्या ध्येयापासून विचलित करतात, म्हणून वाईट सवयीच्या लोकांपासून दूर रहा.

बचत करा: चांगले शिक्षण, आरोग्य आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी पैसे खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जास्त काळ विनाकारण पैसे खर्च केल्याने श्रीमंत माणूसही गरीब होऊ शकतो. त्यामुळे वाईट काळासाठी बचत करण्याचे सुनिश्चित करा. अन्यथा, उधळपट्टीमुळे तुमचे चांगले जीवन दारिद्रयात ढकलले जाऊ शकते. 

वेळेचे महत्त्व समजून घ्या : ज्या व्यक्तीला यश मिळवायचे आहे त्याने आपल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे. वेळेला पैशांइतके महत्त्व दिले पाहिजे. ज्याप्रमाणे पैसा आपण जपून आणि योग्य ठिकाणी वापरतो, तसाच वेळही जपून वापरायला हवा. 

या तीन गोष्टी तुमच्या आयुष्याची घडी बसवू शकतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बसलेली घडी बिघडवूदेखील शकतात. नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!