शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही अपयशी, असमाधानी असाल तर त्यामागे आहेत 'ही' तीन कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 15:37 IST

'या' तीन नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!

जर तुम्हाला जीवनात यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता, क्षमता यासोबतच इतर काही गोष्टींची गरज आहे. यामध्ये व्यक्तीची योग्य वागणूक आणि सवयी खूप महत्त्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टींमध्ये गडबड झाली, तर यश मिळाल्यावर माणूस पुन्हा अपयशाच्या दरीत ओढला जाऊ शकतो. आचार्य चाणक्य सांगतात, की ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने अत्यंत सावधपणे वागले पाहिजे.

चाणक्य नीतिनुसार काही चुका टाळल्या पाहिजेत.अन्यथा तुमच्या यशाचा आलेख उतरंडीला लागू शकतो. 

कधीही चुकीच्या गोष्टी करू नका: ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने कधीही अनैतिक गोष्टी करू नयेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळते आणि त्याच गोष्टी यशाच्या मार्गात अडथळा बनतात. चुकीच्या सवयी व्यक्तीला त्याच्या ध्येयापासून विचलित करतात, म्हणून वाईट सवयीच्या लोकांपासून दूर रहा.

बचत करा: चांगले शिक्षण, आरोग्य आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी पैसे खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जास्त काळ विनाकारण पैसे खर्च केल्याने श्रीमंत माणूसही गरीब होऊ शकतो. त्यामुळे वाईट काळासाठी बचत करण्याचे सुनिश्चित करा. अन्यथा, उधळपट्टीमुळे तुमचे चांगले जीवन दारिद्रयात ढकलले जाऊ शकते. 

वेळेचे महत्त्व समजून घ्या : ज्या व्यक्तीला यश मिळवायचे आहे त्याने आपल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे. वेळेला पैशांइतके महत्त्व दिले पाहिजे. ज्याप्रमाणे पैसा आपण जपून आणि योग्य ठिकाणी वापरतो, तसाच वेळही जपून वापरायला हवा. 

या तीन गोष्टी तुमच्या आयुष्याची घडी बसवू शकतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बसलेली घडी बिघडवूदेखील शकतात. नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!