शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही अपयशी, असमाधानी असाल तर त्यामागे आहेत 'ही' तीन कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 15:37 IST

'या' तीन नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!

जर तुम्हाला जीवनात यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता, क्षमता यासोबतच इतर काही गोष्टींची गरज आहे. यामध्ये व्यक्तीची योग्य वागणूक आणि सवयी खूप महत्त्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टींमध्ये गडबड झाली, तर यश मिळाल्यावर माणूस पुन्हा अपयशाच्या दरीत ओढला जाऊ शकतो. आचार्य चाणक्य सांगतात, की ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने अत्यंत सावधपणे वागले पाहिजे.

चाणक्य नीतिनुसार काही चुका टाळल्या पाहिजेत.अन्यथा तुमच्या यशाचा आलेख उतरंडीला लागू शकतो. 

कधीही चुकीच्या गोष्टी करू नका: ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने कधीही अनैतिक गोष्टी करू नयेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळते आणि त्याच गोष्टी यशाच्या मार्गात अडथळा बनतात. चुकीच्या सवयी व्यक्तीला त्याच्या ध्येयापासून विचलित करतात, म्हणून वाईट सवयीच्या लोकांपासून दूर रहा.

बचत करा: चांगले शिक्षण, आरोग्य आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी पैसे खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जास्त काळ विनाकारण पैसे खर्च केल्याने श्रीमंत माणूसही गरीब होऊ शकतो. त्यामुळे वाईट काळासाठी बचत करण्याचे सुनिश्चित करा. अन्यथा, उधळपट्टीमुळे तुमचे चांगले जीवन दारिद्रयात ढकलले जाऊ शकते. 

वेळेचे महत्त्व समजून घ्या : ज्या व्यक्तीला यश मिळवायचे आहे त्याने आपल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे. वेळेला पैशांइतके महत्त्व दिले पाहिजे. ज्याप्रमाणे पैसा आपण जपून आणि योग्य ठिकाणी वापरतो, तसाच वेळही जपून वापरायला हवा. 

या तीन गोष्टी तुमच्या आयुष्याची घडी बसवू शकतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बसलेली घडी बिघडवूदेखील शकतात. नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!