शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याचा कंटाळा आला असेल तर 'कालमापन यंत्र' आजच विकत घेऊन या; कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:51 IST

गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून हिऱ्यापेक्षा अमूल्य काही असेल, तर ती आहे वेळ! आज सकाळी आपण जो सूर्योदय ...

गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून हिऱ्यापेक्षा अमूल्य काही असेल, तर ती आहे वेळ! आज सकाळी आपण जो सूर्योदय पाहिला, तो तसाच उद्या अनुभवता येईल असे नाही. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. परंतु, या संधीचे सोने केले नाही, तर वेळ वाया गेला, असे म्हणावे लागेल. यासाठी वेळेच्या नियोजनाला प्राधान्य द्या; सांगत आहेत आध्यात्मिक वक्ते ग्यानवत्सल स्वामी. 

स्वामींनी वेळ व्यवस्थापनाला त्रिसूत्रीत विभागले आहे. ते सांगतात, वाळूचे कालमापनाचे यंत्र डोळ्यासमोर ठेवा. झरझर निसटणारी वाळू म्हणजे आपल्या हातून निसटणारी वेळ आहे. तिचा योग्य विनिमय करायचा असेल तर प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवायला शिका. हा हिशोब कसा मांडायचा? तर दिवसातल्या २४ तासांना तीन टप्प्यात विभागून घ्या. 

पहिले आठ तास झोपेचे. ती पूर्ण झाली नाही, तर सगळे गणितच बिघडेल. पुढचे आठ तास आपल्या नियोजित कामाचे. अभ्यास, व्यवसाय, नोकरीचे. शेवटचे आठ तास, जे आपण वाया घालवतो, ते आठ तास आपल्याला कामी लावायचे असतील, तर त्यात आणखी ९ भाग पाडून त्यांना आलटून पालटून प्राधान्य दिले पाहिजे. कसे ते बघा -

पहिला टप्पा :कुटुंब, मित्रपरिवार, नातेसंबंध दुसरा टप्पा : आरोग्य, स्वच्छता, छंदतिसरा टप्पा : आत्मसंवाद, निर्मळ हास्य आणि समाजसेवा

या गोष्टी शेवटच्या आठ तासात आपण केल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्याला आयुष्यात कंटाळा येणारच नाही. नैराश्य स्पर्श करू शकणार नाही. वेळ वाया जाणार नाही आणि एक चांगले, आनंदी आणि निरोगी आयुष्य जगल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल. 

म्हणून आजपासून आयुष्यात ही त्रिसुत्री वापरायला सुरुवात करा, सकारात्मक बदल आपोआप घडू लागतील.