शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

आयुष्याचा कंटाळा आला असेल तर 'कालमापन यंत्र' आजच विकत घेऊन या; कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:51 IST

गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून हिऱ्यापेक्षा अमूल्य काही असेल, तर ती आहे वेळ! आज सकाळी आपण जो सूर्योदय ...

गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून हिऱ्यापेक्षा अमूल्य काही असेल, तर ती आहे वेळ! आज सकाळी आपण जो सूर्योदय पाहिला, तो तसाच उद्या अनुभवता येईल असे नाही. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. परंतु, या संधीचे सोने केले नाही, तर वेळ वाया गेला, असे म्हणावे लागेल. यासाठी वेळेच्या नियोजनाला प्राधान्य द्या; सांगत आहेत आध्यात्मिक वक्ते ग्यानवत्सल स्वामी. 

स्वामींनी वेळ व्यवस्थापनाला त्रिसूत्रीत विभागले आहे. ते सांगतात, वाळूचे कालमापनाचे यंत्र डोळ्यासमोर ठेवा. झरझर निसटणारी वाळू म्हणजे आपल्या हातून निसटणारी वेळ आहे. तिचा योग्य विनिमय करायचा असेल तर प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवायला शिका. हा हिशोब कसा मांडायचा? तर दिवसातल्या २४ तासांना तीन टप्प्यात विभागून घ्या. 

पहिले आठ तास झोपेचे. ती पूर्ण झाली नाही, तर सगळे गणितच बिघडेल. पुढचे आठ तास आपल्या नियोजित कामाचे. अभ्यास, व्यवसाय, नोकरीचे. शेवटचे आठ तास, जे आपण वाया घालवतो, ते आठ तास आपल्याला कामी लावायचे असतील, तर त्यात आणखी ९ भाग पाडून त्यांना आलटून पालटून प्राधान्य दिले पाहिजे. कसे ते बघा -

पहिला टप्पा :कुटुंब, मित्रपरिवार, नातेसंबंध दुसरा टप्पा : आरोग्य, स्वच्छता, छंदतिसरा टप्पा : आत्मसंवाद, निर्मळ हास्य आणि समाजसेवा

या गोष्टी शेवटच्या आठ तासात आपण केल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्याला आयुष्यात कंटाळा येणारच नाही. नैराश्य स्पर्श करू शकणार नाही. वेळ वाया जाणार नाही आणि एक चांगले, आनंदी आणि निरोगी आयुष्य जगल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल. 

म्हणून आजपासून आयुष्यात ही त्रिसुत्री वापरायला सुरुवात करा, सकारात्मक बदल आपोआप घडू लागतील.